शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; कवीने परत केला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
2
"आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ" परराष्ट्र धोरणावरून काँग्रेसची सरकारवर टीका
3
बाजारात येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना पाहून करत होता अश्लील इशारे;२० वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक
4
Inflation: २० वर्षांनंतर एक कोटींचं मूल्य असेल फक्त २५ लाख; महागाई कशी कमी करतेय तुमच्या पैशांचं मोल?
5
'आम्हाला तिथेच लढायचेय' इराण-इस्रायल, अमेरिका युद्धात WWE का इरेला पेटला...
6
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाने कानात मकरकुंडले का धारण केली? मत्स्यावताराशी काही संबंध?
7
"तुम्ही विमान उडवण्याच्या लायक नाही, जा बूट...", इंडिगोच्या प्रशिक्षणार्थी पायलटचा वरिष्ठ अधिकाऱ्यांवर जातीभेदाचा आरोप; एफआयआर दाखल
8
Cluster Bomb: क्लस्टर बॉम्ब म्हणजे काय, १२३ देशांमध्ये त्यावर बंदी का?
9
गुजरातमध्ये 'आप'कडून मोदी आणि भाजपाला जबर धक्का, पोटनिवडणुकीत मिळवला दणदणीत विजय
10
ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार देण्याची शिफारस आली अंगलट; पाकिस्तानी नेत्यांची पुन्हा फजिती
11
तुमचेही पैसे रिअल इस्टेटमध्ये अडकलेत का? फक्त १% लोकच कमवतायत नफा! तुम्ही 'या' चुका तर करत नाहीये ना?
12
Iran Israel War: मोठ्या संकटात अडकलाय भारत; ३.६ लाख कोटींचा आकडा का घाबरवतोय?
13
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
14
नवीन युगाची सुरुवात! ड्रायव्हरशिवाय धावल्या गाड्या; Tesla ची Robotaxi सेवा सुरू...
15
सोनम रघुवंशीला 'वाचवणारा आणि लपवणारा' लोकेंद्र तोमर कोण? राजा हत्याकांडात आणखी एक मोठा खुलासा
16
Devendra Fadnavis: राहुल गांधींना मेक इन इंडिया माहिती नाही, त्यांनी गृहपाठ करायला हवा; फडणवीसांचा टोला!
17
तुमचा पैसा 'रॉकेट' बनवणार! 'या' ५ म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ? पाहा संपूर्ण यादी!
18
पुतण्याच्या प्रेमात काकी झाली वेडी, पती आणि तीन वर्षांच्या मुलीला सोडलं, पुतण्यासोबत लग्न केलं
19
नितीशकुमारांची सत्ता धोक्यात? नव्या सर्व्हेतून धक्कादायक 'लाट'; बिहार निवडणुकीपूर्वीच....
20
Maharashtra Politics : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार, भास्कर जाधव मोठा निर्णय घेणार?, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं

ठाण्यातील ‘सिंघम’ संजीव जयस्वाल

By admin | Updated: May 13, 2017 02:13 IST

महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल कठोर प्रशासक आहेतच, पण प्रशासनावर कुणी हात उगारला तर ते सिंघमसारखे दबंग होऊ शकतात,

