शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
3
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
4
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
5
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
6
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
7
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
8
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
9
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
10
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
11
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
12
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
13
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
14
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
15
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
16
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
17
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
18
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
19
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ

कुटुंबातील सहा जणांची आत्महत्या

By admin | Updated: June 29, 2016 05:25 IST

शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरू असतानाच विदर्भात एकाच कुटुंबातील सहा जणांनी विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी दुपारी घडली.

अंजनगाव सुर्जी (अमरावती) : शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरू असतानाच विदर्भात एकाच कुटुंबातील सहा जणांनी विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी दुपारी घडली. मृतांमध्ये चार भावंडं आणि त्यांच्या दोन भाच्यांचा समावेश आहे. या कुटुंबातील सर्व सदस्य अविवाहित होते, त्याच नैराश्यातून त्यांनी जीवन संपवले असावे, अशी चर्चा आहे. चव्हाण कुटुंबाचे राहत्या घराशेजारीच किराणा दुकान असून, ‘बिट्टीबाईचे दुकान’ म्हणून ते अंजनगावात प्रसिद्ध आहे. मृत लक्ष्मी व मंगला यांची आई उषाबाई बारड या याच परिसरात काही अंतरावर मुलगा रोशनसह राहतात. मंगळवारी दुपारपर्यंत चव्हाण यांचे किराणा दुकान व घर उघडले नाही. त्यामुळे शेजाऱ्यांना शंका आली. त्यांनी रोशनला याची माहिती दिली असता त्याने घरात वरून प्रवेश केला. आतील दृश्य पाहून तो नि:शब्द झाला. थोड्या वेळाने हंबरडा फोडत तो घराबाहेर आला. त्यानंतर परिसरातील नागरिक घटनास्थळी जमा झाले. घरात दोन महिला, दोन मुलींसह दोन पुरुष मृतावस्थेत आढळून आले. त्यांच्या शेजारी मोनोक्रोटोफॉस नामक विषारी औषधांच्या दोन बाटल्या आढळल्या. घटनेचे वृत्त परिसरात वाऱ्यासारखे पसरताच घटनास्थळी बघ्यांची प्रचंड गर्दी जमली होती. घटनेमागचे कारण शोधण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)> मृतांमध्ये प्रफुल्ल नारायण चव्हाण (४८), विवेक नारायण चव्हाण (४०), लक्ष्मी नारायण चव्हाण (५०), मंगला नारायण चव्हाण (५२) ही बहीणभावंडे आणि कामिनी अरूण बारड (२९) व रोशनी अरूण बारड (२६) या दोन भाची यांचा समावेश आहे. या घटनेने अंजनगाव सुर्जी हादरून गेले आहे.