शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

ATM चे शटर डाऊन, जनता मेटाकुटीला

By admin | Updated: November 11, 2016 10:46 IST

दोन दिवसांनंतरही देशभरातील एनेक एटीएम मशीन्स अद्यापही बंद असून नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ११ - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटा एकारात्रीत चलनातून बाद करण्याचा धाडसी निर्णय घेतल्यानंतर लोकांनी या निर्णयाचे स्वागत केले. मात्र ख-या अर्थाने आता या निर्णयाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. खात्यात बक्कळ पैसे असले तरी तीच रक्कम हातात पडत नसल्याने लोक अक्षरक्ष मेटाकुटीला आले आहेत. 
 
भाजीपाला, फळे, औषधे, किरणामालाचे सामान घेण्यासाठी आवश्यक नोटा पाकिटात नसल्याने लोकांचे हाल सुरु आहेत. मंगळवारी रात्री पंतप्रधानांनी निर्णय जाहीर केल्यानंतर बुधवारी बँका बंद होत्या. आज दोन दिवसांनी एटीएम मशीन्स सुरु होणार होत्या. पण अजूनही एटीएमचे शटर बंद असल्याने लोकांचे हाल होत आहे. 
 
काही एटीएममशीन्समधून अद्यापी जुन्या नोटा काढून घेण्यात आलेल्या नाहीत. एटीएम बंद असल्याने लोकांनी बँकांमध्ये गर्दी केली आहे. सर्वच बँकांच्या बाहेर रांगा लागल्याचे चित्र आहे. त्यात बँका आणि एटीएममधून रक्कम काढण्यावर निर्बंध असल्यामुळे लोकांच्या त्रासामध्ये अधिकच भर पडली आहे.   
 
महाराष्ट्रासह देशभरात नागरिक पैशांसाठी वाट पाहत असताना  भोपाळ, बंगळुरू, नवी दिल्ली येथेही नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मंगळवारी रात्री  तातडीने ज्यांनी एटीएममधून पैसे काढले त्यांना त्या तुलनेत थोडया कमी अडचणींचा सामना करावा लागत आहे.