शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
3
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
4
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
5
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
6
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
7
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
8
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
9
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
10
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
11
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
12
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
13
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
14
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
15
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
16
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
17
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
18
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
19
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
20
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
Daily Top 2Weekly Top 5

देशातील परिस्थिती घातक पण परिवर्तनासाठी अनुकूलही

By admin | Updated: January 1, 2015 01:26 IST

सध्या देशात धर्मांध शक्तींनी सत्ता हस्तगत केली आहे. देशातील एकूण परिस्थिती पाहता अतिशय घातक परिस्थिती निर्माण झाली आहे. परंतु ही प्रतिकूल परिस्थिती जितकी घातक आहे, तितकीच

स्मृती व्याख्यानमाला : माकपा नेते कुमार शिराळकर यांचा विश्वास नागपूर : सध्या देशात धर्मांध शक्तींनी सत्ता हस्तगत केली आहे. देशातील एकूण परिस्थिती पाहता अतिशय घातक परिस्थिती निर्माण झाली आहे. परंतु ही प्रतिकूल परिस्थिती जितकी घातक आहे, तितकीच ती परिवर्तनाच्या चळवळीसाठी अनुकूल सुद्धा आहे, असा विश्वास मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य समितीचे सदस्य कॉ. कुमार शिराळकर यांनी आज येथे व्यक्त केला. मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीतर्फे बुधवारी हिंदी मोरभवन येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक जिल्हा सचिव कॉ. बी.पी. कश्यप यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची ५० वर्षे’ या विषयावर त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यात ते बोलत होते. पक्षाचे जिल्हा कमिटीचे सदस्य गोपाल दा चॅटर्जी अध्यक्षस्थानी होते. कॉ. शिराळकर यांनी सुरुवातीलाच कम्युनिस्टांच्या १०० वर्षातील जागतिक आंदोलनाचा आढावा सादर केला. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची देशात अनेक राज्यात सत्ता होती. परंतु आज परिस्थिती काय आहे. आम्ही कुठे आहोत, याचा विचार करण्याची गरज आहे. आम्ही आमच्या वैचारिकतेशी फारकत घेतल्यानेच ही परिस्थिती ओढावली आहे. त्यामुळेच धर्मांध शक्तींना फोफावता आले, हे आम्ही मान्य करायलाच हवे. आज देशात धर्मांध शक्तींद्वारे जे काही सुरू आहे ते अतिशय धोकादायक आहे. परंतु ही परिस्थिती कितीही घातक असली तरी खचून जाण्याची गरज नाही. याचा ताकदीने मुकाबला करण्यासाठी आम्हालाही आक्रमक व्हावे लागेल. यासाठी आमच्या बोथट झालेल्या राजकीय वैचारिक धारेला पुन्हा-पुन्हा घासून-घासून पूर्ववत करण्याची गरज आहे. त्यासाठी कम्युनिस्टांना पुन्हा समाजात लोकांमध्ये जाऊन काम करावे लागेल. आमच्या नेत्यांनी काही कार्यक्रम दिला आहे. त्यानुसार काम करावे लागेल. शेतकरी, दलित यांचे प्रश्न कायम आहे. त्या प्रश्नावर त्यांच्या शोषणाविरोधातील लढा आपलासा करावा लागेल. भांडवलदारांकडून निसर्गाचेही होणाऱ्या शोषणाविरोधातील लढ्याबाबतही कम्युनिस्टांनाही विचार करावा लागेल. समाजातील परिवर्तनवादी सर्व शक्तींना सोबत घेऊन परिवर्तनाची लढाई लढावी लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. गोपाल दा चॅटर्जी यांनी अध्यक्षीय भाषणात कम्युनिस्ट चळवळीचा आढावा घेतला. मनोहर मुळे यांनी संचालन केले. (प्रतिनिधी)