शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे दरोड्याप्रकरणी आजी-माजी कर्मचा-यासह 6 जण अटकेत, 4.19 कोटी हस्तगत

By admin | Updated: July 1, 2016 13:09 IST

चेकमेट कंपनीवर टाकण्यात आलेल्या दरोड्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत एका आजी आणि एका माजी कर्मचाऱ्यासह सहा आरोपींना अटक केली आहे

ऑनलाइन लोकमत - 
ठाणे, दि. 01 - चेकमेट कंपनीवर टाकण्यात आलेल्या दरोड्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत 6 जणांना अटक केली आहे. विशेष म्हणजे या दरोड्यात एका आजी आणि एका माजी कर्मचा-याचादेखील समावेश असल्याचं उघड झालं असून त्यांनाही अटक करण्यात आली आहे. नितेश आव्हाड, अमोल कार्ले, आकाश चव्हाण, मयुर कदम, उमेश वाघ आणि हरिश्चंद्र माने अशी आरोपींची नावे आहेत. यामधील अमोल कार्ले आणि आकाश चव्हाण कंपनीचे कर्मचारी असून आकाशने 2 महिन्यापूर्वी कंपनी सोडली होती. 
 
ठाणे पोलिसांनी पत्रकार परिषद घेत कारवाईची माहिती दिली आहे. पोलीस महासंचालक प्रवीण दिक्षित, आयुक्त परमवीर सिंग या पत्रकार परिषदेत हजर होते. चेकमेट कंपनीवर दरोडा टाकून 9 कोटी 16 लाखांची रक्कम लुटण्यात आली होती. पोलिसांनी दरोडेखोरांकडून 4 कोटी 19 लाखांची रक्कम जप्त केली असून दरोड्यात वापरण्यात आलेल्या तीन झायलो गाड्याही जप्त केल्या आहेत. 
 
या दरोड्यात एकूण 15 आरोपी सामील असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. इतर आरोपींच्या शोधासाठी आठ पथकं महाराष्ट्र आणि राज्याबाहेर पाठवण्यात आले असून इतर आरोपींनाही लवकरात लवकर अटक करण्यात येईल अशी माहिती पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी दिली आहे. 
 
 
 
जास्त पैसे नेण्यासाठी साधणं नव्हती
ज्या दिवशी हा प्रकार घडला, त्यावेळी कंपनीत 25 ते 30 कोटींची कॅश होती. मात्र साधनं उपलब्ध नसल्याने चोरट्यांनी केवळ 9 कोटींची रक्कमचं लुटली. 
 
ठाण्यातील चेकमेट या कंपनीवर पडलेल्या दरोड्याच्या घटनेतील चोरटे पळून जातानाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले होते. तपासासाठी वागळे इस्टेट पोलिसांसह गुन्हे शाखेची १० पथके राज्यासह परराज्यांतदेखील शोध घेत होती. गुन्हा घडल्यानंतर घटनेची माहिती एक तासाने पोलिसांना मिळाल्याने दरोडेखोरांना पलायन करण्यास वेळ मिळाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. त्यामुळे या दरोड्यात कंपनीतीलच कुणी घरभेदी आहे का, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात होता.
 
हा दरोडा पडत असताना कंपनीत दोघे सुरक्षारक्षक आणि १७ कर्मचारी कार्यरत होते. यातील पहिल्या गेटवर रामचंद्र कोरी, तर आतल्या बेसमेंटच्या गेटवर पवार हे सुरक्षारक्षक होते. पहिल्या गेटमधून माकडटोपी परिधान केलेले तिघे आणि रुमालाने तोंड झाकलेल्या एकाची छबी कंपनीतील स्क्रीनवर दिसल्यानंतरही कर्मचाऱ्यांनी काहीच दक्षता कशी घेतली नाही, असा सवाल उपस्थित झाला आहे. तसेच दरोड्यानंतर तब्बल एक तासाने पोलिसांना कळवल्याचे समोर आले होते. त्यामुळेच चोरट्यांना ठाणे शहराबाहेर पळून जाण्यास वाव मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली.