शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

वस्तूस्थिती वेगळीच!

By admin | Updated: May 10, 2015 00:51 IST

आम्ही रेल्वे मंत्रालयाला ६० पत्रे पाठविली मात्र रेल्वेमंत्र्यांनी आजपर्यंत उत्तर दिलेले नाही. ऊर्जामंत्री पियूष गोयल यांच्याकडे विजेबाबत अनेक वेळा तक्रारी

पुण्य प्रसून वाजपेयी, (लेखक राजकीय विश्लेषक आहेत.) -

आम्ही रेल्वे मंत्रालयाला ६० पत्रे पाठविली मात्र रेल्वेमंत्र्यांनी आजपर्यंत उत्तर दिलेले नाही. ऊर्जामंत्री पियूष गोयल यांच्याकडे विजेबाबत अनेक वेळा तक्रारी केल्या पण उत्तर नाही. गंगा- घाघरा नदीमुळे जेपींचे सिताबदियारा गाव बुडण्याचा धोका आहे, पण गंगा पुनरुद्धार मंत्री उमा भारती यांच्याकडे तक्रार ऐकायला वेळ नाही. तुम्ही म्हणता वर्ष पूर्ण होत असताना सरकारच्या कामगिरीकडे लक्ष वेधण्यासाठी खासदारांनी आपापल्या मतदारसंघात जावे. वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे. दोन- दोन लाखांमध्ये शौचालय बनविण्याचे कंत्राट दिल्लीतून मिळविले जाते. हेच कंत्राट ४०-४० हजारांत विकल्यानंतर एक पोते सिमेंट आणि २० पोती वाळूमध्ये उभे राहिलेले शौचालय टिकणार कसे? हे सर्व कंत्राटही समाजवादी पक्षाने मिळविले आहे.... बलियाचे खासदार भरतसिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सुनावलेले हे खडे बोल ऐकून भाजपच्या अन्य खासदारांनी टाळ्या वाजवण्याची हिंमत दाखविली. तथापि हा टाळ्या उपलब्धी नसून अतिशय अवघड परिस्थितीत बोलण्याचे स्वातंत्र्य अनुभवणे होते, कारण दुसऱ्याच दिवशी उत्तर प्रदेशच्या प्रभारी सरचिटणीसांनी भरतसिंग यांना चूप केले.सरकारच्या पहिल्या वर्षी भाजपच्या खासदारांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्यही हिरावून घेतले गेले काय? मोदींनी पंतप्रधान बनण्यासाठी नेहमी नाऱ्यांच्या सूरात केलेल्या सवालांना जनतेने सूर मिसळत ताकद दिली होती. तेच प्रश्न आता संसदीय राजकारणावर भारी पडत आहेत, हे पहिल्याच वर्षाने मोदींना दाखवून दिले काय? पहिल्यांदाच देशाचा निवडणूक जनादेश जनभावनेचा समावेश करणारा ठरला. लुटियन्सच्या दिल्लीला हरविणारा असा हा जनादेश होता. मुक्त आर्थिक धोरणाची रेषा १९९१ मध्ये ओढण्यात आली तेव्हा मोदींनीच पहिल्यांदा आपल्या भाषणांमधून आरसा दाखविला. सर्व राजकीय मर्यादा ओलांडत त्यांनी त्यांनी ही भावना राजकीय वर्तुळात आणली तेव्हा पहिल्यांदा वाटले की अडगळीत पडलेल्या घटकांनाही स्वत:चे विचार असतात. त्यामुळेच २६ मे २०१४ रोजी पहिल्यांदा भाजपचे मुख्याल ते रा.स्व. संघाच्या मुख्यालयापर्यंत प्रत्येकाला विजयात मोदींच्या मागे उभे ठाकण्याशिवाय आपली कोणतीही भागीदारी राहिली नाही याची जाणीव झाली. त्यावेळी बलियाच्याच नव्हे तर भाजपच्या विजयी झालेल्या २८१ खासदारांनी मोदी पंतप्रधान बनतील तर प्रत्येक काम पूर्ण होईल असाच विश्वास व्यक्त केला होता. सत्ता परितर्वन म्हणजे मोदींनी पंतप्रधान बनणे व मोदींना मत मिळणे हाच जनमताचा अर्थ त्यावेळी काढण्यात आला होता. वर्षभरापूर्वी मोदी शपथ घेत होते त्यावेळी सुषमा स्वराज व राजनाथसिंग यांच्यासारखे बडे नेते जिंकूनही पराभूत वाटत होते. पराभूत झालेले जेटली मोदींच्या प्रसन्न होते. जनतेने निवडून दिलेल्यांना बाजूला सारत मोदींनी राज्यसभा सदस्यांना महत्त्व दिले. जेटली, स्मृती इराणी यांना पराभूत होऊनही मंत्रिपद मिळाले. त्यामुळे जनतेच्या अपेक्षांचे ओझे न वाहता पीएमओच्या लाल भिंतीआडून देशाचा कारभार चालवला जावा हाच उद्देश असावा.