शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

कोरेगाव तालुक्यातील तरुण गुजरातमध्ये ‘श्री ४२०’

By admin | Updated: November 5, 2015 23:55 IST

अहमदाबादेत गुन्हा : विवाहानंतर २५ लाख घेऊन छूमंतर झाल्याचा आरोप; आक्षेपार्ह फोटो, व्हिडिओ नेटवर टाकण्याची धमकी

सातारा : कोरेगाव तालुक्यातील विक्रम हनुमंत किंजले या तरुणाने गुजरातमधील वास्तव्यात आपल्याशी लग्न केले आणि त्यानंतर तब्बल २५ लाख रुपये घेऊन गायब झाला, अशी तक्रार अहमदाबादेतील एका तरुणीने तेथील पोलीस ठाण्यात केली आहे. आता हा तरुण आपल्याला धमकी देत असल्याचे तिचे म्हणणे आहे. उच्चपदस्थाची लेक असूनही आता चक्क खानावळ चालविण्याची वेळ आपल्यावर आली असल्याचे ती म्हणते. तरुणीच्या म्हणण्यानुसार, हा तरुण कोरेगाव तालुक्यातील एका गावचा मूळ रहिवासी आहे. गुजरातेत नोकरीस जाताना त्याने आपल्याला हिऱ्याच्या उद्योगात नोकरी मिळाली असल्याचे गावात सांगितले होते. त्या काळात या तरुणीशी त्याची ओळख झाली. तिचे पूर्वी एका तरुणाशी संबंध होते आणि त्याच्यापासून तिला एक मुलगाही होता. ही बाब येथील तरुणाला ठाऊक होती. तरीही त्याने तिच्याशी विवाह करण्याचा निर्णय घेतला. विवाहानंतर काही दिवस हा तरुण तिच्यासोबत राहिला. या काळात दोघांनीही तिचे सर्व बँक व्यवहार एकत्रितपणे हाताळले. तिचा एटीएम कोडही त्याला माहीत होता आणि तो तिचे बँक खाते हाताळत होता. या खात्यातून तब्बल १८ लाख रुपये त्याने काढून घेतले. तसेच तिच्या नातेवाइकाच्या खात्यावरही काही व्यवहार केले. एकंदर २५ लाख रुपये घेऊन तो गायब झाल्याची तरुणीची तक्रार आहे. दरम्यान, गुजरातेतून गायब झाल्यावर संबंधित तरुण कोरेगाव तालुक्यातील मूळ गावी आला. त्याने माण तालुक्यातील एका तरुणीशी विवाह केला. तिला त्याच्या पहिल्या विवाहाबद्दल अंधारात ठेवले असल्याचे अहमदाबादची तरुणी सांगते. ती यासंदर्भात वकिलांना सोबत घेऊन तरुणाच्या गावी येऊन गेली. स्थानिक पोलीस ठाण्यात तिने हा प्रकार सांगितला, तेव्हा फिर्याद गुजरातमधील संबंधित ठाण्यातच नोंदवावी लागेल, असे तिला सांगण्यात आले. त्यानुसार तिने मरीनगर (अहमदाबाद) पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.या तरुणीकडे दोघांच्या विवाहाचे फोटो आहेत. मात्र, आता हा विवाह आणि तिच्या खात्यावरून काढलेली रक्कम दोन्ही विसरून जा, असे कोरेगाव तालुक्यातील तरुण आणि त्याचे कुटुंबीय आपल्याला सांगतात आणि धमकी देतात, असे ती सांगते. (प्रतिनिधी)साताऱ्याच्या पोलीस अधीक्षकांना अर्जयावर्षी जून महिन्यात गुजरातमध्ये हा विवाह झाला होता. दोनच महिन्यात कोरेगाव तालुक्यातील तरुण या तरुणीच्या बँकेतील रोकड काढून गायब झाला. यासंदर्भात सातारच्या पोलीस अधीक्षकांकडे १० सप्टेंबर २०१५ रोजी तक्रार दाखल केली असल्याचे तरुणीचे म्हणणे आहे. पैसे परत मागताच आपल्याला दटावले जाते, तसेच आपले आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ नेटवर टाकण्याचीही धमकी दिली जाते, असे या तक्रारीत म्हटले आहे. या तरुणाच्या घरातील लोक त्याला सामील असून, तेही धमक्या देतात. सहा आॅगस्ट रोजी कोरेगाव तालुक्यातील संबंधित पोलीस ठाण्यात तिला साताऱ्यात घर घेऊन देण्याचा ‘समझोता’ झाला होता; पण तसे घडलेच नाही, असा उल्लेख या अर्जात आढळतो. आत्महत्येचाही प्रयत्नलग्न आणि त्यानंतरच्या घटनाक्रमाने व्यथित झाल्याने आपण मच्छर मारण्याचे औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता, असे तरुणीने पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.