शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजित पवार, शेतकऱ्यांनी जीवन संपवावे असे वाटते का तुम्हाला?”; प्रकाश आंबेडकरांचा सवाल
2
"मोदी आणि अमित शाह यांना तर हरवू शकत नाहीत, म्हणून..."; खर्गेंच्या संघावरील बंदीच्या मागणीवर बाबा रामदेव यांची तिखट प्रतिक्रिया
3
‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
4
Crime: कुटुंबासाठी काळ ठरला नवरा; बायको मुलीसह नातेवाईकाचा विळ्याने चिरला गळा, कारण काय?
5
तुमच्या बचतीवर बक्कळ नफा! ही घ्या ३ वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँकांची यादी
6
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
7
पत्नीला द्यायचं होतं सरप्राइज, पानवाल्याने जमवली १ लाखाची नाणी, सोनाराकडे गेला, त्यानंतर...   
8
Video - अडीच वर्षांचा मुलगा खेळताना आली स्कूल व्हॅन अन्...; काळजात चर्र करणारी घटना
9
तुमच्या जुन्या बँक खात्यात पैसे विसरलात का? RBI ने सांगितला फक्त ३ स्टेप्सचा सोपा मार्ग
10
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
11
नात्याला काळीमा ! दीराने वहिनीचे दोन्ही हात पकडून ठेवले अन् पतीने कापला गळा...
12
AUS vs IND 3rd T20I : संजू संघातून ‘आउट’; टॉसवेळी सूर्याचं मिचेल मार्शसमोर भन्नाट सेलिब्रेशन!
13
उद्धव ठाकरेंचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, शेतकऱ्यांशी साधणार संवाद
14
'ट्रॅजेडी क्वीन' मीना कुमारीवर बायोपिक येणार, क्रिती सेननचा पत्ता कट; 'ही' अभिनेत्री फायनल?
15
भाग्यवान! ११ वर्षांच्या मुलाचं अचानक 'असं' फळफळलं नशीब, रातोरात झाला करोडपती
16
डोक्यात रॉड मारून मोठ्या भावाची हत्या, मग गर्भवती वहिनीवर बलात्कार, नंतर तिलाही संपवलं...
17
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
18
५,८०० कोटींच्या २००० रुपयांच्या नोटा अजूनही लोकांकडे पडून! अजूनही बदलण्याची संधी
19
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: महादेव पूजनासह ‘या’ ७ गोष्टी आवर्जून करा; काही कमी पडणार नाही!
20
"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी

‘नीट’वरून श्रेयलढाई

By admin | Updated: May 21, 2016 05:35 IST

यंदाच्या शैक्षणिक वर्षापुरती ‘नीट’ प्रवेश परीक्षा लांबणीवर टाकण्याचा अध्यादेश काढण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला

मुंबई : यंदाच्या शैक्षणिक वर्षापुरती ‘नीट’ प्रवेश परीक्षा लांबणीवर टाकण्याचा अध्यादेश काढण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आणि राज्यात श्रेयाची एकच लढाई सुरू झाली. आम्हीच पुढाकार घेतला होता, असे म्हणत जवळपास सर्वच राजकीय नेत्यांनी या निर्णयावर आपला हक्क सांगण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, धनंजय मुंडे, मनसेप्रमुख राज ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आदी सर्वच नेत्यांनी नीट रद्द झाल्याबद्दल विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत श्रेयावर आपली दावेदारी सांगण्याचा प्रयत्न केला. केंद्र शासनाने अध्यादेश काढून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी सर्वप्रथम विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली होती. न्यायालयातून दिलासा मिळणार नाही हे लक्षात आल्यानंतर विविध राज्यांच्या शिक्षणमंत्र्यांची दिल्लीत बैठक झाली आणि अध्यादेशाच्या मुद्द्यावर एकमत झाले. मात्र, त्याची सुरुवात आपणच केली होती असे सांगत मुंडे यांनी कोण, कधी, काय बोलले याची तारीखवार जंत्रीच देऊ केली. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी तर थेट न्यूझीलंडमधून विद्यार्थ्यांना शुभेच्छा देणारी व्हिडीओ क्लिप पाठविली. ‘नीट’मुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये प्रचंड संभ्रम आणि गोंधळाचे वातावरण होते. या विषयासाठी मला जेव्हा पालक भेटले तेव्हा मी स्वत: पंतप्रधानांशी संपर्क साधला. राज्यातील ४ लाख विद्यार्थी प्रचंड तणावाखाली असल्याचे त्यांना सांगितले. पंतप्रधानांनी माझ्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देऊन नीट परीक्षेचे बंधन रद्द केले. याबद्दल पंतप्रधानांचे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो, असे राज यांनी आपल्या संदेशात सांगितले. दरम्यान, महाराष्ट्राने नीटबाबत मांडलेल्या भूमिकेला केंद्र सरकारने पाठिंबा दिला. त्यासाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सार्वजनिक आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा, केंद्रीय मंत्री अरुण जेटली, वेंकय्या नायडू, स्मृती इराणी यांचे आभार मानले. ३० एप्रिलपासून नीटबाबत राज्य सरकारने वेळोवेळी आपली भूमिका मांडून विविध राज्यांच्या मंत्र्यांसोबत, विद्यार्थी व पालकांसोबत बैठका घेऊन याबाबत पाठपुरावा केला आहे. त्यामुळेच हा सकारात्मक निर्णय घेतल्याचे तावडे यांनी सांगितले.>शिक्षणमंत्र्यांचा उल्लेख टाळलायुवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी या निर्णयाचे सारे श्रेय विद्यार्थ्यांना दिले. तणावाच्या परिस्थितीतही विद्यार्थ्यांनी नीटच्या विरोधात आवाज उठविला. त्यामुळे नीट लांबणीवर पडण्याचे सारे श्रेय विद्यार्थ्यांचे असल्याचा दावा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला. टिष्ट्वटरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना पंतप्रधान, मुख्यमंत्री अथवा शिक्षणमंत्र्यांचा उल्लेख करणे आदित्य ठाकरे यांनी कटाक्षाने टाळले.