शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

फुकट्या प्रवाशांना सहा लाखांचा दंड

By admin | Updated: January 29, 2015 00:08 IST

रेल्वे सुरक्षा दलाची कारवाई : साडेतीन हजार जणांकडून वसुली; भिकारी, तृतीयपंथीयांचा समावेश--लोकमत विशेष

सदानंद औंधे - मिरज --मिरज रेल्वे सुरक्षा दलाने कोल्हापूर, मिरज, सांगली स्थानकात फुकटे प्रवासी, फेरीवाले, भिकारी, तृतीयपंथी व रेल्वे कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या ३६५९ जणांकडून वर्षभरात ८ लाख ६५ हजार रुपये दंड वसूल केला आहे. यापैकी २०४१ फुकटे प्रवासी असून, त्यांनी ५ लाख ९८ हजार रुपये दंड भरला आहे. रेल्वे कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या प्रवाशांना, भिकाऱ्यांना, फेरीवाल्यांना व तृतीयपंथीयांना पकडून प्रत्येक महिन्यातून दोनवेळा मिरजेत येणाऱ्या रेल्वेच्या फिरत्या न्यायालयासमोर हजर करण्यात येते. रेल्वे कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल शंभर ते एक हजारापर्यंत दंड किंवा तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे. मात्र तरीही रेल्वे कायद्याला न जुमानणाऱ्या प्रवासी, भिकारी, फेरीवाले, तृतीयपंथीयांच्या संख्येत वाढच होत आहे. २०१३ मध्ये रेल्वे सुरक्षा दलाने वर्षभरात ६ लाख रुपये दंड वसूल केला होता; मात्र गतवर्षी दंडाच्या रकमेत वाढ होऊन ही रक्कम ८ लाख ६५ हजारांपर्यंत पोहोचली आहे. कोल्हापूर, सांगली ते साताऱ्यापर्यंत रेल्वे सुरक्षा दलाने तिकीट तपासनीसांसोबत मोहीम राबवून वर्षभरात पॅसेंजर व एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या २०४१ फुकट्या प्रवाशांना पकडले. त्यांच्याकडून तब्बल ५ लाख ९८ हजार रुपये दंड वसूल केला आहे. याशिवाय विनाकारण साखळी ओढून रेल्वेला विलंब करणारे, रेल्वेच्या आरक्षित तिकिटांचा काळाबाजार करणारे, अनधिकृत तिकीट एजंट, फेरीवाले, भिकारी, तृतीयपंथी, रेल्वेत व रेल्वेस्थानकात अस्वच्छता करणारे, नियमबाह्य रेल्वेरुळ ओलांडणारे, रेल्वेच्या प्रवेशद्वारात लोंबकळत धोकादायक प्रवास करणारे, आरक्षित महिलांच्या डब्यातून प्रवास करणारे, रेल्वेत धूम्रपान करणारे, विनाकारण साखळी ओढून गाडी थांबविणारे व धावत्या रेल्वेत भांडण, मारामारी करणारे, रेल्वे सिग्नलची केबल तोडणारे, रेल्वेच्या प्रवेशद्वाराला ठोकरून नुकसान करणारे वाहनधारक अशा १६१८ जणांना पकडून त्यांच्याकडून २ लाख ६५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आल्याची माहिती रेल्वे सुरक्षा दलाचे निरीक्षक गोकुळ सोनोनी यांनी दिली.भिकाऱ्यांना पकडून होते फसगतमिरज, सांगली व कोल्हापूरसह विविध स्थानकांत भिकाऱ्यांची संख्या मोठी आहे. रेल्वेत प्रवाशांकडून भीक मागणाऱ्या तृतीयपंथीयांच्या टोळ्याही सक्रिय आहेत. मात्र वर्षभरात केवळ ४० भिकारी व तृतीयपंथीयांवरच कारवाई झाली आहे. भिकारी पकडले गेल्यावर दंड भरण्यास नकार देतात. दंड न भरणाऱ्यांना पुणे येथील कारागृहात पाठवावे लागते. पुणे येथील कारागृहात नेण्याचे सोपस्कार पार पाडण्यापेक्षा भिकाऱ्यांचा दंड भरून रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी सुटका करून घेतात. भिकाऱ्यांना पकडल्यानंतर त्यांच्याकडून दंड वसूल होत नसल्याने भिकाऱ्यांना हुसकावून लावण्यात येत असल्याची माहिती मिळाली.नियम मोडणारे प्रवासीसंख्या दंडविनातिकीट प्रवासी २०४१ ५,९८०००रुळ ओलांडणारे ९२९ ९२,९००अवैध फेरीवाले ३०६ १,०४,०००साखळी ओढणारे ९ ३१००भिकारी, तृतीयपंथी ४० १३,२००अनधिकृत तिकीट एजंट ९ ३०००नियम मोडणारे प्रवासीसंख्या दंडधोकादायक प्रवास करणारे १३१ १५,५००महिलांच्या डब्यातून प्रवास करणारे १४ १९००धूम्रपान करणारे १७ ३०००रेल्वे केबल चोरी १० १०,०००रेल्वे फाटकाचे नुकसान ६ ६०००गाडीत भांडण करणारे २ १६००