शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘श्रीं’चे आगमन खड्डय़ातूनच?

By admin | Updated: August 22, 2014 00:35 IST

शहर आणि उपनगरातील श्रींच्या आगमन-विसजर्न मार्गावरील खड्डय़ांबाबत पालिका प्रशासनाने अद्याप एक अवाक्षरही काढलेले नाही.

मुंबई : अवघ्या मुंबापुरीला गणोशोत्सवाचे वेध लागले असतानाच मुंबई शहर आणि उपनगरातील श्रीगणोशाच्या आगमन-विसजर्न मार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला असला तरी यासंदर्भातील 26 ऑगस्ट ही डेडलाइन पाळली जाईल की नाही, याबाबतच शंका उपस्थित केली जाऊ लागली आहे.
मुंबईकरांच्या टीकेला सामोरे जावे लागू नये म्हणून मुंबई महापालिका प्रशासनाने मे महिन्यातच रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात केली होती. मात्र खड्डे बुजविण्यासाठी वापरण्यात येणा:या निकृष्ट दर्जाच्या साहित्यामुळे पावसाळ्यात पुन्हा बुजविण्यात आलेले खड्डे उखडत होते. जून आणि जुलै महिना महापालिका प्रशासनाने खड्डय़ांबाबत कसाबसा मारत नेला असला तरी या वेळी मात्र महापालिकेची दुहेरी कोंडी झाली आहे.
मुंबईत गणोशोत्सवाचे पडघम वाजू लागल्यानंतर सार्वजनिक गणोशोत्सव समन्वय समितीने महापालिका प्रशासनाला धारेवर धरले आहे. यापूर्वीच महापालिका मुख्यालयात झालेल्या बैठकीदरम्यान शहर आणि उपनगरातील श्रींच्या आगमन आणि विसजर्न मार्गावरील खड्डय़ांबाबत समितीने नाराजी व्यक्त केली होती. शिवाय अशा सर्वच खड्डय़ांची माहिती महापालिका प्रशासनाला देण्यात आली होती, असे समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर यांनी सांगितले.
महापालिका मुख्यालयात झालेल्या बैठकीदरम्यान महापौर सुनील प्रभू यांनी गणोशोत्सवापूर्वी मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती दिली होती. शिवाय गणोशोत्सवात भक्तांना आणि सर्व मुंबईकरांना खड्डय़ांचा त्रस होणार नाही, याकरिता महापालिका निश्चितच सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे, असेही त्यांनी बैठकीदरम्यान नमूद केले होते. 
प्रत्यक्षात मात्र चित्र वेगळेच आहे. कारण शहर आणि उपनगरातील श्रींच्या आगमन-विसजर्न मार्गावरील खड्डय़ांबाबत पालिका प्रशासनाने अद्याप एक अवाक्षरही काढलेले नाही.
सार्वजनिक गणोशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर यांच्या म्हणण्यानुसार, रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठीची डेडलाइन 26 ऑगस्ट देण्यात आली होती. विशेषत: श्री गणोशाच्या आगमन आणि विसजर्न मार्गावरील खड्डे लवकर बुजविण्यात यावे, असे म्हणणो आम्ही गतबैठकीदरम्यान मांडले होते. पालिकाही याबाबत सकारात्मक आहे. विशेषत: वॉर्ड स्तरावरही आयुक्तांसोबत समितीच्या पदाधिका:यांच्या बैठका होत असून, याबाबत सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. (प्रतिनिधी) 
 
च्कुर्ला पश्चिमेकडील शीतल तलावाकडे जाण्यासाठी मगन नथुराम मार्ग आहे आणि या मार्गाहून श्रीगणोशाचे आगमनही होते. शिवाय विसजर्नही होते. गेल्या तीन महिन्यांपासून या मार्गावर मोजता येणार नाहीत एवढे खड्डे पडले आहेत. विशेषत: या मार्गावर पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले असून, काही ठिकाणी मार्गाचा काही भाग सखल झाला आहे.
 
च्पश्चिम उपनगरातील आरे कॉलनीमधील छोटा काश्मीर तलावालगतच्या विसजर्न मार्गावरही मोठय़ा प्रमाणावर खड्डे पडले होते. यावर उपाय म्हणून या रस्त्यांवरील खड्डय़ांची तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली. परंतु आता पुन्हा त्यातील खडी बाहेर पडल्याचे स्थानिकांच्या वतीने सांगण्यात आले. 
 
पूर्व उपनगरातील भांडुप येथील शिवाजी तलावालगतच्या विसजर्न मार्गावरही मोठय़ा प्रमाणावर खड्डे पडले होते. त्यातील काही खड्डय़ांची दुरुस्ती पालिकेने सुरू केली आहे. मात्र उर्वरित खड्डे कधी बुजणार, असा सवालही स्थानिकांकडून केला जात आहे.