शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वदेश दर्शन’साठी सिंधुदुर्गची निवड

By admin | Updated: December 21, 2015 00:29 IST

केंद्र शासनाची योजना : ८२ कोटींची तरतूद : विनायक राऊत यांची माहिती

मालवण : भारतीय पर्यटनाच्या गतिमान विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र्र मोदी यांच्या संकल्पनेतून केंद्र्र शासनाने ‘स्वदेश दर्शन’ ही महत्त्वाकांक्षी योजना आखली आहे. यासाठी महाराष्ट्रातून सिंधुदुर्ग जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. यात जिल्ह्यातील मालवण, देवगड व वेंगुर्ले या तीन किनारपट्टी तालुक्यातील नऊ किनारे आणि विजयदुर्ग खाडीपात्राचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यात येणार आहे. या योजनेसाठी ८२ कोटी ७६ लाखांची तरतूद करण्यात आली असून, केंद्र शासनाच्या तीन विशेष समित्यांनी मान्यता दिली आहे. ‘स्वदेश दर्शन’ अंतर्गत प्रस्तावित स्थळांचा येत्या एप्रिल महिन्यापासून विकास सुरूकरण्यात येईल, अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली. मालवण येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत राऊत बोलत होते. यावेळी तालुकाप्रमुख बबन शिंदे, नंदू गवंडे, हरी खोबरेकर, सन्मेश परब, किरण वाळके, किसान मांजरेकर, गौरव वेर्लेकर, जाबीर खान, आदी उपस्थित होते. ‘स्वदेश दर्शन’ या योजनेत विजयदुर्ग खाडी व बीचसाठी सर्वाधिक १६ कोटी ७१ लाखांचा निधी खर्च केला जाणार आहे. तसेच तोंडवळी बीच १२ कोटी ६७ लाख, तारकर्ली बीच १० कोटी २३ लाख, शिरोडा बीच ९ कोटी ७४ लाख, सागरेश्वर बीच ८ कोटी ७८ लाख, देवगड बीच ६ कोटी ९७ लाख, मोचेमाड बीच ६ कोटी ५३ लाख, मिठबाव बीच ५ कोटी ९५ लाख असा निधी खर्च केला जाणार आहे. पर्यटकांना सोयी-सुविधा पुरविताना त्यांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. यात किनारपट्टीवर पर्यटकांची सुरक्षा, गझिबो, पाथ वे, बीच लाईट, पार्किंग, प्रसाधनगृह, चेंजिंग रूम, पर्यटन माहिती केंद्र्र अशा अनेक सुविधांसाठी ९ कोटी ७५ लाख तरतूद करण्यात आली आहे, असे राऊत म्हणाले. (प्रतिनिधी)‘चिवला बीच’साठी आठ कोटींची तरतूदमालवण शहराला केंद्राच्या या ‘स्वदेश दर्शन’ योजनेत विचारात घेतले नाही या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना राऊत म्हणाले, महाराष्ट्र शासनाच्या विशेष पर्यटन योजनेखाली पर्यटन विकासासाठी ५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये चिवला बीचचा समावेश करण्यात आला असून, चिवला बीचच्या विकासासाठी आठ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.त्यामुळे स्वदेश दर्शन योजनेत चिवला बीचचा समावेश नसला तरी राज्य सरकार चिवला बीच व शहरासह तालुक्यातील अन्य बीचचा विकास करणार आहे. तसेच किल्ले सिंधुदुर्गच्या विकासासाठी स्वतंत्र आराखडा तयार करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.विमानतळ २०१६ पर्यंत पूर्णत्वासराऊत म्हणाले, पर्यटन विकास साधताना देशी-विदेशी पर्यटक अधिक संख्येने जिल्ह्यात येणार आहेत. यासाठी चिपी येथे होणारे विमानतळ लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी मुख्यमंत्री व उद्योगमंत्री यांची भेट घेण्यात आली. यावेळी संबंधित ठेकेदाराला राज्य शासनाने २०१६ ची डेडलाईन देत काम पूर्णत्वास नेण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच पर्यटन वृद्धीसाठी जिल्ह्यात मोठी आलिशान हॉटेल्स उभारणी होणे गरजेचे आहे. पर्यटन विकासात अडसर ठरणाऱ्या सीआरझेड कायद्यात गोवा, तमिळनाडू धर्तीवर ५० मीटरची शिथिलता मिळण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.सी-वर्ल्डचा कमी जागेतील आराखडा पाहिला नाहीसी वर्ल्डबाबत विचारले असता, खासदार विनायक राऊत यांनी १३९० अवास्तव जागेत होणाऱ्या सी वर्ल्डला आपला विरोध होता, असे स्पष्ट केले. शासनाने ३०० ते ४०० एकर जागेत करायचे ठरविले आहे. वायंगणी-तोंडवळी ग्रामस्थ या कमी जागेतील सी वर्ल्डबाबत जो निर्णय घेतील त्या निर्णयासोबत आपण राहणार आहोत; मात्र कमी जागेत सी वर्ल्ड होणार असला तरी त्याचा अंतिम आराखडा व माहिती आपल्याला उपलब्ध झालेली नसल्याचे सांगितले.