शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

१५ वर्षांतील खरेदीची चौकशी

By admin | Updated: July 31, 2015 02:57 IST

महिला व बालकल्याण विभागाने गेल्या १५ वर्षांत केलेल्या सर्व खरेदीची मुख्य सचिवांच्या समितीमार्फत चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधान परिषदेत केली.

मुंबई : महिला व बालकल्याण विभागाने गेल्या १५ वर्षांत केलेल्या सर्व खरेदीची मुख्य सचिवांच्या समितीमार्फत चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधान परिषदेत केली. चिक्की खरेदीतील कथित घोटाळ्यावरून विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पुराव्यांची जंत्री सादर करत जोरदार हल्लाबोल केला. त्यावर मंत्री पंकजा मुंडे यांनी सर्व आरोप फेटाळून लावत आरोप सिद्ध झाले तर राजकारण सोडेन, असे आव्हान दिल्याने मुंडे विरुद्ध मुंडे असा अभूतपूर्व सामना पाहायला मिळाला. महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे, शिक्षणमंत्री विनोद तावडे, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत तसेच महसूलमंत्री एकनाथ खडसे या मंत्र्यांच्या खात्याकडून झालेल्या खरेदीमधील भ्रष्टाचार व अनियमितता याबाबतची चर्चा विरोधी पक्षाने नियम २६० अन्वये उपस्थित केली होती. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. लहान मुलांच्या खाण्यापिण्याच्या वस्तूत भ्रष्टाचार करणे ही आपली संस्कृती नाही. त्यामुळे या प्रकरणाची विद्यमान न्यायमूर्तींमार्फत चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी करून अशा भ्रष्ट सरकारमध्ये शिवसेनेने क्षणभरही राहू नये, असा सल्ला त्यांनी दिला. (विशेष प्रतिनिधी)गरिबाच्या तोंडचा घास खाणार नाहीमाझ्याकडून एक रुपयाचा भ्रष्टाचार झाला असेल तर मी स्वत:हून राजकारणातून बाहेर जाईन. पण मी राजकारणातून बाहेर जाण्यासाठी कुणी जाणीवपूर्वक प्रयत्न करीत असेल तर तो मी यशस्वी होऊ देणार नाही, अशा शब्दांत मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रतिआव्हान दिले.मी लहान असल्याने व महिला असल्याने मला लक्ष्य केले जात आहे. परंतु मी सक्षम असून अशा चुका करण्यास इथे आलेली नाही. दलित, गोरगरीब यांच्या तोंडचा घास खाणारी मी नाही. विरोधी पक्षनेत्यांनी संस्कृतीच्या केलेल्या उल्लेखाचा धागा पकडून पंकजा म्हणाल्या की, एक महिला सक्षमपणे काम करत असताना तिला घेरणे ही आपली संस्कृती नाही. माझे फोटो लावून प्लॅटफॉर्मवर चिक्की विकणे, अवमानित करणे हे अन्यायकारक आहे. या सर्वोच्च सभागृहात वैयक्तिक द्वेषाचे राजकारण पेरले जाणार नाही याची काळजी घेण्याची गरज आहे. राणे यांच्यावर आरोपनारायण राणे उद्योगमंत्री असताना चिक्की खरेदी ही सूर्यकांता इंडस्ट्रीजकडूनच करण्याचे आदेश त्यांनी काढले होते. खात्याच्या सचिवांनी त्याला आक्षेप घेतल्यावरही तो दुर्लक्षित करून राणे यांनी आपले आदेश कायम ठेवले, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. १८ आॅगस्ट २०१५ पर्यंत सूर्यकांताला मागील सरकारने मुदतवाढ दिल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.