शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प तोंडघशी पडले, कसले सीझफायर? इराणकडून इस्रायलवर मिसाईलचा वर्षाव; तिघांचा मृत्यू...
2
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?
3
भंगाराखाली दडलंय काय?; ट्रक रोखला, तपासणी केली तेव्हा आढळला १ कोटींचा 'गुलाबी खजिना'
4
पुरुषावर बलात्कार करणारा देवेगौडांचा नातू सुरज रेवण्णा मोकाट; पीडित मात्र सीबीआयच्या नजरकैदेत...
5
IPO ची धमाकेदार लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचा पैसा डबल, ९९.४९ टक्क्यांचा फायदा
6
"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?
7
अरे का, मी पूजेला एकटी बसू शकत नाही? ट्रोल झाल्यावर अमृता खानविलकरने थेट विचारला प्रश्न
8
Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी
9
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं निवडीसाठी डेडलाईन वाढवली, का घेतला निर्णय?
10
"आमचा देश शरणागती पत्करणाऱ्यातला नाही"; युद्धबंदीच्या घोषणेनंतर खामेनी यांचे मोठे विधान
11
जुन्नरच्या कोकणकड्यात तरुण-तरुणीचे मृतदेह आढळले; आत्महत्येचा संशय, परिसरात खळबळ
12
दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?; अजित डोवाल यांनी घेतली चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट
13
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
14
होणाऱ्या सुनेसोबत पळून गेलेला सासरा ८ दिवसांनी परतला; कहाणीत आला नवा ट्विस्ट
15
धक्कादायक! एकतर्फी प्रेम, तरुणाचं लग्न, तरुणीने १२ राज्याच्या पोलिसांना लावले कामाला, अहमदाबाद विमान क्रॅश केल्याचा दावा
16
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
17
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
18
Mumbai: दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पती संतापला, मुलांसमोर पत्नीला संपवलं, मुंबईतील भयानक घटना
19
पंढरपूरला पुराचा धोका, उजनीतून भीमा नदीत ३१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग
20
"मला भीती वाटतेय...", 'रामायण'मध्ये हनुमानाच्या भूमिकेबाबत सनी देओलचं वक्तव्य, म्हणाला...

सिग्नल, वनवे धुडकाविण्यातही आघाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2016 00:58 IST

दैनंदिन धावपळीत सिग्नल मोडणे आणि वनवे रस्त्यांना हरताळ फासण्यातही पुणेकरांनी आघाडी घेतल्याचे पुन्हा एकदा समोर आले

पुणे : दैनंदिन धावपळीत सिग्नल मोडणे आणि वनवे रस्त्यांना हरताळ फासण्यातही पुणेकरांनी आघाडी घेतल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. वाहतूक नियम केवळ नावालाच असतात; याची पुन्हा एकदा प्रचिती देत १ जानेवारी ते जुलै २०१६ अखेर दर महिन्यास तब्बल ३३ हजार ५८0 पुणेकरांनी सिग्नल जंपिंग केले असून याच कालावधीत दर महिन्यास सुमारे ५ हजार वाहनचालक वनवेमधून प्रवास करताना त्यांच्यावर कारवाई केली जात असल्याचे चित्र आहे. शहराचा गेल्या दशकभरात वेगाने विकास झाला आहे. वाढत्या नागरीकरणामुळे आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्याने शहरातील बहुतांश नागरिक स्वत:चे वाहन घेण्यावर भर देत असल्यने शहरातील वाहनांची संख्या ३१ लाखांच्यावर गेली असून त्यातील जवळपास ७० टक्के वाहने ही दुचाकी आहेत. त्यामुळे शहरातील रस्त्यावर सकाळी तसेच संध्याकाळी दुचाकींच्या रांगा लागत असल्याचे चित्र असून त्यामुळे वारंवार वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत शहरातील वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस नवीन विक्रम प्रस्थापित करीत असल्याचे चित्र आहे. वाहतूक पोलिसांनी अशा नियमभंग करणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांची माहिती सामाजिक कार्यकर्ते प्रफ्फुल सारडा यांनी माहिती अधिकाराअंतर्गत मागविली होती. यात दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी ते जुलै २०१६ अखेर वाहतूक पोलिसांनी सिग्नल मोडणाऱ्या तब्बल २ लाख ३५ हजार ०५४ वाहनांवर कारवाई केली आहे, तर याच कालवधीत वाहतूककोंडी टाळण्यासाठी तसेच वाहतूक सुरळीत करण्यात वनवे करण्यात आलेल्या रस्त्यांवर नियमभंग करणाऱ्या तब्बल ५३ हजार ९६ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)>अडीच वर्षांत साडेसात हजार केसेसवाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या अडीच वर्षांत शहरात तब्बल साडेसात हजार वाहनचालकांवर सिग्नल ब्रेकिंगची कारवाई करण्यात आली आहे. त्यात २०१४ मध्ये १ लाख ५२ हजार ०३३, २०१५ मध्ये ३ लाख ८९ हजार ११४, तर जुलै २०१६ अखेरपर्यंत २ लाख ३५ हजार ०५४ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. या अडीच वर्षांत या नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांकडून ७ कोटी ८५ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आलेला आहे. त्यामुळे अवघ्या काही सेकंदासाठी पुणेकर दरवर्षी सरासरी अडीच कोटी रुपये वाहतूक पोलिसांच्या तिजोरीत जमा केले जात असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होते.>अडीच वर्षांत दीड लाख जणांचा वनवेला हरताळया अडीच वर्षांच्या कालावधीत तब्बल दीड लाख पुणेकरांनी वनवेच्या नियमालाही हरताळ फासला आहे. प्रामुख्याने शहरातील मध्यवर्ती पेठांमध्ये सर्वाधिक रस्ते वनवे करण्यात आलेले असून या भागातच ही कारवाई करण्यात आलेली आहे. वनवेमधून नियमभंग करणाऱ्यांविरोधात २०१४ मध्ये २९ हजार ८६८ केसेस, २०१५ मध्ये ७४ हजार ०६७, तर जुलै २०१६ अखेर ५३ हजार ९१६ केसेस नोंदविल्या गेल्या आहेत. त्यामधून १ कोटी ७० लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आलेला असल्याचे या माहितीमधून समोर आले आहे.