शहरं
Join us  
Trending Stories
1
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
2
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
3
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
4
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
5
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
6
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
7
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
8
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
9
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
10
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
11
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
12
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
13
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
14
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
15
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
16
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
17
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
18
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
19
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
20
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार

कऱ्हाडात भावंडांची आत्महत्या

By admin | Updated: April 5, 2017 05:57 IST

दोघा सख्ख्या भावांचे मृतदेह घेण्यास नातेवाईकांनी विरोध केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

कऱ्हाड ( जि. सातारा) : कर्जाच्या वाढत्या बोजामुळे आत्महत्या केलेल्या दोघा सख्ख्या भावांचे मृतदेह घेण्यास नातेवाईकांनी विरोध केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कर्जाच्या परतफेडीसाठी बँकांनी लावलेल्या तगाद्यामुळेच दोघांनी आत्महत्या केली असून कुटुंबावरील बँकांचे कर्ज माफ करावे, अशी मागणी नातेवाईक व ग्रामस्थांनी केली. पोलिसांनी त्यांची समजूत घालून मृतदेह त्यांच्या ताब्यात दिले.जगन्नाथ कृष्णा चव्हाण (४०) आणि लहान भाऊ विजय (३३, रा. वडगाव हवेली, ता. कऱ्हाड) अशी त्यांची नावे आहेत. कर्जाला कंटाळून विजयने विष प्राशन केल्यानंतर जगन्नाथने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. विद्यानगर व टेंभू येथे सोमवारी रात्री तासाच्या फरकात या दोन घटना घटल्या. या दोघांवर बँकांचे साठ लाखांहून अधिक कर्ज असल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आली. दोघांनी काही वर्षांपूर्वी दोन बँकांकडून कर्ज घेतले. ओगलेवाडी येथे कृषी सेवा केंद्र नावाचे दुकान सुरू केले. तसेच चार वर्षांपूर्वी सरकी पेंड तयार करण्याची जे. पी. अ‍ॅग्रो प्रोडक्टस् नावाची कंपनी त्यांनी कडेगाव (जि.सांगली) येथील औद्योगिक वसाहतीत सुरू केली. सुरुवातीला त्यांनी त्या कर्जाच्या रकमेची वेळेत परतफेड केली. मात्र, कालांतराने व्यवसाय डबघाईस आला. परिणामी, हे दोन्ही बंधू कर्जाच्या ओझ्याखाली दबले गेले. बँकांनी वसुलीसाठी त्यांना नोटीसाही पाठविल्या होत्या. त्यातूनच गेल्या काही दिवसांपासून ते तणावाखाली होते. त्यातूनच आत्महत्या केल्याचे नातेवाईकांनी सांगितले. (प्रतिनिधी)