शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
2
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
3
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
4
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
5
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
6
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
7
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
8
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
9
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
10
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
11
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
12
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
13
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
14
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
15
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
16
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
17
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
18
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
19
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
20
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य

मुंबईत समान वीजदर तूर्त अशक्यच

By admin | Updated: May 27, 2016 00:53 IST

महिन्याकाठी ५०० युनिटपर्यंत विजेचा वापर करणाऱ्या ग्राहकांना समान वीज दर लावण्याच्या राज्य सरकारच्या योजनेला झटका बसला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी

मुुंबई : महिन्याकाठी ५०० युनिटपर्यंत विजेचा वापर करणाऱ्या ग्राहकांना समान वीज दर लावण्याच्या राज्य सरकारच्या योजनेला झटका बसला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी संबंधित कंपन्यांची त्यासाठी बैठक घेतली, पण कंपन्यांनी समान वीज दराबाबत असमर्थता व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले. समान वीज दर आकारण्याबाबत वीज वितरण कंपन्यांमध्ये मतभिन्नता असल्याचे बैठकीत स्पष्ट झाले. सरकारच्या इच्छेनुसार समान वीज दर लागू केले तर काही कंपन्यांवर त्याचा विपरीत आर्थिक परिणाम होऊन या क्षेत्रातील स्पर्धाच संपेल, असे मत बैठकीत व्यक्त झाले. गुरुवारच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित असलेल्या एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले की, १०० युनिटपर्यंत समान वीज दर लागू केल्यास रिलायन्सला वार्षिक १५० कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागेल आणि ३०० युनिटपर्यंतच्या वापरासाठी समान वीज दर लागू केले तर तोट्याचा हा आकडा ३५७ कोटी रुपयांपर्यंत पोहोचेल. बेस्टनेदेखील संभाव्य तोट्याबाबत रिलायन्सचीच री ओढली. टाटा पॉवरने मात्र समान वीज दराला अनुकूलता दर्शवित राज्य सरकारला काही सूचना केल्या. (विशेष प्रतिनिधी)समान वीज दराबाबत कंपन्यांमधील मतभिन्नता लक्षात घेऊन एकमत होण्याच्या दृष्टीने नवीन फॉर्म्युल्यावर विचार व्हावा, असे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले. पुढील वर्षाच्या सुरुवातीला होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समान वीज दर असावा, यासाठी राज्य सरकार इच्छुक आहे. कारण त्याद्वारे मध्यमवर्गीय मतदारांना मोठा दिलासा मिळू शकेल, असे सरकारला वाटते. अर्थात भविष्यात राज्य सरकार आणि वीज कंपन्यांमध्ये समान वीज दराबाबत एकमत झाले तरी वीज नियामक आयोगाची (एमईआरसी) अंतिम मंजुरी अंमलबजावणीसाठी अनिवार्य असेल. एकाच शहरात वेगवेगळ्या कंपन्या वीजपुरवठा करीत असताना समान वीज दर लागू करणे शक्य नाही, असे मत एमईआरसीने २००८मध्ये व्यक्त केले होते. समान वीज दर लागू करायचा असेल तर राज्य सरकारने अनुदान देणे ही एकमेव पद्धत असू शकते, असे मत एमईआरसीने २०११मध्ये व्यक्त केले होते.