शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
2
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
3
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
4
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
5
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
6
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
7
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
8
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
9
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
10
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
11
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
12
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
13
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
14
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
15
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
16
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
17
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
18
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
19
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
20
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...

सायन-पनवेल महामार्ग होणार खड्डेमुक्त !

By admin | Updated: October 3, 2016 02:54 IST

सायन-पनवेल मार्गावरील खड्ड्यांमुळे प्रवाशांचे कंबरडे मोडल्यानंतर अखेर टोल कंपनीला जाग आली आहे.

नवी मुंबई : सायन-पनवेल मार्गावरील खड्ड्यांमुळे प्रवाशांचे कंबरडे मोडल्यानंतर अखेर टोल कंपनीला जाग आली आहे. रस्त्यावरील खड्डे तात्पुरते बुजविण्यासाठी १५ दिवसांचा आराखडा तयार केला असून, त्यानंतर कायमचा उपाय केला जाणार आहे. परंतु अशातच पावसाने पुन्हा हजेरी लावल्यामुळे यात त्यांना कितपत यश येईल, याबाबत साशंकता आहे.सायन-पनवेल महामार्गावर दिवसाला लाखो छोट्या-मोठ्या वाहनांची ये-जा सुरू असते. परंतु सद्यस्थितीला या मार्गावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे प्रवाशांना त्रासदायक ठरत आहेत. अनेकदा खड्डे बुजविण्याचे काम होवूनही ते अधिक काळ टिकलेले नाही. त्यामुळे प्रवाशांत नाराजी आहे. अखेर हे खड्डे बुजविण्याचे काम सायन-पनवेल टोलवेज कंपनीने (एसपीटीपीएल) हाती घेतले आहे. त्याकरिता १५ दिवसांचा प्लान तयार करण्यात आला आहे. सुमारे २३ कि.मी. च्या सायन-पनवेल मार्गावर २.५ कि.मी. अंतरावर खड्डेच खड्डे आहेत. सध्या तात्पुरत्या स्वरूपात हे खड्डे बुजवले जाणार असून पाऊस थांबल्यानंतर २५ आॅक्टोबर ते २५ डिसेंबर दरम्यान या खड्ड्यांवर कायमचा उपाय काढला जाणार असल्याचे एसपीटीपीएलचे वरिष्ठ व्यवस्थापक गोपाल गुप्ता यांनी सांगितले. (प्रतिनिधी)एसपीटीपीएल आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचा वाद सध्या न्यायालयात सुरू आहे. त्यांनी आपसात वाद मिटवण्याकरिता न्यायालयाने ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिलेली आहे. त्याकरिता समिती देखील गठीत करण्यात आलेली आहे. टोलमधून छोटी वाहने वगळल्याने एसपीटीपीएल कंपनीला आर्थिक फटका बसला आहे. त्यावर नुकसानभरपाई म्हणून न्यायालयाच्या निर्देशानुसार पीडब्ल्यूडीने एसपीटीपीएल कंपनीला प्रतिमहिना ४ कोटी ६९ लाख रुपये परतावा द्यायचा आहे. परंतु मागील दोन महिन्यांपासून हा परतावा देखील मिळालेला नाही. त्याशिवाय ५१८ कोटींच्या अनुदानापैकी पीडब्ल्यूडीकडून दोन टप्प्यात मिळणारे ३९० कोटी रुपये अनुदान देखील मिळालेले नाही. यामुळे कंपनी आर्थिक संकटात असतानाही प्रवाशांच्या सुविधेसाठी प्रयत्न करत असल्याचे गुप्ता यांनी सांगितले. (प्रतिनिधी)>सायन - पनवेल मार्गाच्या रुंदीकरणादरम्यान अनेक ठिकाणी पादचाऱ्यांसाठी भुयारी मार्ग बनवले जाणार होते. परंतु मागील दीड वर्षापासून या भुयारी मार्गांचे काम अपूर्ण आहे. अर्धवट अवस्थेतल्या या भुयारी मार्गांचे सध्या तळे झाले असून झालेल्या कामालाही तडे गेले आहेत. त्यामुळे भविष्यात हे भुयारी मार्ग बांधायला सुरवात केल्यास संपूर्ण बांधकाम नव्याने करावे लागणार आहे.>मागील काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याची संधी साधत टोल कंपनीने १५ दिवसांचा कृती आराखडा तयार केलेला आहे. अशातच दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावल्यामुळे खड्डे बुजविण्याच्या या कामात टोल कंपनीला कितपत यश येईल याबाबत साशंकता आहे. तर पावसातही काम सुरूच राहिल्यास यापूर्वीच्या कामाप्रमाणेच हे काम देखील निकृष्ट ठरण्याची शक्यता आहे.