शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

११५ वर्षांत शेटफळ हवेली तलाव कोरडा

By admin | Updated: March 12, 2016 01:27 IST

निर्मितीपासून गेल्या ११५ वर्षांत कधीही कोरडा न पडलेला शेटफळ हवेली येथील तलाव वीर, भाटघर धरणातून गेल्या ११ महिन्यांत एकही पाण्याचे आवर्तन मिळाले नसल्याने कोरडा पडला आहे.

इंदापूर : निर्मितीपासून गेल्या ११५ वर्षांत कधीही कोरडा न पडलेला शेटफळ हवेली येथील तलाव वीर, भाटघर धरणातून गेल्या ११ महिन्यांत एकही पाण्याचे आवर्तन मिळाले नसल्याने कोरडा पडला आहे. ज्या बहाद्दर शेतकऱ्याच्या आंदोलनामुळे ब्रिटिश सरकारला शेटफळ हवेली तलावासह वीर व भाटघर धरणाची निर्मिती करावी लागली, त्या ज्ञानदेव भोंगळे यांच्या गावातील शेतकऱ्यांना केंद्र व राज्य शासनाच्या विरोधात एल्गार पुकारण्याचा निर्णय तेथील प्रमुख कार्यकर्त्यांनी घेतला आहे. पाऊण टीएमसी क्षमतेच्या शेटफळ हवेली तलावाची निर्मिती सन १८६९ साली ब्रिटिश सरकारने केली. त्या वेळेपासून शेटफळ, सुरवड, वकीलवस्ती, बावडा, भोडणी, लाखेवाडी, पिठेवाडी, भगतवाडी, नीरा निमगाव, सराटी, चाकाटी या ११ गावांतील १ हजार ९२० हेक्टर क्षेत्र बारमाही ओलिताखाली आलेले आहे.हा तलाव नीरा डाव्या कालव्याचाच एक भाग आहे. पाटबंधारे खात्याने नीरा डाव्या कालव्यास सहा आवर्तने नेमून दिली आहेत. वीर, भाटघर धरण या वर्षी कमी प्रमाणात भरल्याने शेटफळ हवेलीच्या तलावात गेल्या ११ महिन्यांपासून पाण्याचे आवर्तन आले नाही. त्यामुळे तलाव कोरडा पडला आहे.या संदर्भात पत्रकारांशी बोलताना शेटफळ हवेलीचे माजी सरपंच, जलअभ्यासक बाळासाहेब करगळ यांनी सांगितले की, स्वातंत्र्यपूर्व काळात मंजुरी मिळालेल्या वीर धरणाचे काम सन १९५४ साली पूर्ण झाले.पाण्याचे वाटप करताना भाटघर २३ टक्के, नीरा डावा कालवा ४३ टक्के, नीरा उजवा कालवा ५७ टक्के असा आराखडा निश्चित करण्यात आला.सन १९५४-५५ मध्ये फलटण येथे पाणी परिषद घेऊन यशवंतराव चव्हाण यांनी वीर धरणातील पाणीवाटप निश्चित केले. त्या वेळी इंदापूरचे तत्कालीन लोकप्रतिनिधी दिवंगत शंकरराव पाटील राज्याच्या मंत्रिमंडळात होते. मात्र, नीरा डाव्या कालव्याला पाणी मिळाले नाही. सन १९८५ साली नीरा देवघर धरण सुरू झाले. वीर धरणाच्या वरच्या बाजूस बांधण्यात आलेल्या या बारा टीएमसी पाणी साठवण क्षमतेच्या या धरणातून आजपर्यंतच्या एकाही लोकप्रतिनिधीला इंदापूर तालुक्यासाठी पाणी आणता आले नाही. सन १९९६ ला युती शासनाने गुंजवणी धरणाची निर्मिती केली. तालुक्याचे तत्कालीन लोकप्रतिनिधी हर्षवर्धन पाटील त्या वेळी राज्यमंत्री होते. त्यांनाही ते पाणी तालुक्यात आणता आले नाही. (वार्ताहर)>वीर, भाटघर न भरल्याने तलावात पाणी नाही...धरणाच्या प्रकल्प अहवालात पावसाळी हंगामात नीरा कालव्यास पाणी देण्याची तरतूद केली जाते. केंद्र सरकारच्या लवादाने ४८ टीएमसी पाणी नीरा व्हॅलीमध्ये अडविण्यास परवानगी दिली आहे. वीर धरणात नऊ टीएमसी, गुंजवणीत चार टीएमसी, पंचवीस तलावात चार टीएमसी पाणीसाठा करण्यासाठी परवानगी राज्य शासनाने केंद्रीय जलआयोगाकडे १२/९/९६ रोजी मागितली होती. पाणीसाठा होण्याची विश्वासार्हता नसल्याने ४/८/२००३ रोजी परवानगी नाकारली. तत्पूर्वी युती सरकारने नीरा देवघर व गुंजवणी ही दोन्ही धरणे बांधली आहेत. नीरा नदी ४२ टीएमसीपेक्षा वाहत नाही, हे माहीत असूनही धरणे बांधली गेली आहेत. यामुळे शंभर वर्षांपूर्वीचे सिंचन संपणार आहे. शेटफळ तलाव हा नीरा डावा कालव्याचा एक भाग आहे. पाटबंधारे विभागाने नीरा डाव्या कालव्यास सहा आवर्तन दिली आहेत. परंतु वीर,भाटघर धरण कमी प्रमाणात भरल्याने पाणी सोडण्यात आले नाही. अकरा महिन्यांत एकही आवर्तन तलावात आले नाही म्हणून तलाव आटला.