संदीप प्रधान। लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल कठोर प्रशासक आहेतच, पण प्रशासनावर कुणी हात उगारला तर ते सिंघमसारखे दबंग होऊ शकतात, याची प्रचीती गुरुवारी ठाणेकरांना आली. अडेलतट्टू व्यापाऱ्यांना त्यांनी यापूर्वी वठणीवर आणलेच. आता बेशिस्त फेरीवाले व मुजोर रिक्षाचालकांचे कंबरडे मोडण्याची हिंमत जयस्वाल यांनी दाखवली आणि त्याला पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची साथ लाभली, तर ठाणेकर या दोघांना निश्चित दुवा देतील.महापालिका उपायुक्त संदीप माळवी हे बुधवारी फेरीवाल्यांवर कारवाई करायला गेले असताना फेरीवाल्यांच्या रूपातील काही गुंडांनी त्यांना बेदम मारहाण केली. माळवी यांच्यावर हात उचलणे, म्हणजे प्रशासनावर हात उगारण्यासारखे असल्याने जयस्वाल आक्रमक झाले आणि त्यांनी गावदेवी येथील गाळेधारक व फेरीवाले यांना इंगा दाखवला. ठाण्यातील रिक्षाचालक तर मुजोरीचा कळस आहे. रिक्षाचालकांवरही सिंघमसारखे तुटून पडलेल्या जयस्वाल यांच्यावर ठाणेकर मनापासून खूश झाले आहेत.जुन्या ठाण्यातील रस्ते अरुंद असून सध्या या परिसरातील वाहतूक प्रचंड वाढली आहे. अनेक दुकानदार, हॉटेल, बार यांनी रस्त्यांवर बिनदिक्कतपणे अतिक्रमण करून रस्ते रुंदीकरणात वर्षानुवर्षे खोडा घातला होता. जयस्वाल यांनी अल्पावधीत २०० ते २५० दुकानदारांची अतिक्रमणे जमीनदोस्त केली. यामुळे खवळलेल्या दुकानदारांनी महापालिकेशी असहकार केला. मात्र जयस्वाल हे वेळप्रसंगी वज्राहून कठोर होऊ शकतात, हे लक्षात आल्यावर यांच्यात समेट घडून आला. जयस्वाल यांनी मोकळे व रुंद केलेले रस्ते फेरीवाल्यांनी काबीज केले आणि पालिकेच्या मूळ हेतूलाच हरताळ फासला. १९६०-७० च्या दशकात बेरोजगार मराठी मुलांना रोजगार मिळावा, याकरिता शिवसेनेनेच फेरीवाला संस्कृती पोसली. त्या वेळी फेरीवाले व वडापावच्या गाड्यांवर कारवाई करणाऱ्या गो.रा. खैरनार यांनाही शिवसेनेकडून विरोध झाला होता. ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेनेला बहुमत प्राप्त झाल्यानंतर प्रशासनाचे खच्चीकरण केले जात असल्याचे जयस्वाल यांनी केलेले सूतोवाच बोलके आहे. कालांतराने फेरीवाला ही गरज न राहता धंदा झाला व माफियांनी या धंद्यावर कब्जा केला. वेगवेगळ्या शहरांमधील रस्त्यांचे या माफियांनी वेगवेगळे दर निश्चित केले आहेत. त्यावर, फेरीचा व्यवसाय करण्याकरिता स्थानिक राजकारणी, गुंड यांना हप्ता द्यावा लागतो. फेरीचा व्यवसाय करू दिला जावा, याकरिता हे माफिया महापालिका कर्मचाऱ्यांना हप्ता देतात. त्यामुळे कारवाई होत नाही. रिक्षा व्यवसायाचेही तेच आहे. गरीब तरुणांच्या रोजगाराकरिता रिक्षा परवाने दिले गेले. मात्र, आता हा व्यवसायदेखील माफियांनी गिळला आहे. अनेक स्थानिक राजकारणी, वाहतूक पोलीस, आरटीओ अधिकारी, गुंड यांनी आपला अवैध पैसा रिक्षा धंद्यात गुंतवला आहे. त्यांनी या रिक्षा अत्यल्प मोबदला देऊन चालवायला दिल्या आहेत. रिक्षा चालवणारे चक्क गुंडगिरी करतात. जयस्वाल यांनी परमबीर यांच्या सहकार्याने या मुजोर फेरीवाले व रिक्षावाल्यांचे कंबरडे मोडणे गरजेचे आहे. मात्र कारवाई करताना अधिकृत गाळेधारकांवर कारवाई केल्याने त्याला खीळ बसणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल.