शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
ठाकरे गटाला पुन्हा कोकणात मोठा धक्का; बडे पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा रामराम, भाजपात प्रवेश
5
भाचाच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
6
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
7
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
8
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
9
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
10
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
11
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
12
मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!
13
भयंकर! कर्ज फेडण्यासाठी, विम्याचे २ कोटी हडपण्यासाठी मित्राची केली हत्या, जिवंत जाळलं अन्...
14
अनिल अग्रवाल याच्या वेदांतानं भाजपला चार पट जास्त देणगी दिली, काँग्रेसच्या देणगीत मोठी घट, रिपोर्टमधून खुलासा
15
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
16
Karka Sankranti 2025 : कर्क संक्रांतीला 'या' पाच राशींच्या आयुष्यात होईल मोठे संक्रमण; येतील अच्छे दिन!
17
“एसटीचे कदापि खाजगीकरण होऊ देणार नाही”; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
19
Ahilyanagar: पोलिसांना बघून धरणात मारल्या उड्या, एका चोराचा बुडून मृत्यू, तर दुसरा...
20
Astro Tips: बायपाससारख्या मोठ्या शस्त्रक्रीया होण्यामागे कारणीभूत असते 'ही' ग्रहस्थिती!

महापालिकेच्या नव्या सभागृहात सहा मुस्लीम चेहऱ्यांची वाढ

By admin | Updated: February 27, 2017 01:47 IST

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत २९ मुस्लीम उमेदवार विजयी झाले असून, त्यामध्ये महिला नगरसेवकांची संख्या १८ आहे.

जमीर काझी,मुंबई- मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत २९ मुस्लीम उमेदवार विजयी झाले असून, त्यामध्ये महिला नगरसेवकांची संख्या १८ आहे. या वेळी मुस्लीम नगरसेवकांच्या संख्येत गतवेळेपेक्षा सहाने वाढ झाली आहे़ भाजपा वगळता अन्य सर्व प्र्रमुख पक्षांतून हे उमेदवार निवडून आले आहेत. सत्ताधारी शिवसेनेच्या तिकिटावर पहिल्यांदा दोन मुस्लीम सदस्यांना सभागृहात जाण्याची संधी मिळाली आहे.नव्या सभागृहामध्ये मोठ्या पराभवाला सामोरे गेलेल्या काँग्रेसकडून सर्वाधिक ११ नगरसेवक आहेत. तर ९ सदस्य असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा आणि समाजवादी पार्टीचे सर्व सहा नगरसेवक मुस्लीम आहेत. सेना, एमआयएम व अपक्ष म्हणून प्रत्येकी दोन सदस्य निवडून आले आहेत. त्यांच्याकडून समाजाच्या विकासासाठी प्रयत्न केले जाण्याची आशा वर्तविली जात आहे. २२७ जागांपैकी सुमारे ५० प्रभागांत मुस्लीम मतांची संख्या निर्णायक आहे. त्याचा विचार करून भाजपा, सेनासहित सर्व प्रमुख पक्षांनी एकूण १९७ मुस्लीम उमेदवारांना संधी दिली होती. त्यामध्ये ९१ महिला उमेदवार होत्या. अपक्ष मुस्लीम उमेदवारांची संख्या जवळपास अडीचशेवर होती. या सर्वामधून प्रत्यक्षात एकूण २९ जणांना सभागृहात जाण्याची संधी मिळाली आहे.सपाने सर्वाधिक ५८ मुस्लीम उमेदवार दिले होते. तर एमआयएमने ५४, राष्ट्रवादीने ४१ तर कॉँग्रेसच्या तिकिटावर २९ जण उभे होते. सत्तेसाठी लढणाऱ्या सेना व भाजपाने मुस्लीमबहुल वस्तीतून प्रत्येकी ५ जणांना आणि मनसेने ४ जणांना उमेदवारी दिली होती. भाजपा व मनसे वगळता अन्य पक्षातून मुस्लीम चेहरे सभागृहात आले आहेत. चंगेज मुलतानी व मुमताज खान हे दोन अपक्ष विजयी झाले. >धनुष्यबाणावर पहिल्यांदाच विजयीमहापालिकेवर गेल्या २२ वर्षांपासून सत्तेत असलेल्या शिवसेनेतर्फे आतापर्यंत एकही मुस्लीम सदस्य निवडून आला नव्हता. या वेळी मात्र वॉर्ड क्रमांक ६४मधून शहिदा खान व ९६मधून मोहम्मद हलीम खान धनुष्यबाण चिन्हावर विजयी झाले. सत्तेसाठीची ‘मॅजिक फिगर’ गाठण्यासाठी ६२ व १०२ वॉर्डमधून विजयी झालेल्या अनुक्रमे चंगेज मुलतानी व मुमताज खान या अपक्षांना आपल्याकडे ओढण्यात सेना यशस्वी झाली आहे.मुंबईत जवळपास ५० वॉर्डांमध्ये मुस्लीम समाजाची लोकसंख्या अधिक आहे. भायखळा, नागपाडा, माहीम, कुर्ला, गोवंडी, मालाड, वांद्रे, बेहरामपाडा, चांदिवली, मानखुर्द, शिवाजीनगर आदी भागांचा प्रामुख्याने समावेश आहे. निवडणुकीत मुस्लीम उमेदवारांची संख्या अधिक असली तरी बहुतांश जण एकमेकांच्या विरोधात उभे राहतात. एकाच निवडणुकीत विजयी झालेल्या मुस्लीम उमेदवारांचा आकडा २३च्या वरती कधी गेलेला नव्हता. यंदा मात्र त्यामध्ये आणखी सहाने वाढ झाली.