शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

औषधांचा तुटवडा, रूग्णांची संख्या वाढतेय

By admin | Updated: August 30, 2014 23:11 IST

शहरात स्वाइन फ्लूचे मृत्युसत्र सुरूच असून, बीड येथील महिलेचा या आज एका खासगी रुग्णालयात मृत्यू झाला.

पुणो :  शहरात स्वाइन फ्लूचे मृत्युसत्र सुरूच असून, बीड येथील महिलेचा या आज एका खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. प्रफ्फुलता खंडू सोंडगे असे (35 वर्षे ) असे या महिलेचे नाव असून, स्वराज्यनगर, बार्शी रस्ता बीड येथील त्या रहिवासी आहेत. आज मध्यरात्री सव्वाबाराच्या  सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 
 सोंडगे यांना 12 ऑगस्टपासून सर्दी, खोकला आणि तापाचा त्रस होत होता. 14 ऑगस्टपासून त्यांना श्वास घेण्यास त्रस सुरू झाला. त्यानंतर त्यांना 16 ऑगस्ट रोजी बीड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, त्या ठिकाणीही प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना पुढील उपचारासाठी 19 ऑगस्ट रोजी औरंगाबाद येथे हालविण्यात आले. त्या वेळी त्यांच्यावर टॅमी फ्लूचे उपचार सुरू करण्यात आले होते. त्या  ठिकाणी त्यांच्या घशातील द्रवातील नमुन्याची तपासणी केली असता, त्यांना स्वाईन फ्लू झाल्याचे आढळून आले. त्यानंतर त्यांना तत्काळ 23 ऑगस्ट रोजी पुण्यात उपचारासाठी हालविण्यात आले. मात्र, आज मध्यरात्री सव्वाबाराच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.  (प्रतिनिधी)
 
दोन महिन्यांपूर्वीच आरोग्य विभागास याबाबत माहिती देण्यात आली आहे. मात्र, अद्याप औषधे उपलब्ध झालेली नाहीत. त्यातच आज औषधांची एक्सपायरी डेट असल्याने त्याचे वाटपही बंद करण्यात आले आहे.
- डॉ. एस.टी परदेशी 
(प्रभारी आरोग्य प्रमुख) 
 
टँमी फ्लूची औषधे संपली
शहरात स्वाईन फ्लूने पुन्हा डोकेवर काढले असतानाच शहरात महापालिका, तसेच शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या टॅमीफ्लूच्या औषधांची एक्सपायरी डेट संपली असल्याने या औषधांचा तुडवडा निर्माण होणार आहे. या आजाराशी संबंधित हे औषधे महापालिकेस राज्य शासनाकडून पुरविले जाते. त्यानंतर शहरातील रूग्णालयांच्या मागणीनुसार महापालिका त्यांना या औषधांचा पुरवठा करते.  शहरात मोठय़ा प्रमाणात स्वाईन फ्लूचे रूग्ण आढळून येत असल्याने, तसेच राज्यभरातील इतर जिल्हय़ातील रूग्णही उपचारासाठी पुण्यात येतात. त्यामुळे महापालिकेकडे मोठय़ा प्रमाणात या औषधांचा साठा असणो अपेक्षित आहेत. ही औषधे शासन महापालिकेस मागणीनुसार पाठविते. शासनाने मागील वेळी महापालिकेस पाठविलेल्या औषधांची एक्सपायरी डेट 30 ऑगस्ट होती. त्यामुळे कालपासून ही औषधे रूग्णांना देणो महापालिकेने बंद केलेले आहे. त्यामुळे या आजाराच्या संशयित रूग्णांच्या जिवावर बेतण्याची वेळ आली आहे. आज शहरात असाच एक प्रकार घडला. या आजाराची लागण झालेल्या एका रूग्णाचे नातेवाईक आरोग्य विभागासह महापालिकेच्या सर्व दवाख्यान्यांमध्ये फिरत होते. मात्र, त्यांना औषध मिळू शकले नाही. त्यामुळे या रूग्णास काय झाल्यास जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित होतोय.
 
शासकीय अनास्था रूग्णांच्या जिवावर
स्वाईन फ्लूच्या औषधांची ‘एक्सपायरी डेट’ जवळ येत असल्याने दोन महिन्यांपूर्वीच ही औषधे बदलून देण्यासाठी, तसेच नवीन औषधे उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेकडून राज्य शासनाच्या आरोग्य विभागास पत्र पाठविण्यात आल्याचा दावा महापालिकेचे प्रभारी आरोग्य प्रमुख डॉ. एस.टी. परदेशी यांनी सांगितले.  या औषधाची मुदत संपत असल्याने त्याचे वाटप बंद केले असल्याचेही ते म्हणाले. मात्र, मागील दोन महिन्यांपासून पालिकेने केवळ पत्र पाठविले. त्याचा पाठपुरावा करून औषधे का उपलब्ध करून घेतली नाहीत, असा सवालही उपस्थित होत आहे. तसेच, या आजाराचे गांभीर्य तीन वर्षापूर्वीच लक्षात आले असतानाही राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडून त्याकडे दुलक्र्ष होत असल्याने शासकीय अनास्थाच रूग्णांच्या जिवावर बेतली आहे.