शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
4
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
5
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
6
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
7
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
8
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
9
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
10
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
11
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
12
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
13
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
14
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
15
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
16
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
17
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
18
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
19
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
20
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 

व्हॉटस् अ‍ॅप वर जुळल्या रेशीमगाठी

By admin | Updated: July 29, 2016 19:15 IST

सोशल मीडिया तरुणांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. याचा अचूक वापर परळीतील अमित बियाणी यांनी केला.

ऑनलाइन लोकमतबीड, दि. २९  - सोशल मीडिया तरुणांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. याचा अचूक वापर परळीतील अमित बियाणी यांनी केला. माहेश्वरी समाजातील युवकांसाठी त्यांनी व्हॉटस् अ‍ॅप ग्रुप बनवून तब्बल १५१ युवक-युवतींना ऋणानुबंधात बांधण्याचे पवित्र कार्य केले.

आजच्या स्थितीला विवाह स्थळ पाहण्यासाठी अनेक वधू-वर सूचक केंद्र, विवाह मंडळे व आॅनलाईन पद्धतीने वधू-वरांचे परिचय करुन देणाऱ्या असंख्य वेबसाईट कार्यरत आहेत. वेबसाईटवरुन संपर्क करुन  विवाहाची बातचित पुढे सरकते व लग्न जुळते. मात्र अनेकवेळा परराज्यातील किंवा जिल्ह्यातील व्यक्तीशी विवाह झाल्यानंतर धोकेबाजीचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे मुलींचे आई-वडील हल्ली सावध झाले आहेत. असे प्रकार होऊ नयेत.

तसेच समाजातील मुलामुलींचे विवाह जुळून यावेत, यासाठी परळीतील अमित बियाणी यांनी व्हॉटस्अ‍ॅप ग्रुप तयार केला. ह्यमाहेश्वरी परिचय मित्रह्ण असे त्या ग्रुपला नाव दिले. एका व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपमध्ये २५६  व्यक्ती सहभागी होऊ शकतात. त्यामुळे त्यांनी याच नावाखाली तीन ग्रुप बनवून त्यामध्ये ७२५ सभासद बनविले. हा ग्रुप चालविण्यासाठी गोपाल ओमप्रकाश लाहोटी, सोनल गोपाल लाहोटी यांचे सहकार्य त्यांना मिळत आहे. ७२५ सभासदांमध्ये २२ जिल्ह्यांचे माहेश्वरी सभा, माहेश्वरी महिला मंडळाचे पदाधिकारी तसेच अखिल भारतीय युवा संघटनेचे कोषाध्यक्ष दत्तप्रसाद तोतला, प्रदेश विवाह समितीचे अध्यक्ष कांतीलाल राठी यांच्यासह राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, तामिळनाडू, पंजाब, हरियाणा येथीलही समाजबांधवांचा सहभाग आहे.

व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून युवक-युवतींचा बायोडाटा अपलोड करण्यात येतो. समाज के लिए समाज के साथ या ब्रीद वाक्याप्रमाणे अमित बियाणी यांचे काम अविरतपणे सुरू आहे. त्याला युवक-युवतींचा प्रतिसाद लाभत आहे. माहेश्वरी परिचय मित्र या व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून विवाह जुळविले जात आहेत. यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. आतापर्यंत या माध्यमातून दीडशे जोडप्यांचे विवाह जुळवून आणले आहेत. माहेश्वरी समाजबांधवांचा माहेश्वरी परिचय मित्र या ग्रुपवरचा विश्वास दिवसेंदिवस वाढत असून, सभासद संख्याही वाढली आहे. त्यामुळेच महाराष्टसह राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, तामिळनाडू यासह अमेरिकेसारख्या देशातूनही समाज बांधव जोडले गेले आहेत.