शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B व्हिसा पार्श्वभूमीवर एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
4
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
5
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
6
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
7
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
8
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
9
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
10
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
11
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
12
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
13
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
14
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
15
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
16
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
17
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
18
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
19
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
20
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  

नेरुळमधील संत गाडगेबाबा उद्यानावर पालिकेची अवकृपा

By admin | Updated: June 8, 2017 02:40 IST

सहा वर्षांमध्ये ११ लाख १२ हजार नागरिकांनी भेट दिलेल्या नेरूळमधील संत गाडगेबाबा उद्यानावर महापालिकेची अवकृपा सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : सहा वर्षांमध्ये ११ लाख १२ हजार नागरिकांनी भेट दिलेल्या नेरूळमधील संत गाडगेबाबा उद्यानावर महापालिकेची अवकृपा सुरू आहे. विद्युत व्यवस्था पूर्ववत करण्यात कंजुषी केली जात आहे. येथील कृत्रिम धबधबा व पाच ठिकाणच्या फाऊंटनची मोटार बिघडली असून ती दुरुस्त केली जात नाही. गाडगेबाबांचा पुतळा अंधारात असून लहान मुलांसाठीची टॉय ट्रेनही बंद असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेला संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानाचे तीन पुरस्कार मिळाले असून, १ कोटी ५ लाख रुपये बक्षीस मिळाले होते. या पैशामधून आयुक्त निवासाच्या मागील बाजूला रॉक गार्डन विकसित करण्यात येवून त्याला संत गाडगेबाबांचे नाव देण्यात आले. येथे लहान मुलांसाठी २ रुपये व प्रौढ नागरिकांसाठी फक्त ५ रुपये शुल्क आकारण्यात येत असल्याने वंडर्स पार्कपेक्षा येथे नागरिक गर्दी करत असतात. जानेवारी २०११ मध्ये उद्यानाचे लोकार्पण करण्यात आले असून आतापर्यंत ८ लाख ५० हजार ८०३ प्रौढ नागरिक व २ लाख ६१ हजार ७८५ लहान मुलांनी उद्यानाला भेट दिली आहे. उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाल्यामुळे रोज दीड ते दोन हजार नागरिक उद्यानाला भेट देत आहेत. परंतु मागील काही दिवसांपासून येथील ५० टक्के पथदिवे बंद आहेत. उद्यानामध्ये पाच ठिकाणी फाऊंटनची व्यवस्था केली आहे. एका ठिकाणी कृत्रिम धबधबा तयार केला असून तेथील पाणी उपसा करणाऱ्या मोटारी नादुरुस्त झाल्या आहेत. वारंवार तक्रारी केल्यानंतरही त्या दुरुस्त केल्या जात नाहीत. संत गाडगेबाबांचा पुतळाही अंधारात असून प्रशासन काहीही कार्यवाही करत नाही. उद्यानामधील टॉय ट्रेनही अनेक महिन्यांपासून बंद आहे. वास्तविक सहा वर्षांपूर्वी विकत घेतलेल्या टॉय ट्रेनची वॉरंटी संपली आहे. वारंवार नादुरुस्त होत आहे. नवीन टॉय ट्रेन विकत घेण्यास टाळाटाळ केली जात आहे. याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत नाही. कॅफेटेरीया सुरू करण्यात आलेला नाही. शहरातील महत्त्वाच्या उद्यानाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. विशेष म्हणजे महापालिकेचे आयुक्त याच ठिकाणी मॉर्निंग वॉकसाठी येत असतात. आयुक्त निवासाला लागून असलेल्या उद्यानाची दुरवस्था थांबविता येत नसेल तर इतर ठिकाणच्या उद्यानांची देखभाल कशी केली जाणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पालिकेकडे कर्मचारीही नाहीतसंत गाडगेबाबा उद्यानामध्ये तिकीट वसुलीसाठी व तीनही आवक, जावक गेटवर पालिकेचे कर्मचारी उपस्थित नसतात. सुरक्षा रक्षकांवर सर्व जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सुरक्षा रक्षकांना सुरक्षेऐवजी इतरच कामे करावी लागत असून भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.