शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
4
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
5
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
6
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
7
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
8
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
9
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
11
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
12
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
13
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
14
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
15
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
16
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
17
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
18
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
19
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
20
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

दहावी परीक्षा सुरळीत पार पाडणार - म्हमाणे, बोर्डाचे अध्यक्ष

By admin | Updated: March 6, 2017 02:32 IST

बारावीचा पेपर सुरु होण्याआधी १२ ते १५ मिनिटे पेपर व्हॉट्स अ‍ॅपवर येण्याच्या दोन घटना मुंबईत घडल्या

पूजा दामले,मुंबई- बारावीचा पेपर सुरु होण्याआधी १२ ते १५ मिनिटे पेपर व्हॉट्स अ‍ॅपवर येण्याच्या दोन घटना मुंबईत घडल्या. त्यामुळे यंदाही महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळासाठी व्हॉट्स अ‍ॅपची डोकेदुखी ठरत आहे. दरवर्षी उद्भवणाऱ्या नवनवीन समस्यांना आळा घालण्यासाठी बोर्ड वर्षभर तयारी करत असते. मंगळवारपासून राज्यात सुरु होणाऱ्या दहावीच्या परीक्षांसाठी बोर्डाने केलेल्या तयारीविषयी बोर्डाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांच्याशी केलेली ही खास बातचीत...पेपर लीक होऊ नयेत म्हणून कोणत्या उपाययोजना आखल्या आहेत? गेल्या तीन वर्षांत परीक्षा सुरु होण्याआधी काही मिनिटे व्हॉट्स अ‍ॅपवर पेपर येत असल्याचे प्रकार घडले आहे. अशा पद्धतीने पेपर लीक होऊ नये, म्हणून परीक्षा केंद्रावर शिक्षक आणि विद्यार्थ्यांना मोबाईल वापरास बंदी घातली आहे. पण, तरीही यंदा बारावीच्या परीक्षेवेळी पेपर लीक झाले आहेत. त्यामुळे दहावीची परीक्षा सुरु होण्याआधी विशेष सूचना देण्यात येतील. विद्यार्थ्यांना दहा मिनिटे आधी पेपर देण्यात येतो, त्यावेळात कुठे कमतरता आहे का? कुठे मोबाईलचा वापर करण्यात येतो याचा शोध घेण्यात येत आहे. मोबाईल बंदीचा नियम पाळला गेल्यास ही समस्या उद्भवणार नाही. दहावीच्या परीक्षेसाठी किती विद्यार्थी राज्यभरातून परीक्षेला बसलेले आहेत?यंदा दहावीच्या परीक्षेसाठी राज्यातून एकूण १७ लाख ६६ हजार ९८ विद्यार्थी परीक्षेस बसलेले आहेत. यामध्ये नवीन विद्यार्थ्यांच्या बरोबरीनेच रिपीटर विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. परीक्षा केंद्राची निवड कशी करता? दहावीच्या परीक्षा केंद्राची निवड करताना विद्यार्थ्यांना योग्य सोयीसुविधा उपलब्ध आहेत की नाही, हा महत्त्वाचा निकष लावला जातो. एका केंद्रावर सर्व साधारणपणे २५० ते ३०० विद्यार्थी असतात. या सर्व विद्यार्थ्यांसाठी आसन व्यवस्था करता येण्या इतके वर्ग आहेत का? या व्यतिरिक्त अन्य खोल्या उपलब्ध आहेत का हे पाहिले जाते. राज्यभरातील शाळा जून-जुलै महिन्यांतच परीक्षा केंद्रासाठी प्रस्ताव बोर्डाकडे पाठवतात. बोर्डाचे अधिकारी शाळांची तपासणी करतात आणि नंतरच केंद्राला परवानगी दिली जाते. किती कर्मचारी बोर्डाच्या परीक्षेसाठी कार्यरत असतात? बोर्डाचे कर्मचारी प्रत्यक्ष परीक्षा केंद्रावर कार्यरत नसतात. त्यांचे काम बोर्डाच्या कार्यालयात सुरु असते. दहावीच्या परीक्षेला परीक्षा केंद्र शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षक आणि अन्य कर्मचारी कार्यरत असतात. सर्व राज्यात १ लाख कर्मचारी बोर्डाच्या परीक्षांचे काम पाहात असतात. यामध्ये केंद्र निरीक्षकापासून अगदी पाणी आणून देणाऱ्या शिपायांपर्यंत सर्वांचा समावेश असतो. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी केंद्रांमध्ये कशी सोय केली जाते? परीक्षेचा फॉर्म भरल्यानंतर दिव्यांग विद्यार्थी सर्टिफिकेटसह बोर्डाकडे अर्ज पाठवतात. या विद्यार्थ्यांचे अर्ज आल्यावर त्याप्रमाणे माहिती संकलित केली जाते. परीक्षा केंद्रांना याविषयीची माहिती दिली जाते. काही परीक्षा केंद्रांवर दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी वरच्या मजल्यावरचा वर्ग आला आणि लिफ्टची सोय नसल्यास तळमजल्यावर वेगळी सोय करण्यात येते. एखाद्या दिव्यांग विद्यार्थ्यास परीक्षेदरम्यान त्रास झाल्यास त्यांनी बोर्डाकडे तक्रार नोंदवल्यास त्वरित कारवाई करण्यात येते. कॉपी रोखण्यासाठी कोणत्या योजना आखल्या जातात? परीक्षेदरम्यान कॉपी रोखण्यासाठी विशेष भरारी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. हे पथक विविध केंद्रांमध्ये भेट देत असतात. त्यामुळे कॉपीची प्रकरणे पकडली जात आहेत. याचबरोबरीने पर्यवेक्षक काही कॉपीची प्रकरणे पकडतात. कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्याला पकडल्यानंतर त्याला दुसरी उत्तरपत्रिका देऊन पेपर सोडवण्यास दिला जातो. पेपर संपल्यानंतर त्या विद्यार्थ्याची प्राथमिक चौकशी होते. परीक्षेनंतर पुढील कार्यवाही केली जाते.>परीक्षेमध्ये टेक्नॉलॉजीचा वापर कसा केला जातो ? परीक्षेचा फॉर्मही आता आॅनलाईन पद्धतीने भरला जातो. त्यानंतर एक यादी तयार करुन पुन्हा शाळांमध्ये पाठविली जाते. या यादीत काही चुका असतील तर त्यांची दुरुस्ती केली जाते. त्यानंतर शेवटची यादी तयार करण्यात येते. निकालही आॅनलाईन पद्धतीने लावला जातो. मेसेज आणि संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना आधी निकाल मिळतो. त्यानंतर निकाल विद्यार्थ्यांना हातात मिळतो.