शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

श्रेयाचा ‘श्रीगणेशा’!

By admin | Updated: July 9, 2015 03:05 IST

गणेशोत्सव मंडळांवर उच्च न्यायालयाने लादलेल्या निर्बंधांमुळे मंडळांच्या उत्साहावर आधीच विरजण पडलेले असताना, आता कुणाच्या नवसाला सरकार पावणार यावरून शिवसेना-भाजपा

मुंबई : गणेशोत्सव मंडळांवर उच्च न्यायालयाने लादलेल्या निर्बंधांमुळे मंडळांच्या उत्साहावर आधीच विरजण पडलेले असताना, आता कुणाच्या नवसाला सरकार पावणार यावरून शिवसेना-भाजपा या दोन्ही सत्ताधारी पक्षांत चढाओढ सुरू झाल्याने मंडळांची पुरती दमछाक होत आहे. उच्च न्यायालयाने रस्त्यांवर मंडप घालण्यास बंदी केली असून, ध्वनिप्रदूषण न करण्याबाबत आदेश दिलेले आहेत. या आदेशांमुळे बृहन्मुंबई व ठाणे या महानगरांसह राज्यातील इतर शहरांमधील गणेशोत्सव मंडळांसमोर उत्सव कसा साजरा करायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सेनेने या आदेशांबाबत आक्रमक पवित्रा घेत सरकारने हस्तक्षेप करावा, अशी भूमिका घेतली. तर भाजपाने जनाधिकार समितीची बैठक घेऊन सुनील राणे व अमित साटम यांना न्यायालयात दाद मागण्याचा आदेश दिला होता. त्यांचा अर्ज न्यायालयात प्रलंबित आहे. विनापरवाना बांधलेले मंडप काढण्याचे आदेश सरकारने महापालिकांना दिले आहेत. या प्रकरणी सरकार आपली बाजू गुरुवारी न्यायालयात मांडणार आहे.-----------------उत्सवावरील विघ्न दूर होईल...गणेशोत्सव व नवरात्रोत्सव यावर गंडांतर आले आहे. त्यामुळे उत्सव साजरा करायचा किंवा कसे, याबाबत मंडळांमध्ये संभ्रम आहे. चर्चा काय झाली ते सांगण्याची ही वेळ नाही. उत्सव साजरा व्हावा याकरिता कायद्यात दुरुस्ती करणार किंवा कसे, हे सांगता येणार नाही. परंतु उत्सवावरील विघ्न दूर होईल, अशी आशा आहे.-उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख-------------------मंडळांसाठी हे बंधनकारकच! अन्यथा कारवाई!!मंडप किंवा कोणतेही अन्य बांधकाम यांना परवानगी देताना, परवानगीचा तपशील संबंधित मंडपाच्या दर्शनीभागावर ठळकपणे लावावा. आवश्यक मंजुरी न घेता सार्वजनिक रस्त्यांवर उभारण्यात आलेले तात्पुरते बुथ/मंडप वा अन्य बांधकाम उत्सवापूर्वी, धार्मिक कार्यक्रमांपूर्वी काढून टाकण्यात यावे.मंडप किंवा कोणतेही अन्य बांधकामास परवानगी देताना नागरिकांच्या मुलभूत अधिकारावर विपरित परिणाम होणार नाहीयाची दक्षता घ्यावी. उत्सव, कार्यक्रमांपूर्वी किमान ७ दिवसांपूर्वी दर्शनीभागावर लावण्यात येणारा परवानगीचा तपशील तपासणे. परवानगीचा तपशील नसल्यास मंडप काढून टाकण्याबाबत कार्यवाही करणे.पालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना अंमलबजावणी-दरम्यान बाधा आल्यास संबंधित पोलीस स्टेशनकडून आवश्यक ती सुरक्षा पुरविणे.-------------------उद्धव ठाकरे हे समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत बुधवारी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेणार, हे माहीत असल्यानेच शेलार यांनी मंगळवारी रात्री ‘वर्षा’ गाठून शिवसेनेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. ------------------------गणेशोत्सवासाठी आवश्यकता असल्यास कायद्यात बदल करू, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिल्याचे शेलार यांचे म्हणणे आहे. तर चर्चेचा तपशील कशाला द्यायला हवा, असे उद्धव यांनी माध्यम प्रतिनिधींना सांगितले.