शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

तातडीच्या वेळीच दरकरारावर खरेदी

By admin | Updated: December 23, 2014 23:52 IST

पैसे उभे करण्याचे अनेक मार्ग आहेत. विक्रीकराचे उत्पन्न वाढवले जाईल. जवळपास २५ हजार कोटींचे दावे पडून आहेत.

प्रश्न : सरकार धडाधड घोषणा करीत निघाले आहे. त्यासाठी करोडो रुपये लागतील. कोठून हा निधी उभा करणार?उत्तर : पैसे उभे करण्याचे अनेक मार्ग आहेत. विक्रीकराचे उत्पन्न वाढवले जाईल. जवळपास २५ हजार कोटींचे दावे पडून आहेत. त्यासाठी समाधानकारक तोडगा काढला जाईल. विकास दर ८.१ टक्के आहे तो आणखी २ टक्केनी वाढवण्याचा प्रयत्न करू. प्रशासन गतिमान, पारदर्शक करणे, प्राधान्यक्रम ठरवणे, उद्योगांना राज्यात गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन देणे या गोष्टीतून राज्यात पैसा नक्की उभा राहील.प्रश्न : येणाऱ्या अर्थसंकल्पात काही नवे कर असतील?उत्तर : राज्यातला रेड टेपीझम बंद केला जाईल. मेक इन इंडियाच्या धर्तीवर महाराष्ट्राची उभारणी केली जाईल. येणाऱ्या अर्थसंकल्पात विकास दर वाढविण्याच्या दृष्टीने आपण जिल्हानिहाय दौरे करणार आहोत. एनजीओ, संस्था, तज्ज्ञ लोकांशी चर्चा करून बजेट तयार केले जाईल.प्रश्न : तुम्ही महागाई नियंत्रणात आणण्याची गोष्ट सांगता, दुसरीकडे आडत्यांना परवानगी देता, अशाने महागाई कशी कमी होईल?उत्तर : राज्यात ५६ हजार जीआर आहेत. काही अधिकारी सरकारचे मत विचारात न घेता स्वत:च निर्णय घेऊ लागतात त्यातून अशा गोष्टी घडतात. मात्र यावर योग्य तो तोडगा महिनाभरात निघेल. त्या दृष्टीने आमचे सहकारमंत्री काम करीत आहेत.प्रश्न : तुम्ही विदर्भासाठी एवढ्या घोषणा करीत आहात. यामुळे बाकी विभागांना असुरक्षेची भावना निर्माण होत आहे त्याचे काय?उत्तर : विदर्भाची संस्कृती अशी नाही. हा भाग इतरांवरही प्रेम करणारा आहे. स्वत:चा विकास करताना तो दुसऱ्यांचाही विकास करण्याची मानसिकता ठेवतो. आधी काय झाले हे मला सांगायचे नाही मात्र मी असेन किंवा मुख्यमंत्री असतील, आम्ही विधानसभेत संपूर्ण महाराष्ट्राचे प्रश्न मांडले आहेत. विदर्भाचा विकास करताना दुसऱ्यांवर अन्याय होणार नाही. मागास भागासाठी आर्थिक तरतूद करणे म्हणजे दुसऱ्यांवर अन्याय करणे होत नाही ही स्व.यशवंतराव चव्हाण यांचीच शिकवण आमच्यापुढे आहे.प्रश्न : सरकार काही योजनांना कात्री लावणार असे बोलले जात आहे. हे खरे आहे?उत्तर : राज्यात १२५० योजना चालू आहेत. त्यांचे मूल्यमापन करा, योजना सुरू ठेवायच्या असतील तर त्या तर्काच्या आधारे पटवून द्या, त्याची शास्त्रीय कारणे द्या असे वित्त व नियोजन विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे. या कसोटीवर ज्या योजना येणार नाहीत त्या रद्द केल्या जातील.प्रश्न : आदिवासी आणि सामाजिक न्याय विभागात अनेक योजना ठेकेदारांसाठीच चालू आहेत त्याचे काय?उत्तर : राज्याच्या एकूण बजेटच्या ९.४ टक्के आदिवासी विभागासाठी आणि ११.६ टक्के सामाजिक न्याय विभागासाठीचे बजेट आहे. त्या त्या समाजासाठी हा निधी खर्च झाला आहे का? एवढा खर्च करूनही विकास का झाला नाही? या प्रश्नांची उत्तरे शोधू लागलो की सगळ्या गोष्टी समोर येतील. ठेकेदारांना जगवणाऱ्या योजना वित्तविभाग हाणून पाडेल. ज्या दिवशी गुजरातचे मंत्री महाराष्ट्राचा कारभार पाहण्यासाठी महाराष्ट्रात येतील त्या दिवशी आम्ही परीक्षेत पास होऊ.