शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईवरून गदारोळ

By admin | Updated: December 22, 2014 23:59 IST

मुंबईच्या विकासासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले

नागपूर : मुंबईच्या विकासासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले सूतोवाच व या संदर्भात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी पंतप्रधानांना लिहिलेले पत्र यावरून सोमवारी विधानसभेत गदारोळ झाला. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी या मुद्यावर एकत्र येत सभागृहात नारेबाजी केली. या विषयावर विरोधी पक्षाने दिलेला स्थगन स्वीकारण्याची मागणी जोरकसपणे लावून धरली. मात्र, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी स्थगन नाकारल्यामुळे नारेबाजी करीत विरोधकांनी सभात्याग केला. दरम्यान विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी मुंबई हा महाराष्ट्राचाच भाग राहील, असे स्पष्ट केले. सोमवारी सभागृहाचे कामकाज सुरू होताच राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांनी हा मुद्दा उचलण्याचा प्रयत्न केला. परंतु अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी परवानगी दिली नाही. प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर आव्हाड यांनी पुन्हा एकदा स्थगन प्रस्तावादरम्यान हा मुद्दा उचलण्याचा प्रयत्न केला. परंतु या वेळीही अध्यक्षांनी स्थगन नाकारला. आव्हाड यांनी चर्चेची मागणी लावून धरली. परंतु अध्यक्षांनी पुढील कामकाज सुरू केले. यामुळे नाराज झालेले आव्हाड, शशिकांत शिंदे यांच्यासह विरोधी पक्षातील सदस्य अध्यक्षांच्या आसनासमोर येऊन नारेबाजी करू लागले. विरोधी ‘मुंबई आमच्या हक्काची...’ मुंबई तोडू देणार नाही...’ असे नारे देऊ लागले. शेवटी अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज १५ मिनिटांसाठी स्थगित केले. कामकाज पुन्हा सुरू होताच आव्हाड यांनी मुंबईवर चर्चा करण्याची मागणी लावून धरली. अध्यक्षांनी मागणी फेटाळून लावताच विरोधी पक्षाचे सदस्य पुन्हा अध्यक्षांच्या आसनासमोर येऊन नारेबाजी करू लागले. परंतु अध्यक्षांनी कामकाज सुरूच ठेवले व विरोधी पक्षाच्या सदस्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. समिती स्थापन झाली तरी मुंबईवर केंद्राचा अधिकार राहणार नाही. मुंबई महाराष्ट्राचीच राहील, असेही अध्यक्ष बागडे म्हणाले. मात्र विरोधक चर्चेच्या मागणीवर अडून राहिले. दरम्यान काँग्रेसचे उपनेते विजय वडेट्टीवार म्हणाले, मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचे षड्यंत्र सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून समितीचा विरोध केला आहे. त्यापार्श्वभूमीवर सभागृहात याची चर्चा झाली पाहिजे. वडेट्टीवार यांच्या वक्तव्यामुळे सत्तापक्षाचे सदस्य भडकले. अनेक सदस्य उभे राहून नारेबाजी करू लागले. दोन्ही बाजूंनी गदारोळ सुरू होता, तरी अध्यक्षांनी कामकाज मात्र थांबविले नाही. शेवटी विरोधकांनी सभात्याग करून विरोध दर्शविला. (प्रतिनिधी)