शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

मुंबईवरून गदारोळ

By admin | Updated: December 22, 2014 23:59 IST

मुंबईच्या विकासासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले

नागपूर : मुंबईच्या विकासासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले सूतोवाच व या संदर्भात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी पंतप्रधानांना लिहिलेले पत्र यावरून सोमवारी विधानसभेत गदारोळ झाला. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी या मुद्यावर एकत्र येत सभागृहात नारेबाजी केली. या विषयावर विरोधी पक्षाने दिलेला स्थगन स्वीकारण्याची मागणी जोरकसपणे लावून धरली. मात्र, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी स्थगन नाकारल्यामुळे नारेबाजी करीत विरोधकांनी सभात्याग केला. दरम्यान विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी मुंबई हा महाराष्ट्राचाच भाग राहील, असे स्पष्ट केले. सोमवारी सभागृहाचे कामकाज सुरू होताच राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांनी हा मुद्दा उचलण्याचा प्रयत्न केला. परंतु अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी परवानगी दिली नाही. प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर आव्हाड यांनी पुन्हा एकदा स्थगन प्रस्तावादरम्यान हा मुद्दा उचलण्याचा प्रयत्न केला. परंतु या वेळीही अध्यक्षांनी स्थगन नाकारला. आव्हाड यांनी चर्चेची मागणी लावून धरली. परंतु अध्यक्षांनी पुढील कामकाज सुरू केले. यामुळे नाराज झालेले आव्हाड, शशिकांत शिंदे यांच्यासह विरोधी पक्षातील सदस्य अध्यक्षांच्या आसनासमोर येऊन नारेबाजी करू लागले. विरोधी ‘मुंबई आमच्या हक्काची...’ मुंबई तोडू देणार नाही...’ असे नारे देऊ लागले. शेवटी अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज १५ मिनिटांसाठी स्थगित केले. कामकाज पुन्हा सुरू होताच आव्हाड यांनी मुंबईवर चर्चा करण्याची मागणी लावून धरली. अध्यक्षांनी मागणी फेटाळून लावताच विरोधी पक्षाचे सदस्य पुन्हा अध्यक्षांच्या आसनासमोर येऊन नारेबाजी करू लागले. परंतु अध्यक्षांनी कामकाज सुरूच ठेवले व विरोधी पक्षाच्या सदस्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. समिती स्थापन झाली तरी मुंबईवर केंद्राचा अधिकार राहणार नाही. मुंबई महाराष्ट्राचीच राहील, असेही अध्यक्ष बागडे म्हणाले. मात्र विरोधक चर्चेच्या मागणीवर अडून राहिले. दरम्यान काँग्रेसचे उपनेते विजय वडेट्टीवार म्हणाले, मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचे षड्यंत्र सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून समितीचा विरोध केला आहे. त्यापार्श्वभूमीवर सभागृहात याची चर्चा झाली पाहिजे. वडेट्टीवार यांच्या वक्तव्यामुळे सत्तापक्षाचे सदस्य भडकले. अनेक सदस्य उभे राहून नारेबाजी करू लागले. दोन्ही बाजूंनी गदारोळ सुरू होता, तरी अध्यक्षांनी कामकाज मात्र थांबविले नाही. शेवटी विरोधकांनी सभात्याग करून विरोध दर्शविला. (प्रतिनिधी)