शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

सुरक्षारक्षकांची लवकरच नियुक्ती

By admin | Updated: November 4, 2016 03:30 IST

अुपऱ्या मनुष्यबळाअभावी मालमत्तांना सुरक्षा पुरवायची तरी कशी, असा यक्षप्रश्न कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या सुरक्षा विभागाला पडला

कल्याण : अुपऱ्या मनुष्यबळाअभावी मालमत्तांना सुरक्षा पुरवायची तरी कशी, असा यक्षप्रश्न कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या सुरक्षा विभागाला पडला होता. मात्र, आता लवकरच महाराष्ट्र सुरक्षा मंडळाच्या ३४ कर्मचाऱ्यांची नेमणूक केली जाणार आहे. सुरक्षारक्षकांच्या कमतरतेमुळे महापालिकेच्या कोट्यवधी रुपयांच्या मालमत्ता वाऱ्यावर पडल्याचे वृत्त नुकतेच ‘लोकमत’ने दिले होते. यावर कर्मचारी नेमण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून, ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.सुरक्षारक्षकांची २६२ पदे मंजूर असून, सध्या १२९ पदे रिक्त आहेत. याचा सर्वाधिक फटका डोंबिवली विभागाला बसत आहे. या विभागासाठी ५५ सुरक्षारक्षक असलेतरी प्रत्यक्षात ४८ जणच कार्यरत आहेत. त्यामुळे येथील महापालिकेच्या बहुतांश मालमत्ता सुरक्षेविना वाऱ्यावर पडल्या आहेत. एकंदरीतच अवाका पाहता येथे ८५ सुरक्षारक्षकांची आवश्यकता आहे. काहींची नेमणूक डोंबिवलीसाठी करण्यात आली आहे; परंतु त्यांनी कल्याणमधील मुख्यालयात वर्षांनुवर्षे ठाण मांडले आहे. नवीन भरती होणाऱ्या सुरक्षारक्षकांचा कल सर्वसाधारणपणे अग्निशामन दला आणि लिपिक होण्याकडे असतो. तसेच निवृत्त होणाऱ्या सुरक्षारक्षकांच्या जागाही रिक्त राहत आहेत. त्यामुळे सुरक्षारक्षकांची नेहमीच वानवा जाणवते. ही उणीव भरून काढण्यासाठी महाराष्ट्र सुरक्षारक्षक मंडळाचे ३४ जण घेण्याचा निर्णय घेतला होता; परंतु याला मुहूर्त मिळालेला नव्हता. मागील महासभेत सभागृहनेते राजेश मोरे यांनी लवकरच सुरक्षाकर्मचारी तैनात करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर केला होता. मुदत संपलेल्या सुरक्षा मंडळाच्या कर्मचाऱ्यांची पुन्हा नेमणूक करा, अशी मागणी त्यांनी केली होती. (प्रतिनिधी)>ताण होणार हलकासुरक्षा मंडळाच्या कंत्राटाची मुदत मे महिन्यात संपली आहे. पुन्हा त्यांच्या नेमणुकीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. लवकरच त्यांची नेमणूक केली जाईल, अशी माहिती सहाय्यक मुख्य सुरक्षा अधिकारी सुहास खेर यांनी दिली.