शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

उन्हाळी शाळेचा मुलांना फटका

By admin | Updated: April 27, 2016 03:19 IST

परीक्षा संपल्याने मुलांना सुटी लागली. निकालाचा दिवसही झाला.

मिलिंद अष्टीवकर,

रोहा-परीक्षा संपल्याने मुलांना सुटी लागली. निकालाचा दिवसही झाला. निकाल हाती पडताच ऐन उन्हाळ्यात काही दिवसांसाठी सुरू झालेल्या शाळांच्या पुढील हंगामाबरोबरच विद्यार्थी आणि पालकांची परवडही सुरू झाली. कडक उन्ह आणि वातावरणातील उष्म्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत असून तापमानवाढीचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. याबाबत पालकांकडून तीव्र भावना व्यक्त होत आहेत. विद्यार्थी आणि पालकांना होणारा त्रास लक्षात घेऊन येथील एका शाळेने पुढील वर्षीपासून उन्हाळ्यातील ही काही दिवसांसाठीची शाळा न घेण्याचा निर्णय घेतला आहे.परीक्षांचा हंगाम मार्चअखेर व एप्रिलच्या पहिल्या सप्ताहात संपल्यानंतर उन्हाळी सुट्यांमध्ये रममाण झालेल्या विद्यार्थी वर्गाला थोडी उसंत मिळाली होती. मात्र सुटीचा आठ पंधरा दिवसांचा मनमुराद आनंद घेतल्यानंतर आणि वार्षिक निकाल लागला. त्यानंतर पुन्हा भर उन्हात शाळा सुरु झाल्या आहेत. सीबीएससी व काही स्टेट बोर्डाच्या शाळा उन्हाळ्यात दरवर्षी सुरू असतात. मात्र सध्या वाढणारे तापमान आणि उन्हाच्या झळांमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. काही शाळांतील वर्गांमध्ये ४० ते ६५ विद्यार्थी पटसंख्या असली तरी एका वर्गात केवळ दोन पंखे असल्याने विद्यार्थ्यांना प्रतिकूल वातावरणात ज्ञानाचे धडे घ्यावे लागत आहेत. यामुळे पालकांनी शाळा प्रशासनाविरुध्द नाराजी व्यक्त के ली आहे. निकाल लागल्यानंतर शाळा एप्रिलअखेरपर्यंत सुरू राहतात. यंदा केवळ १० दिवसांसाठी जे.एम.राठी व ग्रिगोरीयन शाळा सुरू झाल्या आणि विद्यार्थ्यांबरोबर पालकांचीही परवड सुरू आहे. मुलांना गरमीच्या दिवसांतील या शाळेचा खूप त्रास होतो, उन्हाळ्यातील ही १० दिवसांसाठीची शाळा नसावी.- महेंद्र पाटील, पालक, रोहा