शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
2
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
3
१९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
4
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
5
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
6
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
7
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
8
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
9
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
10
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
11
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
12
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
13
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
14
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
15
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
16
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
17
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
18
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
19
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
20
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे

ठाणे दरोड्याप्रकरणी आजी-माजी कर्मचा-यासह 6 जण अटकेत, 4.19 कोटी हस्तगत

By admin | Updated: July 1, 2016 13:09 IST

चेकमेट कंपनीवर टाकण्यात आलेल्या दरोड्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत एका आजी आणि एका माजी कर्मचाऱ्यासह सहा आरोपींना अटक केली आहे

ऑनलाइन लोकमत - 
ठाणे, दि. 01 - चेकमेट कंपनीवर टाकण्यात आलेल्या दरोड्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत 6 जणांना अटक केली आहे. विशेष म्हणजे या दरोड्यात एका आजी आणि एका माजी कर्मचा-याचादेखील समावेश असल्याचं उघड झालं असून त्यांनाही अटक करण्यात आली आहे. नितेश आव्हाड, अमोल कार्ले, आकाश चव्हाण, मयुर कदम, उमेश वाघ आणि हरिश्चंद्र माने अशी आरोपींची नावे आहेत. यामधील अमोल कार्ले आणि आकाश चव्हाण कंपनीचे कर्मचारी असून आकाशने 2 महिन्यापूर्वी कंपनी सोडली होती. 
 
ठाणे पोलिसांनी पत्रकार परिषद घेत कारवाईची माहिती दिली आहे. पोलीस महासंचालक प्रवीण दिक्षित, आयुक्त परमवीर सिंग या पत्रकार परिषदेत हजर होते. चेकमेट कंपनीवर दरोडा टाकून 9 कोटी 16 लाखांची रक्कम लुटण्यात आली होती. पोलिसांनी दरोडेखोरांकडून 4 कोटी 19 लाखांची रक्कम जप्त केली असून दरोड्यात वापरण्यात आलेल्या तीन झायलो गाड्याही जप्त केल्या आहेत. 
 
या दरोड्यात एकूण 15 आरोपी सामील असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. इतर आरोपींच्या शोधासाठी आठ पथकं महाराष्ट्र आणि राज्याबाहेर पाठवण्यात आले असून इतर आरोपींनाही लवकरात लवकर अटक करण्यात येईल अशी माहिती पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी दिली आहे. 
 
 
 
जास्त पैसे नेण्यासाठी साधणं नव्हती
ज्या दिवशी हा प्रकार घडला, त्यावेळी कंपनीत 25 ते 30 कोटींची कॅश होती. मात्र साधनं उपलब्ध नसल्याने चोरट्यांनी केवळ 9 कोटींची रक्कमचं लुटली. 
 
ठाण्यातील चेकमेट या कंपनीवर पडलेल्या दरोड्याच्या घटनेतील चोरटे पळून जातानाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले होते. तपासासाठी वागळे इस्टेट पोलिसांसह गुन्हे शाखेची १० पथके राज्यासह परराज्यांतदेखील शोध घेत होती. गुन्हा घडल्यानंतर घटनेची माहिती एक तासाने पोलिसांना मिळाल्याने दरोडेखोरांना पलायन करण्यास वेळ मिळाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. त्यामुळे या दरोड्यात कंपनीतीलच कुणी घरभेदी आहे का, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात होता.
 
हा दरोडा पडत असताना कंपनीत दोघे सुरक्षारक्षक आणि १७ कर्मचारी कार्यरत होते. यातील पहिल्या गेटवर रामचंद्र कोरी, तर आतल्या बेसमेंटच्या गेटवर पवार हे सुरक्षारक्षक होते. पहिल्या गेटमधून माकडटोपी परिधान केलेले तिघे आणि रुमालाने तोंड झाकलेल्या एकाची छबी कंपनीतील स्क्रीनवर दिसल्यानंतरही कर्मचाऱ्यांनी काहीच दक्षता कशी घेतली नाही, असा सवाल उपस्थित झाला आहे. तसेच दरोड्यानंतर तब्बल एक तासाने पोलिसांना कळवल्याचे समोर आले होते. त्यामुळेच चोरट्यांना ठाणे शहराबाहेर पळून जाण्यास वाव मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली.