शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

रोहयोच्या मजुरांत लक्षणीय वाढ

By admin | Updated: April 28, 2016 06:01 IST

मराठवाड्यात दुष्काळाची दाहकता वाढत आहे़ पाणीटंचाईमुळे मजुरांना शेतावर काम मिळत नसल्यामुळे ते रोजगार हमी योजनेच्या कामांकडे वळत आहेत.

औरंगाबाद : मराठवाड्यात दुष्काळाची दाहकता वाढत आहे़ पाणीटंचाईमुळे मजुरांना शेतावर काम मिळत नसल्यामुळे ते रोजगार हमी योजनेच्या कामांकडे वळत आहेत. परिणामी या महिन्यात मजूर संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात ६ हजार ७४४ कामांवर १ लाख ३ हजार ६९ मजूर होते, तर तिसऱ्या आठवड्यात मजुरांच्या संख्येत तब्बल ६२ हजार ४०८ ने वाढ झालेली आहे़ एकूण ९ हजार १०४ कामांवर १ लाख ६५ हजार ४७७ मजूर आहेत. मजुराला प्रतिदिन १९१ रुपये मजुरी मिळत असून, मराठवाडा विभागात नोंदणीकृत मजूर संख्या ५४ लाख ३० हजार ८४९ इतकी आहे़ यातील २० लाख २७ हजार २६७ मजुरांना जॉबकार्ड देण्यात आले आहे.मध्यंतरीच्या काळात रोहयोच्या कामांवर असलेल्या मजुरांची संख्या झपाट्याने कमी झाली होती़ जिल्हाधिकाऱ्यांनी या योजनेचा तालुकानिहाय आढावा घेऊन रोहयो कामे मोठ्या प्रमाणात हाती घ्यावी आणि मागेल त्याला काम उपलब्ध करून द्या, अशा सूचना विभागीय प्रशासनाने दिल्या़ त्यानंतर त्यात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.सर्वाधिक मजूर हे बीड जिल्ह्यात आहेत़ १९४८ कामांवर ४९ हजार ८४१ मजूर आहेत़ त्याखालोखाल मजुरांची संख्या लातूर, जालना जिल्ह्यांत आहे. औरंगाबाद जिल्ह्यात औद्योगिक वसाहतींमध्ये रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने आणि मजुरीही चांगली मिळत असल्याने बहुसंख्य लोक औरंगाबादमध्येच काम करीत आहेत़ त्यामुळे रोहयोत कमी मजूर औरंगाबाद जिल्ह्यात आहेत. ती संख्या केवळ ७ हजार ७५४ इतकी आहे.>मद्य कारखान्याच्या पाणीकपातीचे प्रशासनाचे आदेश अहमदनगर : जिल्ह्यातील मद्य कारखान्यांच्या पाणीपुरवठ्यात ५० टक्के कपात करण्याचे आदेश बुधवारी सायंकाळी जिल्हा प्रशासनाने संबंधित यंत्रणांना दिले़ कारखान्यांच्या दैनंदिन पाण्याची मागणी तपासून ही कपात करण्यात येणार आहे. जिल्ह्यात असे १० कारखाने असून त्यातील बहुतांश साखर कारखान्यांशी संलग्न आहेत.मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मद्यनिर्मिती व इतर उद्योगांच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्याचे आदेश मंगळवारी दिले. या आदेशाच्या अंमलबजावणीबाबत बुधवारी सायंकाळी अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांच्या दालनात बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. जिल्ह्यात दहा मद्यनिर्मितीचे कारखाने आहेत़ त्यापैकी कर्मवीर सहकारी साखर कारखाना, संजीवनी सहकारी साखर कारखाना आणि डॉ़ विठ्ठलराव विखे कारखान्यांना थेट कॅनॉलद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो़ या कारखान्यांच्या पाणीपुरवठ्यात कपात करून वाचणारे पाणी दुष्काळी भागांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे़जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीतील उद्योगाच्या पुरवठ्यात देखील २० टक्के कपात करण्यात येणार आहे़ बुधवारपासून २० टक्के आणि १० मेपासून १० जूनपर्यंत आणखी ५ टक्के म्हणजे, एकूण २५ टक्के कपात होईल