शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

धक्कादायक! ७५ हजार बोगस बालके दाखवून कोट्यवधी लाटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 02:44 IST

राज्यभरातील बालगृहांमधील प्रकार

मुंबई : राज्य सरकारने अनाथ बालकांच्या संगोपन, शिक्षणासाठी स्थापन केलेल्या बालगृहांसाठी तरतूद केलेल्या कोट्यवधी रुपयांचे गैरव्यवहार झाल्याचा ठपका विधिमंडळाच्या लोकलेखा समितीने ठेवला आहे. समितीचे अध्यक्ष गोपाल अग्रवाल यांनी या बाबतचा अहवाल बुधवारी विधानसभेत सादर केला.२०१० ते २०१५ या काळात अधिकाऱ्यांच्या संगनमताने हे घोटाळे झाले आणि ते करताना तब्बल ७५ हजार बालके ही बोगस होती असा निष्कर्ष काढत लोकलेखा समितीने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी एसआयटीमार्फत करण्याची शिफारस केली आहे. २०१०-२०१५ या कालावधीत विभागाने मागितलेल्या निधीपैकी ७६ टक्के म्हणजे ८७१.६ कोटी रुपये मंजूर केले आणि ५९५.६६ कोटी रुपयांची तरतूद केली. या कालावधीत ११५३ बालगृहांमध्ये ९५ हजार बालके सदर योजनेचा लाभ घेत असल्याचे आढळले. २०१६ मध्ये या प्रकरणाची तपासणी केली असता ज्या बालकांना स्वत:चे घर आहे अशा बालकांनाही प्रवेश देण्यात आला होता. या बालकांना घरी पाठवण्यात आले. तसेच वास्तवात ९५ हजार बालकांपैकी फक्त २१ हजार बालकेच असल्याचे दिसून आले. याचा अर्थ जवळजवळ ७५ हजार पेक्षा जास्त बोगस व अपात्र बालकांची नोंद झाल्याचे आढळून आले. यावरून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी अनाठायी खर्च करण्यात आला, असा ठपकाही लोकलेखा समितीने ठेवला आहे.स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी कराहे घोटाळे अजाणतेपणाने निश्चितच झाले नाहीत. त्यात अधिकारी, संस्थाचालकांचे संगनमत होते. या प्रकरणाची तीन महिन्यांत प्राथमिकचौकशी करून अहवाल समितीला द्यावा, तसेच अहवालातील निष्कर्षाच्या आधारे एसआयटीसारख्या स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करावी, असे समितीने म्हटले आहे.