शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत समान वीजदर तूर्त अशक्यच

By admin | Updated: May 27, 2016 00:53 IST

महिन्याकाठी ५०० युनिटपर्यंत विजेचा वापर करणाऱ्या ग्राहकांना समान वीज दर लावण्याच्या राज्य सरकारच्या योजनेला झटका बसला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी

मुुंबई : महिन्याकाठी ५०० युनिटपर्यंत विजेचा वापर करणाऱ्या ग्राहकांना समान वीज दर लावण्याच्या राज्य सरकारच्या योजनेला झटका बसला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी संबंधित कंपन्यांची त्यासाठी बैठक घेतली, पण कंपन्यांनी समान वीज दराबाबत असमर्थता व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले. समान वीज दर आकारण्याबाबत वीज वितरण कंपन्यांमध्ये मतभिन्नता असल्याचे बैठकीत स्पष्ट झाले. सरकारच्या इच्छेनुसार समान वीज दर लागू केले तर काही कंपन्यांवर त्याचा विपरीत आर्थिक परिणाम होऊन या क्षेत्रातील स्पर्धाच संपेल, असे मत बैठकीत व्यक्त झाले. गुरुवारच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित असलेल्या एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले की, १०० युनिटपर्यंत समान वीज दर लागू केल्यास रिलायन्सला वार्षिक १५० कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागेल आणि ३०० युनिटपर्यंतच्या वापरासाठी समान वीज दर लागू केले तर तोट्याचा हा आकडा ३५७ कोटी रुपयांपर्यंत पोहोचेल. बेस्टनेदेखील संभाव्य तोट्याबाबत रिलायन्सचीच री ओढली. टाटा पॉवरने मात्र समान वीज दराला अनुकूलता दर्शवित राज्य सरकारला काही सूचना केल्या. (विशेष प्रतिनिधी)समान वीज दराबाबत कंपन्यांमधील मतभिन्नता लक्षात घेऊन एकमत होण्याच्या दृष्टीने नवीन फॉर्म्युल्यावर विचार व्हावा, असे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले. पुढील वर्षाच्या सुरुवातीला होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समान वीज दर असावा, यासाठी राज्य सरकार इच्छुक आहे. कारण त्याद्वारे मध्यमवर्गीय मतदारांना मोठा दिलासा मिळू शकेल, असे सरकारला वाटते. अर्थात भविष्यात राज्य सरकार आणि वीज कंपन्यांमध्ये समान वीज दराबाबत एकमत झाले तरी वीज नियामक आयोगाची (एमईआरसी) अंतिम मंजुरी अंमलबजावणीसाठी अनिवार्य असेल. एकाच शहरात वेगवेगळ्या कंपन्या वीजपुरवठा करीत असताना समान वीज दर लागू करणे शक्य नाही, असे मत एमईआरसीने २००८मध्ये व्यक्त केले होते. समान वीज दर लागू करायचा असेल तर राज्य सरकारने अनुदान देणे ही एकमेव पद्धत असू शकते, असे मत एमईआरसीने २०११मध्ये व्यक्त केले होते.