शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

टँकरच्या टपावर बसून ‘स्कूल चलें हम’

By admin | Updated: October 19, 2016 01:19 IST

शिक्षणाची आस तर स्वस्थ बसू देत नाही... पण शाळेत जाण्यासाठी चांगल्या सुविधा नाहीत.

शंकर कोरटकर,

लोणी देवकर- शिक्षणाची आस तर स्वस्थ बसू देत नाही... पण शाळेत जाण्यासाठी चांगल्या सुविधा नाहीत. अशा वेळी विद्यार्थ्यांना जीवाची पर्वा न करता चक्क टँकरच्या टपावर बसून प्रवास करावा लागत असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. लोणी देवकर या गावातील विद्यार्थ्यांवर ही दुर्दैवी वेळ आलेली आहे. शटल बसच्या कमी फेऱ्यांमुळे विद्यार्थ्यांवर येत असल्याचे कारण सध्या पुढे येत आहे. हात केला तरी न थांबणाऱ्या बस, तर शटल बसच्या कमी असणाऱ्या फेऱ्या, यामुळे पुणे-सोलापूर महामार्गालगत असणाऱ्या गावांमधील अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनी चक्क टँकर वा ट्रकच्या टपावर बसून धोकादायक पद्धतीने प्रवास करीत आहेत. त्यामुळे या भागात ताताडीने शटल बसच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी पालकवर्गातून केली जात आहे. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून दररोज हजारो लांबपल्ल्याच्या बस धावतात. या बस महामार्गावरील मोठ्या गावांमध्येच थांबा घेतात. तसेच या बसला शालेय विद्यार्थ्यांसाठी असणारा पासदेखील चालत नसल्याचे वाहक सांगतात. तसेच स्थानिक शटल बसच्या फेऱ्या कमी असल्यामुळे पळसदेव, लोणी देवकर, भिगवण आदी भागांत शिक्षणासाठी जाणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना धोकादायक पद्धतीने ट्रक, टँकरच्या टपावर बसून प्रवास करावा लागत आहे. विद्यार्थिनींनाही दररोज असा प्रवास करावा लागत असल्याने त्यांच्याही सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. या गंभीर प्रकाराकडे महामार्ग पोलीस अथवा स्थानिक पोलीस प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. >भलते धाडस करू नयेटँकरवर बसून प्रवास करताना हा धोकादायक प्रवास जीवावर देखील बेतू शकतो. टँकरचालकांनीही विद्यार्थ्यांना घेण्याचे असे भलते धाडस करू नये. तसेच शिक्षण घेणे सोपे व्हावे, त्यासाठी जीव धोक्यात घालावा लागू नये यासाठी विद्यार्थ्यांसाठी बस फेऱ्या तातडीने वाढवणे गरजेचे आहे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. >अपघात व्हायची वाट पाहताय का ?महामार्गावर दररोज मोठ्या प्रमाणावर वाहतूक असते. आम्ही आमच्या मुला-मुलींना शिकवायचे का नाही, एखादा मोठा अपघात झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल पालकांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे तातडीने इंदापूर आगाराने या भागात शटल बसच्या फेऱ्या वाढवाव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे.