शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; लेखक, कवी महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार परत करणार
2
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
3
Iran Israel War: मोठ्या संकटात अडकलाय भारत; ३.६ लाख कोटींचा आकडा का घाबरवतोय?
4
नवीन युगाची सुरुवात! ड्रायव्हरशिवाय धावल्या गाड्या; Tesla ची Robotaxi सेवा सुरू...
5
सोनम रघुवंशीला 'वाचवणारा आणि लपवणारा' लोकेंद्र तोमर कोण? राजा हत्याकांडात आणखी एक मोठा खुलासा
6
Devendra Fadnavis: राहुल गांधींना मेक इन इंडिया माहिती नाही, त्यांनी गृहपाठ करायला हवा; फडणवीसांचा टोला!
7
तुमचा पैसा 'रॉकेट' बनवणार! 'या' ५ म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ? पाहा संपूर्ण यादी!
8
पुतण्याच्या प्रेमात काकी झाली वेडी, पती आणि तीन वर्षांच्या मुलीला सोडलं, पुतण्यासोबत लग्न केलं
9
नितीशकुमारांची सत्ता धोक्यात? नव्या सर्व्हेतून धक्कादायक 'लाट'; बिहार निवडणुकीपूर्वीच....
10
Maharashtra Politics : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार, भास्कर जाधव मोठा निर्णय घेणार?, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
11
भारतासोबतच्या सिंधू जल करार वादात OIC ची एन्ट्री; ५७ इस्लामिक देशांचा पाकिस्तानच्या सूरात सूर
12
युनूस यांची खेळी, भारताविरोधी षडयंत्र; बांगलादेशात पाकिस्तानी ISI हस्तकाला मोठी जबाबदारी
13
जगभर: डोनाल्ड ट्रम्प याची 'दादागिरी', अमेरिकेत भारतीय प्राध्यापकांनाही ‘बंदी’!
14
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
15
पुण्याच्या नळ स्टॉप स्टेशनवरुन पकडली मेट्रो, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?
16
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
17
Iran Israel War: इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम नोकऱ्यांवरही, कंपन्यांमध्ये भरती प्रक्रिया थांबली; कर्मचारीही चिंतेत
18
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
19
Lalit Upadhyay: भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती!
20
पहिल्या कसोटीत इंग्लंडला एवढ्या धावांचं आव्हान दिल्यास भारताचा विजय निश्चित, असं आहे समीकरण 

११५ वर्षांत शेटफळ हवेली तलाव कोरडा

By admin | Updated: March 12, 2016 01:27 IST

निर्मितीपासून गेल्या ११५ वर्षांत कधीही कोरडा न पडलेला शेटफळ हवेली येथील तलाव वीर, भाटघर धरणातून गेल्या ११ महिन्यांत एकही पाण्याचे आवर्तन मिळाले नसल्याने कोरडा पडला आहे.

इंदापूर : निर्मितीपासून गेल्या ११५ वर्षांत कधीही कोरडा न पडलेला शेटफळ हवेली येथील तलाव वीर, भाटघर धरणातून गेल्या ११ महिन्यांत एकही पाण्याचे आवर्तन मिळाले नसल्याने कोरडा पडला आहे. ज्या बहाद्दर शेतकऱ्याच्या आंदोलनामुळे ब्रिटिश सरकारला शेटफळ हवेली तलावासह वीर व भाटघर धरणाची निर्मिती करावी लागली, त्या ज्ञानदेव भोंगळे यांच्या गावातील शेतकऱ्यांना केंद्र व राज्य शासनाच्या विरोधात एल्गार पुकारण्याचा निर्णय तेथील प्रमुख कार्यकर्त्यांनी घेतला आहे. पाऊण टीएमसी क्षमतेच्या शेटफळ हवेली तलावाची निर्मिती सन १८६९ साली ब्रिटिश सरकारने केली. त्या वेळेपासून शेटफळ, सुरवड, वकीलवस्ती, बावडा, भोडणी, लाखेवाडी, पिठेवाडी, भगतवाडी, नीरा निमगाव, सराटी, चाकाटी या ११ गावांतील १ हजार ९२० हेक्टर क्षेत्र बारमाही ओलिताखाली आलेले आहे.हा तलाव नीरा डाव्या कालव्याचाच एक भाग आहे. पाटबंधारे खात्याने नीरा डाव्या कालव्यास सहा आवर्तने नेमून दिली आहेत. वीर, भाटघर धरण या वर्षी कमी प्रमाणात भरल्याने शेटफळ हवेलीच्या तलावात गेल्या ११ महिन्यांपासून पाण्याचे आवर्तन आले नाही. त्यामुळे तलाव कोरडा पडला आहे.या संदर्भात पत्रकारांशी बोलताना शेटफळ हवेलीचे माजी सरपंच, जलअभ्यासक बाळासाहेब करगळ यांनी सांगितले की, स्वातंत्र्यपूर्व काळात मंजुरी मिळालेल्या वीर धरणाचे काम सन १९५४ साली पूर्ण झाले.पाण्याचे वाटप करताना भाटघर २३ टक्के, नीरा डावा कालवा ४३ टक्के, नीरा उजवा कालवा ५७ टक्के असा आराखडा निश्चित करण्यात आला.सन १९५४-५५ मध्ये फलटण येथे पाणी परिषद घेऊन यशवंतराव चव्हाण यांनी वीर धरणातील पाणीवाटप निश्चित केले. त्या वेळी इंदापूरचे तत्कालीन लोकप्रतिनिधी दिवंगत शंकरराव पाटील राज्याच्या मंत्रिमंडळात होते. मात्र, नीरा डाव्या कालव्याला पाणी मिळाले नाही. सन १९८५ साली नीरा देवघर धरण सुरू झाले. वीर धरणाच्या वरच्या बाजूस बांधण्यात आलेल्या या बारा टीएमसी पाणी साठवण क्षमतेच्या या धरणातून आजपर्यंतच्या एकाही लोकप्रतिनिधीला इंदापूर तालुक्यासाठी पाणी आणता आले नाही. सन १९९६ ला युती शासनाने गुंजवणी धरणाची निर्मिती केली. तालुक्याचे तत्कालीन लोकप्रतिनिधी हर्षवर्धन पाटील त्या वेळी राज्यमंत्री होते. त्यांनाही ते पाणी तालुक्यात आणता आले नाही. (वार्ताहर)>वीर, भाटघर न भरल्याने तलावात पाणी नाही...धरणाच्या प्रकल्प अहवालात पावसाळी हंगामात नीरा कालव्यास पाणी देण्याची तरतूद केली जाते. केंद्र सरकारच्या लवादाने ४८ टीएमसी पाणी नीरा व्हॅलीमध्ये अडविण्यास परवानगी दिली आहे. वीर धरणात नऊ टीएमसी, गुंजवणीत चार टीएमसी, पंचवीस तलावात चार टीएमसी पाणीसाठा करण्यासाठी परवानगी राज्य शासनाने केंद्रीय जलआयोगाकडे १२/९/९६ रोजी मागितली होती. पाणीसाठा होण्याची विश्वासार्हता नसल्याने ४/८/२००३ रोजी परवानगी नाकारली. तत्पूर्वी युती सरकारने नीरा देवघर व गुंजवणी ही दोन्ही धरणे बांधली आहेत. नीरा नदी ४२ टीएमसीपेक्षा वाहत नाही, हे माहीत असूनही धरणे बांधली गेली आहेत. यामुळे शंभर वर्षांपूर्वीचे सिंचन संपणार आहे. शेटफळ तलाव हा नीरा डावा कालव्याचा एक भाग आहे. पाटबंधारे विभागाने नीरा डाव्या कालव्यास सहा आवर्तन दिली आहेत. परंतु वीर,भाटघर धरण कमी प्रमाणात भरल्याने पाणी सोडण्यात आले नाही. अकरा महिन्यांत एकही आवर्तन तलावात आले नाही म्हणून तलाव आटला.