शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
2
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
3
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
4
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
5
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
6
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
7
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
8
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
9
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
10
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
11
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
12
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
13
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
14
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
15
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
16
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
17
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
18
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
19
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
20
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?

कोरेगाव तालुक्यातील तरुण गुजरातमध्ये ‘श्री ४२०’

By admin | Updated: November 5, 2015 23:55 IST

अहमदाबादेत गुन्हा : विवाहानंतर २५ लाख घेऊन छूमंतर झाल्याचा आरोप; आक्षेपार्ह फोटो, व्हिडिओ नेटवर टाकण्याची धमकी

सातारा : कोरेगाव तालुक्यातील विक्रम हनुमंत किंजले या तरुणाने गुजरातमधील वास्तव्यात आपल्याशी लग्न केले आणि त्यानंतर तब्बल २५ लाख रुपये घेऊन गायब झाला, अशी तक्रार अहमदाबादेतील एका तरुणीने तेथील पोलीस ठाण्यात केली आहे. आता हा तरुण आपल्याला धमकी देत असल्याचे तिचे म्हणणे आहे. उच्चपदस्थाची लेक असूनही आता चक्क खानावळ चालविण्याची वेळ आपल्यावर आली असल्याचे ती म्हणते. तरुणीच्या म्हणण्यानुसार, हा तरुण कोरेगाव तालुक्यातील एका गावचा मूळ रहिवासी आहे. गुजरातेत नोकरीस जाताना त्याने आपल्याला हिऱ्याच्या उद्योगात नोकरी मिळाली असल्याचे गावात सांगितले होते. त्या काळात या तरुणीशी त्याची ओळख झाली. तिचे पूर्वी एका तरुणाशी संबंध होते आणि त्याच्यापासून तिला एक मुलगाही होता. ही बाब येथील तरुणाला ठाऊक होती. तरीही त्याने तिच्याशी विवाह करण्याचा निर्णय घेतला. विवाहानंतर काही दिवस हा तरुण तिच्यासोबत राहिला. या काळात दोघांनीही तिचे सर्व बँक व्यवहार एकत्रितपणे हाताळले. तिचा एटीएम कोडही त्याला माहीत होता आणि तो तिचे बँक खाते हाताळत होता. या खात्यातून तब्बल १८ लाख रुपये त्याने काढून घेतले. तसेच तिच्या नातेवाइकाच्या खात्यावरही काही व्यवहार केले. एकंदर २५ लाख रुपये घेऊन तो गायब झाल्याची तरुणीची तक्रार आहे. दरम्यान, गुजरातेतून गायब झाल्यावर संबंधित तरुण कोरेगाव तालुक्यातील मूळ गावी आला. त्याने माण तालुक्यातील एका तरुणीशी विवाह केला. तिला त्याच्या पहिल्या विवाहाबद्दल अंधारात ठेवले असल्याचे अहमदाबादची तरुणी सांगते. ती यासंदर्भात वकिलांना सोबत घेऊन तरुणाच्या गावी येऊन गेली. स्थानिक पोलीस ठाण्यात तिने हा प्रकार सांगितला, तेव्हा फिर्याद गुजरातमधील संबंधित ठाण्यातच नोंदवावी लागेल, असे तिला सांगण्यात आले. त्यानुसार तिने मरीनगर (अहमदाबाद) पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.या तरुणीकडे दोघांच्या विवाहाचे फोटो आहेत. मात्र, आता हा विवाह आणि तिच्या खात्यावरून काढलेली रक्कम दोन्ही विसरून जा, असे कोरेगाव तालुक्यातील तरुण आणि त्याचे कुटुंबीय आपल्याला सांगतात आणि धमकी देतात, असे ती सांगते. (प्रतिनिधी)साताऱ्याच्या पोलीस अधीक्षकांना अर्जयावर्षी जून महिन्यात गुजरातमध्ये हा विवाह झाला होता. दोनच महिन्यात कोरेगाव तालुक्यातील तरुण या तरुणीच्या बँकेतील रोकड काढून गायब झाला. यासंदर्भात सातारच्या पोलीस अधीक्षकांकडे १० सप्टेंबर २०१५ रोजी तक्रार दाखल केली असल्याचे तरुणीचे म्हणणे आहे. पैसे परत मागताच आपल्याला दटावले जाते, तसेच आपले आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ नेटवर टाकण्याचीही धमकी दिली जाते, असे या तक्रारीत म्हटले आहे. या तरुणाच्या घरातील लोक त्याला सामील असून, तेही धमक्या देतात. सहा आॅगस्ट रोजी कोरेगाव तालुक्यातील संबंधित पोलीस ठाण्यात तिला साताऱ्यात घर घेऊन देण्याचा ‘समझोता’ झाला होता; पण तसे घडलेच नाही, असा उल्लेख या अर्जात आढळतो. आत्महत्येचाही प्रयत्नलग्न आणि त्यानंतरच्या घटनाक्रमाने व्यथित झाल्याने आपण मच्छर मारण्याचे औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता, असे तरुणीने पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.