शहरं
Join us  
Trending Stories
1
"आईला कदाचित फाशीची शिक्षा देतील, पण लक्षात ठेवा..."; शेख हसीना यांच्या मुलाचा गंभीर इशारा
2
Lalu Yadav: राजदच्या पराभवानंतर लालू यांच्या घरात फूट; मुलींनी सोडले घर, तेजस्वी यादव यांच्यावर आरोप
3
पत्नीच्या नावे पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये उघडा खातं; दर महिन्याला ₹९२५० चं मिळेल व्याज
4
Accident: राज्यात नऊ महिन्यांत ११ हजार ५३२ मृत्यू; मुंबईत सर्वाधिक अपघात, 'हे' ठिकाण अत्यंत धोकादायक!
5
पालघर साधू हत्याकांडात ज्यांच्यावर गंभीर आरोप केले, त्यांनाच भाजपाने दिला पक्षात प्रवेश
6
BMC Elections: मनसेमुळे मुंबईत महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर, नेमकं कारण काय? 
7
शेख हसीना यांच्या खटल्याच्या निकालाआधी बांगलादेशात हिंसाचार, पोलिसांकडून आंदोलकांवर गोळीबार
8
पाकिस्तानात जाफर एक्सप्रेस पुन्हा टार्गेटवर; बॉम्बस्फोटाने रेल्वे ट्रॅक उद्ध्वस्त, अनर्थ टळला
9
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२५, या राशीसाठी धनलाभाच्या दृष्टीने शुभ दिवस, प्रवास संभवतात
10
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
11
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
12
विशेष लेख: भीती, घाबरणे, घाबरवणे... आणि कधीही न घाबरणे !
13
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
14
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
15
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
16
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
17
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
18
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
19
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
20
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील ‘सिंघम’ संजीव जयस्वाल

By admin | Updated: May 13, 2017 02:13 IST

महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल कठोर प्रशासक आहेतच, पण प्रशासनावर कुणी हात उगारला तर ते सिंघमसारखे दबंग होऊ शकतात,

संदीप प्रधान। लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल कठोर प्रशासक आहेतच, पण प्रशासनावर कुणी हात उगारला तर ते सिंघमसारखे दबंग होऊ शकतात, याची प्रचीती गुरुवारी ठाणेकरांना आली. अडेलतट्टू व्यापाऱ्यांना त्यांनी यापूर्वी वठणीवर आणलेच. आता बेशिस्त फेरीवाले व मुजोर रिक्षाचालकांचे कंबरडे मोडण्याची हिंमत जयस्वाल यांनी दाखवली आणि त्याला पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची साथ लाभली, तर ठाणेकर या दोघांना निश्चित दुवा देतील.महापालिका उपायुक्त संदीप माळवी हे बुधवारी फेरीवाल्यांवर कारवाई करायला गेले असताना फेरीवाल्यांच्या रूपातील काही गुंडांनी त्यांना बेदम मारहाण केली. माळवी यांच्यावर हात उचलणे, म्हणजे प्रशासनावर हात उगारण्यासारखे असल्याने जयस्वाल आक्रमक झाले आणि त्यांनी गावदेवी येथील गाळेधारक व फेरीवाले यांना इंगा दाखवला. ठाण्यातील रिक्षाचालक तर मुजोरीचा कळस आहे. रिक्षाचालकांवरही सिंघमसारखे तुटून पडलेल्या जयस्वाल यांच्यावर ठाणेकर मनापासून खूश झाले आहेत.जुन्या ठाण्यातील रस्ते अरुंद असून सध्या या परिसरातील वाहतूक प्रचंड वाढली आहे. अनेक दुकानदार, हॉटेल, बार यांनी रस्त्यांवर बिनदिक्कतपणे अतिक्रमण करून रस्ते रुंदीकरणात वर्षानुवर्षे खोडा घातला होता. जयस्वाल यांनी अल्पावधीत २०० ते २५० दुकानदारांची अतिक्रमणे जमीनदोस्त केली. यामुळे खवळलेल्या दुकानदारांनी महापालिकेशी असहकार केला. मात्र जयस्वाल हे वेळप्रसंगी वज्राहून कठोर होऊ शकतात, हे लक्षात आल्यावर यांच्यात समेट घडून आला. जयस्वाल यांनी मोकळे व रुंद केलेले रस्ते फेरीवाल्यांनी काबीज केले आणि पालिकेच्या मूळ हेतूलाच हरताळ फासला. १९६०-७० च्या दशकात बेरोजगार मराठी मुलांना रोजगार मिळावा, याकरिता शिवसेनेनेच फेरीवाला संस्कृती पोसली. त्या वेळी फेरीवाले व वडापावच्या गाड्यांवर कारवाई करणाऱ्या गो.रा. खैरनार यांनाही शिवसेनेकडून विरोध झाला होता. ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेनेला बहुमत प्राप्त झाल्यानंतर प्रशासनाचे खच्चीकरण केले जात असल्याचे जयस्वाल यांनी केलेले सूतोवाच बोलके आहे. कालांतराने फेरीवाला ही गरज न राहता धंदा झाला व माफियांनी या धंद्यावर कब्जा केला. वेगवेगळ्या शहरांमधील रस्त्यांचे या माफियांनी वेगवेगळे दर निश्चित केले आहेत. त्यावर, फेरीचा व्यवसाय करण्याकरिता स्थानिक राजकारणी, गुंड यांना हप्ता द्यावा लागतो. फेरीचा व्यवसाय करू दिला जावा, याकरिता हे माफिया महापालिका कर्मचाऱ्यांना हप्ता देतात. त्यामुळे कारवाई होत नाही. रिक्षा व्यवसायाचेही तेच आहे. गरीब तरुणांच्या रोजगाराकरिता रिक्षा परवाने दिले गेले. मात्र, आता हा व्यवसायदेखील माफियांनी गिळला आहे. अनेक स्थानिक राजकारणी, वाहतूक पोलीस, आरटीओ अधिकारी, गुंड यांनी आपला अवैध पैसा रिक्षा धंद्यात गुंतवला आहे. त्यांनी या रिक्षा अत्यल्प मोबदला देऊन चालवायला दिल्या आहेत. रिक्षा चालवणारे चक्क गुंडगिरी करतात. जयस्वाल यांनी परमबीर यांच्या सहकार्याने या मुजोर फेरीवाले व रिक्षावाल्यांचे कंबरडे मोडणे गरजेचे आहे. मात्र कारवाई करताना अधिकृत गाळेधारकांवर कारवाई केल्याने त्याला खीळ बसणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल.