शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
3
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
4
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
5
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
6
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
7
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
8
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
9
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
10
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
11
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
12
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
13
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
14
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
15
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
16
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
17
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
18
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
20
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक

‘श्रीफळ ’ नमले!

By admin | Updated: August 2, 2016 23:07 IST

शुभ कार्यात, कोणत्याही देवी-देवतांच्या पूजेत श्रीफळ म्हणजेच नारळाला अनन्यसाधारण महत्व आहे. श्रीफळाशिवाय पूजा आणि कलश स्थापना होवूच शकत नाही, अथवा

- अनिल गवई
 
खामगाव, दि. २ : शुभ कार्यात, कोणत्याही देवी-देवतांच्या पूजेत श्रीफळ म्हणजेच नारळाला अनन्यसाधारण महत्व आहे.  श्रीफळाशिवाय पूजा आणि कलश स्थापना होवूच शकत नाही, अथवा दुस-या कुणाला या फळाचे स्थान घेता नाही. असे बहुमोल असलेल्या ‘श्रीफळा’ला अखेर नमावे लागले आहे.  
देवी-देवतांची पूजा, गृहप्रवेश, मंगल प्रसंग आदीमध्ये कलश स्थापन करण्याची परंपरा भारतात आहे. कलश स्थापनेसह, सत्कार प्रसंगातही श्रीफळाचीच भेट दिली जाते.  श्रीफळाच्या म्हणजेच नारळाच्या झाडाला ‘भूतलावरील कल्पवृक्ष’ असेही संबोधतात. पुराण, वेद, उपनिषदांमध्येही श्रीफळाचे महत्व सांगितले गेले आहे. मानाचे स्थान असलेल्या श्रीफळाला अखेर नमती घ्यावी लागली आहे. त्याचे कारणही तसेच असून, गेल्या दीड महिन्यांच्या कालावधीत श्रीफळाच्या किंमतीत निम्याने घट झाली आहे. ऐन सणासुदीच्या दिवसांच्या सुरूवातीलाच श्रीफळाचे भाव घसरल्याने किरकोळ विक्रेतेही हवालदिल झाले आहेत. दरम्यान, मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात ठोक बाजारात श्रीफळाचे दर १५००-१७०० रुपयापर्यंत तर जून-जुलै महिन्यात १२००-१४०० आणि जुलै अखेरीस ७३०-७५० रुपयांना श्रीफळाचे एक पोते मिळत आहे. त्यामुळे साहजिकच किरकोळ बाजारातही श्रीफळाचे दर पडले आहेत.
 
श्रीफळाचे किरकोळ बाजारातील दर
महिनाभाव
मार्च, एप्रिल, मे२०
जून-जुलै१८-१५
जुलै अखेर, आॅगस्ट१०
 
सणासुदीच्या दिवसाच्या सुरूवातीलाच नारळाचे दर पडले आहेत. त्यामुळे अत्यल्प दरात म्हणजे केवळ १० रुपयाला नारळ विकावे लागत आहे.
-सरस्वतीताई भारसाकळे,
किरकोळ नारळ विक्रेता, खामगाव.