शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

कऱ्हाडात भावंडांची आत्महत्या

By admin | Updated: April 5, 2017 05:57 IST

दोघा सख्ख्या भावांचे मृतदेह घेण्यास नातेवाईकांनी विरोध केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

कऱ्हाड ( जि. सातारा) : कर्जाच्या वाढत्या बोजामुळे आत्महत्या केलेल्या दोघा सख्ख्या भावांचे मृतदेह घेण्यास नातेवाईकांनी विरोध केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कर्जाच्या परतफेडीसाठी बँकांनी लावलेल्या तगाद्यामुळेच दोघांनी आत्महत्या केली असून कुटुंबावरील बँकांचे कर्ज माफ करावे, अशी मागणी नातेवाईक व ग्रामस्थांनी केली. पोलिसांनी त्यांची समजूत घालून मृतदेह त्यांच्या ताब्यात दिले.जगन्नाथ कृष्णा चव्हाण (४०) आणि लहान भाऊ विजय (३३, रा. वडगाव हवेली, ता. कऱ्हाड) अशी त्यांची नावे आहेत. कर्जाला कंटाळून विजयने विष प्राशन केल्यानंतर जगन्नाथने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. विद्यानगर व टेंभू येथे सोमवारी रात्री तासाच्या फरकात या दोन घटना घटल्या. या दोघांवर बँकांचे साठ लाखांहून अधिक कर्ज असल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आली. दोघांनी काही वर्षांपूर्वी दोन बँकांकडून कर्ज घेतले. ओगलेवाडी येथे कृषी सेवा केंद्र नावाचे दुकान सुरू केले. तसेच चार वर्षांपूर्वी सरकी पेंड तयार करण्याची जे. पी. अ‍ॅग्रो प्रोडक्टस् नावाची कंपनी त्यांनी कडेगाव (जि.सांगली) येथील औद्योगिक वसाहतीत सुरू केली. सुरुवातीला त्यांनी त्या कर्जाच्या रकमेची वेळेत परतफेड केली. मात्र, कालांतराने व्यवसाय डबघाईस आला. परिणामी, हे दोन्ही बंधू कर्जाच्या ओझ्याखाली दबले गेले. बँकांनी वसुलीसाठी त्यांना नोटीसाही पाठविल्या होत्या. त्यातूनच गेल्या काही दिवसांपासून ते तणावाखाली होते. त्यातूनच आत्महत्या केल्याचे नातेवाईकांनी सांगितले. (प्रतिनिधी)