शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

सायन-पनवेल महामार्ग गेला खड्ड्यांत

By admin | Updated: July 22, 2016 01:39 IST

सायन - पनवेल महामार्गाच्या रूंदीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे.

नवी मुंबई : सायन - पनवेल महामार्गाच्या रूंदीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असल्याने वारंवार चक्का जाम होत आहे. अपघातांचे प्रमाणही वाढले असून, या कामाची चौकशी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी शासनाने २५ किलोमीटर अंतर असलेल्या सायन - पनवेल महामार्गाचे रूंदीकरण करण्याचा निर्णय घेतला. जवळपास ८२५ कोटी रूपये खर्च करून २०१४ अखेर काम पूर्ण केले आहे. खारघरमध्ये ६ जानेवारी २०१५ ला टोल सुरू केला आहे. १० लेनचा रोड झाल्यानंतरही वाहतूक कोंडी सुटण्याऐवजी वाढली आहे. ठेकेदाराने केलेल्या निकृष्ट कामामुळे रोडवर सर्वत्र खड्डे पडले आहेत. वाशी, सानपाडा उड्डाणपूल, तुर्भे वाहतूक चौकी, शरयू हुंडाई शोरूम, शिरवणे उड्डाणपुलाची चाळण झाली आहे. सायंकाळी सानपाडा ते नेरूळ दरम्यान वाहतूक ठप्प होत आहे. पाच मिनिटांचे अंतर पूर्ण करण्यासाठी अर्धा ते एक तास वेळ लागत आहे. वाहतूक सुरळीत करताना पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. खड्डे बुजविण्यासाठी पोलिसांनी वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र दिले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले आहे. परंतु बुजविलेले खड्डे दोन दिवसांत जैसे थे होत आहेत. वाहतूक कोंडीमुळे चालक त्रस्त आहेत. लवकरात लवकर कोंडी सोडवावी, अशी मागणी केली जात आहे. खड्ड्यांमुळे महामार्गावरील अपघातांमध्ये वाढ झाली आहे. दोन दिवसांपूर्वी सानपाडा येथे डंपर पलटी झाला होता. रोज सरासरी दोन अपघात मार्गावर होत आहेत. सायंकाळी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी छोटी वाहने पामबीच रोडवरून वळवावी लागत आहेत. बांधकाम विभागाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अन्यथा नागरिकांचा उद्रेक होवून आंदोलन करावे लागेल असा इशारा नागरिकांनी दिला आहे. रूंदीकरणाच्या कामाची चौकशी करावी. कामाचा दर्जा निकृष्ट असेल तर संबंधित ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. >राजकीय पक्षांना विसर महामार्गावर वारंवार वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. परंतु या समस्येकडे शहरातील सर्वच राजकीय पक्षांनी दुर्लक्ष केले आहे. शिवसेनेने दोन वर्षांपूर्वी महामार्गाच्या कामाविषयी जनहित याचिका दाखल केली होती. परंतु नंतर याविषयावर मौन पाळले आहे. यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. >महामार्गावर सानपाडा व शिरवणे उड्डाणपूल, शरयू हुंडाई व तुर्भे पुलाखाली मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे रोेज वाहतूक कोंडी होत असून याबाबत संबंधित विभागाला कळवले आहे. - एस. पी. शिंदे, पोलीस निरीक्षक, तुर्भे वाहतूक