शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
3
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
4
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
5
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
6
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
7
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
8
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन फेका
9
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
10
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
11
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
12
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
13
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
14
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
15
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
16
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
17
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
18
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
19
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
20
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण

खूनप्रकरणी सहा आरोपी निदरेष

By admin | Updated: September 2, 2014 02:30 IST

सांगली जिल्ह्याच्या मिरज तालुक्यातील आरग गावातील गावडे वस्तीत आठ वर्षापूर्वी झालेल्या एकाच कुटुंबातील सहा व्यक्तींच्या खून खटल्यातून सर्व आरोपी सबळ पुराव्याअभावी निदरेष सुटले आहेत.

मुंबई : सांगली जिल्ह्याच्या मिरज तालुक्यातील आरग गावातील गावडे वस्तीत आठ वर्षापूर्वी झालेल्या एकाच कुटुंबातील सहा व्यक्तींच्या खून खटल्यातून सर्व आरोपी सबळ पुराव्याअभावी निदरेष सुटले आहेत.
14 आणि 15 जून 2क्क्6 दरम्यानच्या रात्री बाळू अमण्णा गावडे, त्यांची पत्नी शिरमाबाई, मुलगा सुनील, मुलगी छायाबाई उर्फ छकुली, विवाहित मुलगी जयश्री अमोल वाघमोडे आणि चुलती शांताबाई आनंदा गावडे या सहा जणांचा डोक्यात लाकडी सोटय़ाने प्रहार करून त्यांच्या राहत्या घरात खून करण्यात आले होते. कोणीही फोन उचलत नाही अथवा दरवाजाही उघडत नाही असे लक्षात आल्यावर काहीतरी विपरीत घडल्याचा संशय आला. घराच्या पाठीमागून जाऊन पाहिले असता छपराची काही कौले काढलेली आढळली व त्यातून आत पाहिले असता सहा जणांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले होते.
या खुनांबद्दल मृतांच्याच भावकीतील मनोज महादेव गावडे, महादेव अमण्णा गावडे, मालुबाई पांडुरंग गावडे, मंगल महादेव गावडे, सुरेश दत्तू गावडे आणि पोपट उर्फ नितेश महालू माने-वावरे अशा सहा आरोपींवर सांगली सत्र न्यायालयात खटला चालला होता. त्या न्यायालयाने मंगल व सुरेश यांना निदरेष ठरवून बाकीच्यांना जन्मठेप ठोठावली होती. सत्र न्यायालयाच्या निकालाविरुद्ध मनोज, महादेव, मालुबाई व पोपट यांनी केलेली अपिले मंजूर करून उच्च न्यायालयाच्या न्या. विजया कापसे ताहिलरामाणी व न्या. अजय गडकरी यांच्या खंडपीठाने त्यांची निदरेष मुक्तता केली. त्यामुळे खुनांनंतर आता आठ वर्षानी सर्व आरोपी निदरेष ठरले आहेत. (विशेष प्रतिनिधी)
 
खून झाले त्याच्या आदल्या संध्याकाळी मालुबाईने मयत झालेल्या सर्व व्यक्तींना आपल्या घरी चहासाठी बोलाविले होते. चहातून तिने त्यांना धोत्र्याच्या बियांची पूड खायला घातली. त्यामुळे बाळू गावडे व कुटुंबीय मूच्र्छितावस्थेत गेल्यावर डोक्यात सोडय़ाचे वार करून त्यांचे खून करण्यात आले, असे अभियोग पक्षाचे म्हणणो होते. मृतांच्या पोटातील अन्नांशातही धोत्र्याचे विष आढळले होते. ज्या झाडांची धोत्र्याची फळे काढली होती ती मालुबाईने स्वत:हून दाखविली व पोलिसांनी ती ताब्यातही घेतली होती. परंतु तरीही एवढय़ावरून मालुबाईने खुनांच्या आधी सर्वाना धोत्र्याचे बी खायला घातले हे निर्विवादपणो सिद्ध होत नाही, असे खंडपीठाने म्हटले.