शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

आता वह्या खरेदी घोटाळा!

By admin | Updated: June 27, 2015 02:43 IST

राज्यातील आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांसाठी आदिवासी विकास विभागाने केलेल्या १९ कोटी रुपयांच्या वह्या खरेदीत अनियमितता आढळून आली असून,

यदु जोशी, मुंबईराज्यातील आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांसाठी आदिवासी विकास विभागाने केलेल्या १९ कोटी रुपयांच्या वह्या खरेदीत अनियमितता आढळून आली असून, ई-टेंडर पद्धतीने केलेल्या या खरेदीवर स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हरकत घेतली आहे. राज्य सरकारमधील मंत्र्यांचे एकाहून एक प्रताप समोर येत असल्याने फडणवीस यांच्यापुढे वेगळेच आव्हान उभे ठाकले आहे.याबाबत ‘लोकमत’च्या हाती आलेली माहिती अशी - आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांसाठी आदिवासी विकास विभागाने १९ कोटी रुपयांच्या वह्या खरेदीसाठी गेल्या फेब्रुवारीमध्ये ई-निविदा मागविण्यात आल्या होत्या. १० कंत्राटदारांनी निविदा भरल्या; पण एका विशिष्ट कंत्राटदारालाच कंत्राट मिळावे यासाठी अटी व शर्ती बदलण्यात आल्या. याबाबत काही कंत्राटदारांनी थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे तक्रार केली. संपूर्ण प्रकरण समजून घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या खरेदी प्रक्रियेबाबत आश्चर्य व्यक्त करीत मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांना चौकशीचे आदेश दिले. गंमत म्हणजे चौकशी अहवालात आक्षेपाच्या १४ मुद्द्यांपैकी केवळ तीनच मुद्द्यांवर स्पष्टीकरण देण्यात आले. तूर्त ही खरेदी थांबवण्यात आली आहे. २०० पेजेसची वही बाजारात जास्तीतजास्त १८ ते २० रुपयांना बाजारात मिळत असताना ३१ रुपये दराने कंत्राट देण्याचे घाटत आहे, अशी तक्रार मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली होती. याच वहीचा पुरवठा २० रुपये दराने करण्याची तयारी अन्य काही कंत्राटदारांनी दाखविली होती....अन् न्यूनतम दराचा आदेश निघालान्यूनतम दर नमूद करणाऱ्या कंत्राटदारालाच कंत्राट देण्याची आजवरची पद्धत बंद करण्यामागे आदिवासी विकास विभागातील हीच खरेदी कारणीभूत ठरल्याचे म्हटले जाते. वस्तूंची अव्वाच्यासव्वा किंमत लावून खरेदी केली जाते. त्याला चाप लावणारा निर्णय मुख्यमंत्र्यांनी काल घेतला.