शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
2
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
3
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
4
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
5
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
6
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
7
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
9
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
10
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!
11
Madhavi Latha : कष्टाचं फळ! १७ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर चिनाब पुलाचं स्वप्न साकार; कोण आहेत माधवी लता?
12
Swami Samartha: राशीनुसार करा स्वामींची उपासना मिळेल सुख-शांती आणि मिटेल वासना!
13
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
14
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
15
लग्नानंतर घरी कोणालाच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
16
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
17
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
18
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
19
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
20
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार

राज्यात सहा शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By admin | Updated: August 29, 2015 01:25 IST

राज्यात गेल्या दोन दिवसांत सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यात विदर्भ व मराठवाड्यातील प्रत्येकी तीन शेतकऱ्यांचा समावेश आहे. कर्जबाजारीपण, नापिकी व दुष्काळ ही त्यांच्या

मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसांत सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यात विदर्भ व मराठवाड्यातील प्रत्येकी तीन शेतकऱ्यांचा समावेश आहे. कर्जबाजारीपण, नापिकी व दुष्काळ ही त्यांच्या आत्महत्येची कारणे आहेत. यवतमाळ जिल्ह्यात महागाव तालुक्यात दगडथर येथील अशोक रामराव जटाळे (२९) यांनी गुरुवारी विष प्राशन केले. त्यांच्याकडे आठ एकर कोरडवाहू जमीन असून, त्यांच्यावर राष्ट्रीयीकृत बँकेचे ९० हजार रुपयांचे कर्ज आहे. चंद्रपूर सिंदेवाही तालुक्यातील कळमगाव येथील दिलीप कामडी यांनी शेतातच गळफास घेऊन आत्महत्या केली. वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील सेलडोह येथील मंगेश रामाजी राऊत (२८) यांनी गुरुवारी शेतात विष प्राशन केले. मराठवाड्यात प्रभाकर गणपतराव खांडे (६५, मच्छिंद्रनाथ चिंचोली, जि. जालना), कौतिकराव आनंदा ठाले (३७, वाडी बु., जि. जालना) आणि पुंडलिक मरीबा गवलवाड (५५, कोळनूर, जि. नांदेड) यांनी आत्महत्या केली. खांडे यांना तीन एकर शेती आहे. दरवर्षी शेतात खर्च जास्त आणि उत्पन्न कमी, अशी त्यांची स्थिती होती. त्यांच्यावर ५० हजार रुपये कर्ज आहे. भोकरदन तालुक्यातील वाडी बु. येथील कौतिकराव यांच्यावर ३ लाखांचे कर्ज होते. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. पुंडलिक गवलवाड यांच्या नावावर ३५ हजार रुपयांचे पीक कर्ज होते़ त्याचे नूतनीकरण करण्यासाठी त्यांनी खासगी सावकाराकडूनही कर्ज काढले होते़ (लोकमत न्यूज नेटवर्क)