शहरं
Join us  
Trending Stories
1
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
2
नितीशकुमारांची सत्ता धोक्यात? नव्या सर्व्हेतून धक्कादायक 'लाट'; बिहार निवडणुकीपूर्वीच....
3
Maharashtra Politics : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार, भास्कर जाधव मोठा निर्णय घेणार?, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
4
भारतासोबतच्या सिंधू जल करार वादात OIC ची एन्ट्री; ५७ इस्लामिक देशांचा पाकिस्तानच्या सूरात सूर
5
युनूस यांची खेळी, भारताविरोधी षडयंत्र; बांगलादेशात पाकिस्तानी ISI हस्तकाला मोठी जबाबदारी
6
जगभर: डोनाल्ड ट्रम्प याची 'दादागिरी', अमेरिकेत भारतीय प्राध्यापकांनाही ‘बंदी’!
7
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
8
पुण्याच्या नळ स्टॉप स्टेशनवरुन पकडली मेट्रो, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?
9
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
10
Iran Israel War: इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम नोकऱ्यांवरही, कंपन्यांमध्ये भरती प्रक्रिया थांबली; कर्मचारीही चिंतेत
11
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
12
Lalit Upadhyay: भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती!
13
पहिल्या कसोटीत इंग्लंडला एवढ्या धावांचं आव्हान दिल्यास भारताचा विजय निश्चित, असं आहे समीकरण 
14
राज्याचा दर्जा न दिल्यास सर्वोच्च न्यायालयात जाणार; फारुक अब्दुल्ला यांचा केंद्र सरकारला इशारा
15
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
16
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
17
डोईवर विठुमाऊली अन् वारकऱ्यांसह फुगडी; पंढरीच्या वारीतून मराठमोळ्या अभिनेत्रीने शेअर केला व्हिडिओ
18
"रावणाच्या तारखा माझ्यापेक्षा जास्त...", जयदीप अहलावतने दिला 'रामायण'ला नकार
19
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
20
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना

ठाण्यातील ‘सिंघम’ संजीव जयस्वाल

By admin | Updated: May 13, 2017 02:13 IST

महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल कठोर प्रशासक आहेतच, पण प्रशासनावर कुणी हात उगारला तर ते सिंघमसारखे दबंग होऊ शकतात,

संदीप प्रधान। लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल कठोर प्रशासक आहेतच, पण प्रशासनावर कुणी हात उगारला तर ते सिंघमसारखे दबंग होऊ शकतात, याची प्रचीती गुरुवारी ठाणेकरांना आली. अडेलतट्टू व्यापाऱ्यांना त्यांनी यापूर्वी वठणीवर आणलेच. आता बेशिस्त फेरीवाले व मुजोर रिक्षाचालकांचे कंबरडे मोडण्याची हिंमत जयस्वाल यांनी दाखवली आणि त्याला पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची साथ लाभली, तर ठाणेकर या दोघांना निश्चित दुवा देतील.महापालिका उपायुक्त संदीप माळवी हे बुधवारी फेरीवाल्यांवर कारवाई करायला गेले असताना फेरीवाल्यांच्या रूपातील काही गुंडांनी त्यांना बेदम मारहाण केली. माळवी यांच्यावर हात उचलणे, म्हणजे प्रशासनावर हात उगारण्यासारखे असल्याने जयस्वाल आक्रमक झाले आणि त्यांनी गावदेवी येथील गाळेधारक व फेरीवाले यांना इंगा दाखवला. ठाण्यातील रिक्षाचालक तर मुजोरीचा कळस आहे. रिक्षाचालकांवरही सिंघमसारखे तुटून पडलेल्या जयस्वाल यांच्यावर ठाणेकर मनापासून खूश झाले आहेत.जुन्या ठाण्यातील रस्ते अरुंद असून सध्या या परिसरातील वाहतूक प्रचंड वाढली आहे. अनेक दुकानदार, हॉटेल, बार यांनी रस्त्यांवर बिनदिक्कतपणे अतिक्रमण करून रस्ते रुंदीकरणात वर्षानुवर्षे खोडा घातला होता. जयस्वाल यांनी अल्पावधीत २०० ते २५० दुकानदारांची अतिक्रमणे जमीनदोस्त केली. यामुळे खवळलेल्या दुकानदारांनी महापालिकेशी असहकार केला. मात्र जयस्वाल हे वेळप्रसंगी वज्राहून कठोर होऊ शकतात, हे लक्षात आल्यावर यांच्यात समेट घडून आला. जयस्वाल यांनी मोकळे व रुंद केलेले रस्ते फेरीवाल्यांनी काबीज केले आणि पालिकेच्या मूळ हेतूलाच हरताळ फासला. १९६०-७० च्या दशकात बेरोजगार मराठी मुलांना रोजगार मिळावा, याकरिता शिवसेनेनेच फेरीवाला संस्कृती पोसली. त्या वेळी फेरीवाले व वडापावच्या गाड्यांवर कारवाई करणाऱ्या गो.रा. खैरनार यांनाही शिवसेनेकडून विरोध झाला होता. ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेनेला बहुमत प्राप्त झाल्यानंतर प्रशासनाचे खच्चीकरण केले जात असल्याचे जयस्वाल यांनी केलेले सूतोवाच बोलके आहे. कालांतराने फेरीवाला ही गरज न राहता धंदा झाला व माफियांनी या धंद्यावर कब्जा केला. वेगवेगळ्या शहरांमधील रस्त्यांचे या माफियांनी वेगवेगळे दर निश्चित केले आहेत. त्यावर, फेरीचा व्यवसाय करण्याकरिता स्थानिक राजकारणी, गुंड यांना हप्ता द्यावा लागतो. फेरीचा व्यवसाय करू दिला जावा, याकरिता हे माफिया महापालिका कर्मचाऱ्यांना हप्ता देतात. त्यामुळे कारवाई होत नाही. रिक्षा व्यवसायाचेही तेच आहे. गरीब तरुणांच्या रोजगाराकरिता रिक्षा परवाने दिले गेले. मात्र, आता हा व्यवसायदेखील माफियांनी गिळला आहे. अनेक स्थानिक राजकारणी, वाहतूक पोलीस, आरटीओ अधिकारी, गुंड यांनी आपला अवैध पैसा रिक्षा धंद्यात गुंतवला आहे. त्यांनी या रिक्षा अत्यल्प मोबदला देऊन चालवायला दिल्या आहेत. रिक्षा चालवणारे चक्क गुंडगिरी करतात. जयस्वाल यांनी परमबीर यांच्या सहकार्याने या मुजोर फेरीवाले व रिक्षावाल्यांचे कंबरडे मोडणे गरजेचे आहे. मात्र कारवाई करताना अधिकृत गाळेधारकांवर कारवाई केल्याने त्याला खीळ बसणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल.