शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

वस्तूस्थिती वेगळीच!

By admin | Updated: May 10, 2015 00:51 IST

आम्ही रेल्वे मंत्रालयाला ६० पत्रे पाठविली मात्र रेल्वेमंत्र्यांनी आजपर्यंत उत्तर दिलेले नाही. ऊर्जामंत्री पियूष गोयल यांच्याकडे विजेबाबत अनेक वेळा तक्रारी

पुण्य प्रसून वाजपेयी, (लेखक राजकीय विश्लेषक आहेत.) -

आम्ही रेल्वे मंत्रालयाला ६० पत्रे पाठविली मात्र रेल्वेमंत्र्यांनी आजपर्यंत उत्तर दिलेले नाही. ऊर्जामंत्री पियूष गोयल यांच्याकडे विजेबाबत अनेक वेळा तक्रारी केल्या पण उत्तर नाही. गंगा- घाघरा नदीमुळे जेपींचे सिताबदियारा गाव बुडण्याचा धोका आहे, पण गंगा पुनरुद्धार मंत्री उमा भारती यांच्याकडे तक्रार ऐकायला वेळ नाही. तुम्ही म्हणता वर्ष पूर्ण होत असताना सरकारच्या कामगिरीकडे लक्ष वेधण्यासाठी खासदारांनी आपापल्या मतदारसंघात जावे. वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे. दोन- दोन लाखांमध्ये शौचालय बनविण्याचे कंत्राट दिल्लीतून मिळविले जाते. हेच कंत्राट ४०-४० हजारांत विकल्यानंतर एक पोते सिमेंट आणि २० पोती वाळूमध्ये उभे राहिलेले शौचालय टिकणार कसे? हे सर्व कंत्राटही समाजवादी पक्षाने मिळविले आहे.... बलियाचे खासदार भरतसिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सुनावलेले हे खडे बोल ऐकून भाजपच्या अन्य खासदारांनी टाळ्या वाजवण्याची हिंमत दाखविली. तथापि हा टाळ्या उपलब्धी नसून अतिशय अवघड परिस्थितीत बोलण्याचे स्वातंत्र्य अनुभवणे होते, कारण दुसऱ्याच दिवशी उत्तर प्रदेशच्या प्रभारी सरचिटणीसांनी भरतसिंग यांना चूप केले.सरकारच्या पहिल्या वर्षी भाजपच्या खासदारांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्यही हिरावून घेतले गेले काय? मोदींनी पंतप्रधान बनण्यासाठी नेहमी नाऱ्यांच्या सूरात केलेल्या सवालांना जनतेने सूर मिसळत ताकद दिली होती. तेच प्रश्न आता संसदीय राजकारणावर भारी पडत आहेत, हे पहिल्याच वर्षाने मोदींना दाखवून दिले काय? पहिल्यांदाच देशाचा निवडणूक जनादेश जनभावनेचा समावेश करणारा ठरला. लुटियन्सच्या दिल्लीला हरविणारा असा हा जनादेश होता. मुक्त आर्थिक धोरणाची रेषा १९९१ मध्ये ओढण्यात आली तेव्हा मोदींनीच पहिल्यांदा आपल्या भाषणांमधून आरसा दाखविला. सर्व राजकीय मर्यादा ओलांडत त्यांनी त्यांनी ही भावना राजकीय वर्तुळात आणली तेव्हा पहिल्यांदा वाटले की अडगळीत पडलेल्या घटकांनाही स्वत:चे विचार असतात. त्यामुळेच २६ मे २०१४ रोजी पहिल्यांदा भाजपचे मुख्याल ते रा.स्व. संघाच्या मुख्यालयापर्यंत प्रत्येकाला विजयात मोदींच्या मागे उभे ठाकण्याशिवाय आपली कोणतीही भागीदारी राहिली नाही याची जाणीव झाली. त्यावेळी बलियाच्याच नव्हे तर भाजपच्या विजयी झालेल्या २८१ खासदारांनी मोदी पंतप्रधान बनतील तर प्रत्येक काम पूर्ण होईल असाच विश्वास व्यक्त केला होता. सत्ता परितर्वन म्हणजे मोदींनी पंतप्रधान बनणे व मोदींना मत मिळणे हाच जनमताचा अर्थ त्यावेळी काढण्यात आला होता. वर्षभरापूर्वी मोदी शपथ घेत होते त्यावेळी सुषमा स्वराज व राजनाथसिंग यांच्यासारखे बडे नेते जिंकूनही पराभूत वाटत होते. पराभूत झालेले जेटली मोदींच्या प्रसन्न होते. जनतेने निवडून दिलेल्यांना बाजूला सारत मोदींनी राज्यसभा सदस्यांना महत्त्व दिले. जेटली, स्मृती इराणी यांना पराभूत होऊनही मंत्रिपद मिळाले. त्यामुळे जनतेच्या अपेक्षांचे ओझे न वाहता पीएमओच्या लाल भिंतीआडून देशाचा कारभार चालवला जावा हाच उद्देश असावा.