शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सायन-पनवेल महामार्ग होणार खड्डेमुक्त !

By admin | Updated: October 3, 2016 02:54 IST

सायन-पनवेल मार्गावरील खड्ड्यांमुळे प्रवाशांचे कंबरडे मोडल्यानंतर अखेर टोल कंपनीला जाग आली आहे.

नवी मुंबई : सायन-पनवेल मार्गावरील खड्ड्यांमुळे प्रवाशांचे कंबरडे मोडल्यानंतर अखेर टोल कंपनीला जाग आली आहे. रस्त्यावरील खड्डे तात्पुरते बुजविण्यासाठी १५ दिवसांचा आराखडा तयार केला असून, त्यानंतर कायमचा उपाय केला जाणार आहे. परंतु अशातच पावसाने पुन्हा हजेरी लावल्यामुळे यात त्यांना कितपत यश येईल, याबाबत साशंकता आहे.सायन-पनवेल महामार्गावर दिवसाला लाखो छोट्या-मोठ्या वाहनांची ये-जा सुरू असते. परंतु सद्यस्थितीला या मार्गावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे प्रवाशांना त्रासदायक ठरत आहेत. अनेकदा खड्डे बुजविण्याचे काम होवूनही ते अधिक काळ टिकलेले नाही. त्यामुळे प्रवाशांत नाराजी आहे. अखेर हे खड्डे बुजविण्याचे काम सायन-पनवेल टोलवेज कंपनीने (एसपीटीपीएल) हाती घेतले आहे. त्याकरिता १५ दिवसांचा प्लान तयार करण्यात आला आहे. सुमारे २३ कि.मी. च्या सायन-पनवेल मार्गावर २.५ कि.मी. अंतरावर खड्डेच खड्डे आहेत. सध्या तात्पुरत्या स्वरूपात हे खड्डे बुजवले जाणार असून पाऊस थांबल्यानंतर २५ आॅक्टोबर ते २५ डिसेंबर दरम्यान या खड्ड्यांवर कायमचा उपाय काढला जाणार असल्याचे एसपीटीपीएलचे वरिष्ठ व्यवस्थापक गोपाल गुप्ता यांनी सांगितले. (प्रतिनिधी)एसपीटीपीएल आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचा वाद सध्या न्यायालयात सुरू आहे. त्यांनी आपसात वाद मिटवण्याकरिता न्यायालयाने ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिलेली आहे. त्याकरिता समिती देखील गठीत करण्यात आलेली आहे. टोलमधून छोटी वाहने वगळल्याने एसपीटीपीएल कंपनीला आर्थिक फटका बसला आहे. त्यावर नुकसानभरपाई म्हणून न्यायालयाच्या निर्देशानुसार पीडब्ल्यूडीने एसपीटीपीएल कंपनीला प्रतिमहिना ४ कोटी ६९ लाख रुपये परतावा द्यायचा आहे. परंतु मागील दोन महिन्यांपासून हा परतावा देखील मिळालेला नाही. त्याशिवाय ५१८ कोटींच्या अनुदानापैकी पीडब्ल्यूडीकडून दोन टप्प्यात मिळणारे ३९० कोटी रुपये अनुदान देखील मिळालेले नाही. यामुळे कंपनी आर्थिक संकटात असतानाही प्रवाशांच्या सुविधेसाठी प्रयत्न करत असल्याचे गुप्ता यांनी सांगितले. (प्रतिनिधी)>सायन - पनवेल मार्गाच्या रुंदीकरणादरम्यान अनेक ठिकाणी पादचाऱ्यांसाठी भुयारी मार्ग बनवले जाणार होते. परंतु मागील दीड वर्षापासून या भुयारी मार्गांचे काम अपूर्ण आहे. अर्धवट अवस्थेतल्या या भुयारी मार्गांचे सध्या तळे झाले असून झालेल्या कामालाही तडे गेले आहेत. त्यामुळे भविष्यात हे भुयारी मार्ग बांधायला सुरवात केल्यास संपूर्ण बांधकाम नव्याने करावे लागणार आहे.>मागील काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याची संधी साधत टोल कंपनीने १५ दिवसांचा कृती आराखडा तयार केलेला आहे. अशातच दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावल्यामुळे खड्डे बुजविण्याच्या या कामात टोल कंपनीला कितपत यश येईल याबाबत साशंकता आहे. तर पावसातही काम सुरूच राहिल्यास यापूर्वीच्या कामाप्रमाणेच हे काम देखील निकृष्ट ठरण्याची शक्यता आहे.