शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: लखनौच्या अडचणीत वाढ, दुखापतीमुळं मयांक यादव स्पर्धेतून बाहेर!
2
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
3
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
4
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
5
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
6
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
7
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
8
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
9
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
10
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
11
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
12
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
13
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
14
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
15
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
16
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
17
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
18
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
19
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
20
Nagpur: संधी मिळताच प्रवाशांना लुटायचे, रेल्वे स्थानकांवर चोऱ्या करणारी टोळी अटकेत

वस्तूस्थिती वेगळीच!

By admin | Updated: May 10, 2015 00:51 IST

आम्ही रेल्वे मंत्रालयाला ६० पत्रे पाठविली मात्र रेल्वेमंत्र्यांनी आजपर्यंत उत्तर दिलेले नाही. ऊर्जामंत्री पियूष गोयल यांच्याकडे विजेबाबत अनेक वेळा तक्रारी

पुण्य प्रसून वाजपेयी, (लेखक राजकीय विश्लेषक आहेत.) -

आम्ही रेल्वे मंत्रालयाला ६० पत्रे पाठविली मात्र रेल्वेमंत्र्यांनी आजपर्यंत उत्तर दिलेले नाही. ऊर्जामंत्री पियूष गोयल यांच्याकडे विजेबाबत अनेक वेळा तक्रारी केल्या पण उत्तर नाही. गंगा- घाघरा नदीमुळे जेपींचे सिताबदियारा गाव बुडण्याचा धोका आहे, पण गंगा पुनरुद्धार मंत्री उमा भारती यांच्याकडे तक्रार ऐकायला वेळ नाही. तुम्ही म्हणता वर्ष पूर्ण होत असताना सरकारच्या कामगिरीकडे लक्ष वेधण्यासाठी खासदारांनी आपापल्या मतदारसंघात जावे. वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे. दोन- दोन लाखांमध्ये शौचालय बनविण्याचे कंत्राट दिल्लीतून मिळविले जाते. हेच कंत्राट ४०-४० हजारांत विकल्यानंतर एक पोते सिमेंट आणि २० पोती वाळूमध्ये उभे राहिलेले शौचालय टिकणार कसे? हे सर्व कंत्राटही समाजवादी पक्षाने मिळविले आहे.... बलियाचे खासदार भरतसिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सुनावलेले हे खडे बोल ऐकून भाजपच्या अन्य खासदारांनी टाळ्या वाजवण्याची हिंमत दाखविली. तथापि हा टाळ्या उपलब्धी नसून अतिशय अवघड परिस्थितीत बोलण्याचे स्वातंत्र्य अनुभवणे होते, कारण दुसऱ्याच दिवशी उत्तर प्रदेशच्या प्रभारी सरचिटणीसांनी भरतसिंग यांना चूप केले.सरकारच्या पहिल्या वर्षी भाजपच्या खासदारांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्यही हिरावून घेतले गेले काय? मोदींनी पंतप्रधान बनण्यासाठी नेहमी नाऱ्यांच्या सूरात केलेल्या सवालांना जनतेने सूर मिसळत ताकद दिली होती. तेच प्रश्न आता संसदीय राजकारणावर भारी पडत आहेत, हे पहिल्याच वर्षाने मोदींना दाखवून दिले काय? पहिल्यांदाच देशाचा निवडणूक जनादेश जनभावनेचा समावेश करणारा ठरला. लुटियन्सच्या दिल्लीला हरविणारा असा हा जनादेश होता. मुक्त आर्थिक धोरणाची रेषा १९९१ मध्ये ओढण्यात आली तेव्हा मोदींनीच पहिल्यांदा आपल्या भाषणांमधून आरसा दाखविला. सर्व राजकीय मर्यादा ओलांडत त्यांनी त्यांनी ही भावना राजकीय वर्तुळात आणली तेव्हा पहिल्यांदा वाटले की अडगळीत पडलेल्या घटकांनाही स्वत:चे विचार असतात. त्यामुळेच २६ मे २०१४ रोजी पहिल्यांदा भाजपचे मुख्याल ते रा.स्व. संघाच्या मुख्यालयापर्यंत प्रत्येकाला विजयात मोदींच्या मागे उभे ठाकण्याशिवाय आपली कोणतीही भागीदारी राहिली नाही याची जाणीव झाली. त्यावेळी बलियाच्याच नव्हे तर भाजपच्या विजयी झालेल्या २८१ खासदारांनी मोदी पंतप्रधान बनतील तर प्रत्येक काम पूर्ण होईल असाच विश्वास व्यक्त केला होता. सत्ता परितर्वन म्हणजे मोदींनी पंतप्रधान बनणे व मोदींना मत मिळणे हाच जनमताचा अर्थ त्यावेळी काढण्यात आला होता. वर्षभरापूर्वी मोदी शपथ घेत होते त्यावेळी सुषमा स्वराज व राजनाथसिंग यांच्यासारखे बडे नेते जिंकूनही पराभूत वाटत होते. पराभूत झालेले जेटली मोदींच्या प्रसन्न होते. जनतेने निवडून दिलेल्यांना बाजूला सारत मोदींनी राज्यसभा सदस्यांना महत्त्व दिले. जेटली, स्मृती इराणी यांना पराभूत होऊनही मंत्रिपद मिळाले. त्यामुळे जनतेच्या अपेक्षांचे ओझे न वाहता पीएमओच्या लाल भिंतीआडून देशाचा कारभार चालवला जावा हाच उद्देश असावा.