शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

भाजपात उपऱ्यांची चांदी, निष्ठावंतांमध्ये खदखद

By admin | Updated: June 1, 2016 04:33 IST

विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून कालपरवा पक्षात दाखल झालेल्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्याने भाजपात प्रचंड खदखद आहे

मुंबई : विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून कालपरवा पक्षात दाखल झालेल्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्याने भाजपात प्रचंड खदखद आहे. पंधरा वर्षानंतर राज्यात सत्ता आली त्यामुळे प्रामाणिकपणे पक्ष कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी मिळणे अपेक्षित असताना ऐनवेळी धनदांडग्या उपऱ्यांना उमेदवारी बहाल करण्याच्या धोरणावर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी, मंगळवारी भाजपाकडून सहाजणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत, शिवसंग्रामचे विनायक मेटे या दोन मित्रपक्षातील उमेदवारांचा समावेश आहे. तर, भाजपाचे सुजितसिंह ठाकूर, प्रवीण दरेकर, आर.एन. सिंह, प्रसाद लाड यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. तर, उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या मनोज कोटक यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला. सुजितसिंह ठाकूरांचा अपवाद वगळता भाजपाचे अन्य तीनही उमेदवार अलीकडेच पक्षात दाखल झाले आहेत. वर्षानुवर्षे पक्षासाठी प्रामाणिकपणे राबणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलून ऐनवेळी बाहेरुन आलेल्यांना संधी देण्यात आल्याने भाजपा कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी पसरली आहे. मुंबई भाजपाचे सचिव विवेकानंद गुप्ता यांनी दरेकर यांच्या उमेदवारीचा पक्षाने फेरविचार करावा, अशी मागणी आधीच केली आहे. (प्रतिनिधी)घोडेबाजार होणारविधानसभेतील संख्याबळानुसार भाजपाचे पाच उमेदवारांचा विजय निश्चित मानला जात असताना ऐनवेळी भाजपाने सहावा उमेदवार जाहीर केल्याने मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. विधानसभेतील पक्षीय बलाबलानुसार एकूण ९ जागांपैकी भाजपाचे ५, शिवसेनेचे २ तर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वाट्याला ३ जागा येतात. घोडेबाजार टाळण्यासाठी विधान परिषदेची निवडणुक बिनविरोध व्हायला हवी, असा मानस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी व्यक्त केला होता. मात्र, आता भाजपानेच सहावा उमेदवार उभा केल्याने अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. उमेदवारी मागे घेण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी असून यात भाजपाच्या सहाव्या उमेदवाराने आणि बंडखोराने अर्ज मागे न घेतल्यास निवडणुका आणि घोडेबाजार अटळ आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मात्र, पक्षात कोणतीही बंडखोरी होणार नाही, असा दावा केला आहे. ही निवडणूक बिनविरोध करायची तर भाजपाच्या एका उमेदवाराला आणि कोटक यांनाही माघार घ्यावी लागणार आहे. नेमक्या कोणत्या उमेदवाराला भाजपा माघार घ्यायला सांगेल या बाबतची उत्सुकता कायम आहे.