शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
3
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
4
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
5
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
6
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
7
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
8
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
9
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
10
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
11
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
12
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
13
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
14
Motorola: ६.८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP सेल्फी कॅमेरा आणि बरेच काही; मोटोरोलाचा नवा फोन लॉन्च!
15
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
16
मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार २०२५: उंबरठ्यावर करा 'हा' छोटा उपाय; अष्टलक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद!
17
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
18
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
19
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
20
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवासाठी पीएमपीच्या सहाशे जादा गाडया

By admin | Updated: August 29, 2016 17:26 IST

वैभवशाली परंपरा असलेल्या गणेशोत्सवासाठी राज्यभरातून भाविक पुण्यात येतात. तसेच शहराच्या आसपासच्या गावांमधील नागरिकही मोठया प्रमाणात येतात.

ऑनलाइन लोकमत 

पुणे, दि. 29 -  वैभवशाली परंपरा असलेल्या गणेशोत्सवासाठी राज्यभरातून भाविक पुण्यात येतात. तसेच शहराच्या आसपासच्या गावांमधील नागरिकही मोठया प्रमाणात येतात. या भाविकांनी रात्री उशीरा पर्यंत गणेशोत्सवाचा आनंद घेतल्यानंतर त्यांना परत आपल्या गावी जाता यावे यासाठी पीएमपी प्रशासनाने कंबर कसली असून या वर्षी गणेशोत्सवाच्या शेवटाच्या आठ दिवसात पीएमपीकडून प्रतिदिवशी तब्बल 622 जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. नियमित गाडयां व्यक्तीरिक्त या जादा गाडया असणार असून त्यासाठी आवश्यक असलेल्या कर्मचा-यांच्या सुटटयाही प्रशसनाने रद्द केलेल्या आहेत. येत्या 8 ते 15 सप्टेंबर दरम्यान, शहरातील प्रमुख 13 डेपोंमधून या जादा गाड्या सोडण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

गणेशोत्सवासाठी शहराच्या उपनगरांमधून तसेच हददी जवळील गावांमधून मोठया प्रमाणात भाविक येतात.रात्री उशीरा पर्यंत देखावे सुरू असल्याने हे भाविकही रात्री थांबतात.मात्र, त्यानंतर त्यांना परत जाण्यासाठी वाहनांची सुविधा नसल्याने त्यांना सकाळ पर्यंत बसची वाट पाहत थांबावे लागते. त्यामुळे रात्री 10 पासूनच भाविकांना परत जाण्यासाठी या जादा गाडया सोडण्यात येणार आहेत. या जादा गाडयांना रात्री 11 वाजे पर्यंत नियमित तिकीट राहणार असून रात्री 11 नंतर तिकिटात 25 टक्के वाढ असणार आहे. तर रात्री 12 नंतर या जादागाडयांसाठी कोणतेही पास चालणार नाहीत. त्यामुळे भाविकांना तिकिट काढूनच प्रवास करावा लागणार आहे. 
 
मागणीनुसार गाडया वाढविणार 
पीएमपीकडून सर्व प्रमुख 13 डेपोंमधून या जादा गाडया सोडण्यात येणार आहेत. त्यासाठीचे नियोजन प्रशासनाने पूर्ण केले असून त्या बाबतच्या सूचना सर्व डेपो प्रमुखांना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार, गाडीला असलेली गर्दी तसेच प्रवाशांकडून केल्या जाणा-या मागणीनुसार, या गाडया सोडण्यात येणार आहेत. त्यासाठी 20 पेक्षा अधिक प्रवाशांनी मागणी केल्यानंतर गाडी उपलब्ध करून दिली जाणार आहे. प्रामुख्याने पीएमपीच्या हददीबाहेरील मार्गांसाठी ही जादा गाडयांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. त्यासाठी आवश्यकतेनुसार, चालक आणि वाहकांच्या सुटटयांही रद्द करण़्यात आल्या असून त्यांच्या वेळेचे नियोजन करण़्यात आले आहे.