शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात एकाच दिवसात दहा ‘पाऊसबळी’

By admin | Updated: June 27, 2016 05:12 IST

मान्सूनच्या धुवाधार पावसाने राज्याला दिलासा दिला असतानाच, ‘पाऊसबळीं’ची संख्याही वाढू लागली आहे.

मुंबई : मान्सूनच्या धुवाधार पावसाने राज्याला दिलासा दिला असतानाच, ‘पाऊसबळीं’ची संख्याही वाढू लागली आहे. त्यातच पावसाळी वातावरणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी पाण्यात डुंबणेही अनेकांच्या जिवावर बेतले आहे. गेल्या चोवीस तासांत गडचिरोली, अहमदनगर आणि ठाणे-मुंबईतील विविध ठिकाणी बुडून तब्बल १० जणांचा बळी गेला आहे.रायगड जिल्ह्यातील कर्जतजवळच्या मोठे वेणगाव येथील एकाच कुटुंबातील तिघांचा रविवारी दुपारी तलावात बुडून मृत्यू झाला. भूषण संजय गवळे (१५, इ. दहावी), तेजस सिद्धार्थ गवळे (१५, दहावी), आशिष मोहन गवळे (१२, सातवी) अशी या चुलत भावंडांची नावे असून, दुपारी ते वनखात्याच्या हद्दीत तलावात पोहण्यास उतरले होते, परंतु पाण्याचा अंदाज न आल्यामुळे बुडाले. ग्रामस्थांनी त्यांना बाहेर काढून उपचारार्थ नेईपर्यंत उशीर झाला होता.तसेच वाशिमहून आठ दिवसांपूर्वी मूल येथे मामाकडे राहायला आलेल्या तरुणासह दोन मुलांचा रविवारी दुपारी चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा येथे वैनगंगा नदीत बुडून मृत्यू झाला. कुटुंबीयांसह मामा प्रशांत अप्पलवार मार्कंडा येथे देवदर्शनाला आले होते. या वेळी आंघोळीसाठी वैनगंगेच्या पाण्यात उतरलेल्या अंकुर प्रशांत पाठक (२२), वैभव प्रशांत पाठक (१६) आणि गणेश प्रशांत अप्पलवार (१३) यांचा बुडून मृत्यू झाला. त्याचबरोबर अहमदनगरमधील कुळधरण (ता. कर्जत) येथील शेततळ्यात पोहायला गेलेल्या गौरव बापू गुंड (६, इ. पहिली) व सच्चुत गुलाब गुंड (१०, इ. चौथी) या मुलांचाही रविवारी दुपारी बुडून मृत्यू झाला. सहा-सात फूट खोल शेततळ्यात गौरव-सच्चुत गटांगळ्या खाऊ लागल्यावर शेतात काम करणाऱ्या कुटुंबीयांनी त्यांना तातडीने बाहेर काढून रुग्णालयात नेले, परंतु त्यांना वाचविण्यात यश आले नाही. मुसळधार पाऊस सुरू असताना शनिवारी दुपारी वीजबिल भरण्यासाठी गेलेली मुंबईतील भांडुप, प्रताप नगर येथील वृद्धा नाल्यात पडून वाहून गेली होती. सुलोचना भालेराव (७०) असे तिचे नाव असून, रविवारी दुपारी नाल्यात तिचा मृतदेह तरंगताना आढळला. तसेच मुलुंड संभाजी नगर परिसरातील इस्माईल शेख (३०) हाही शनिवारी बकऱ्यांना चारा देण्यासाठी गेला असता लाल बहादूर शास्त्री मार्गावरील नाल्यात वाहून गेला होता. (लोकमत न्यूज नेटवर्क)>गटांगळ्या खाणाऱ्या कुटुंबाला वाचविण्यात यशमुंबईतील वर्सोवा किनाऱ्याजवळच्या समुद्रात गटांगळ्या खात असलेल्या एकाच कुटुंबातील तिघांना अग्निशमन दलाच्या जवानांनी जीवदान दिले.मनीष आर्या (४३), पत्नी शरयू (४३) आणि मुलगा निर्मित (११) हे रविवारी दुपारी पावसाची मजा घेण्यासाठी समुद्रातील खडकांत उभे असताना अचानक पाण्याची पातळी वाढून गटांगळ्या खाऊ लागले. मात्र फायर रेस्क्यू टीमने तातडीने मदतीला धावून त्यांना पाण्याबाहेर काढले.