शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

सहा जिल्ह्यांचे नकाशे डिजिटल

By admin | Updated: January 7, 2017 01:00 IST

राज्यातील सहा जिल्ह्यांचे डिजिटल नकाशे तयार करण्याची विषेश मोहीम भूमिअभिलेख विभागामार्फत हाती घेण्यात आली आहे.

पुणे : राज्यातील सहा जिल्ह्यांचे डिजिटल नकाशे तयार करण्याची विषेश मोहीम भूमिअभिलेख विभागामार्फत हाती घेण्यात आली आहे. डिजिटल नकाशे तयार झाल्यास, जमिनींच्या गैरव्यवहारांना ‘चाप’ बसण्यास मदत होणार असून, शेताच्या बांधावरून भावकी-गावकीत होणारे तंटे निकालात निघणार आहेत. केंद्र शासनाच्या डिजिटल इंडिया भूमिअभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमाांतर्गत (एनएलआरएम) देशभरात डिजिटल नकाशे तयार करण्याचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यासाठी केंद्र आणि राज्य पन्नास टक्के निधी उपलब्ध करून देणार आहे. या मोहिमेसाठी दीडशे कोटींचा खर्च अपेक्षित असून, या खर्चाला शासनाने मान्यता दिली आहे. या प्रकल्पामुळे जमिनीच्या चतु:सीमा तसेच जमिनीच्या मालकीवरुन होणारे तंटे आदी विषयांबाबत सुसूत्रता येण्यास मदत होणार आहे. राज्यातही डिजिटल नकाशे तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले असून, एप्रिल २०१८पर्यंत पहिल्या टप्प्यात राज्यातील सहा जिल्ह्यांचे डिजिटल नकाशे करण्यात येणार असल्याची माहिती भूमिअभिलेख विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. अनेकदा शेतीच्या सीमा रेषा आणि तिचे तुकडे कसे करावेत यावरून वाद असतात़ बांधाच्या वादाचे अनेक खटले हे न्यायालयात पिढ्यान् पिढ्या पडून आहेत़ यावर मार्ग काढण्यासाठी आता केंद्र आणि राज्य सरकारने डिजिटल इंडिया या कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय कार्यक्रम हाती घेतला आहे़ त्यासाठी मुंबई वगळून नागपूर, अमरावती, नाशिक, औरंगाबाद, रायगड आणि पुणे या सहा जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. या राष्ट्रीय कार्यक्रमात राज्य सरकारचा सहभाग असणार आहे़ पुणे जिल्ह्याची यात निवड झाल्याने भूमी अभिलेख कार्यालयात यासाठी निविदा प्रकिया राबविण्यात आली आहे़ त्यासाठी १५० कोटी रुपये खर्च केले जाणार असून, त्यासाठी एजन्सीची नियुक्ती करण्यात आली आहे़ केंद्राच्या या खास कार्यक्रमांतर्गत वेळप्रसंगी अधिकचा खर्च करण्याची तयारी राज्य सरकाराने दाखवली आहे. येत्या वर्षभरात नकाशांचे डिजिटायझेशन पूर्ण झाल्यानंतर, सात-बाऱ्यावर डिजिटल सही उपलब्ध होणार आहे़ (प्रतिनिधी)>सात-बारा आॅनलाइन आणि ई-फेरफार या नंतर सहा जिल्ह्यांतील तेरा प्रकारच्या जमिनींच्या नकाशांचे डिजिटल इंडिया भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत आता सूक्ष्म पद्धतीने डिजिटायझेशन केले जाणार आहे़ त्यामुळे जमिनींचे सहजपणे तुकडे करता येणार असून, पोटहिस्सा निश्चितीकरण करता येणार आहे़