शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक...४५ टक्के सांगलीकर मानसिक समस्याग्रस्त!

By admin | Updated: October 9, 2014 23:48 IST

शहरातील स्थिती : आर्थिक ओढाताण, नैराश्य, कौटुंबिक वादविवाद, काळजीत वाढ झाल्याचे परिणाम

नरेंद्र रानडे- सांगली -शारीरिक आरोग्यापेक्षा मानसिक आरोग्याकडे आपण तितकेसे गांभीर्याने लक्ष देत नाही. परिणामी कित्येकजण मानसिक आजाराबाबत अनभिज्ञ असतात. सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे ही समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. मानसिक आजारांबाबत विज्ञान युगातही बहुतेकांचा कल वैद्यकीय सल्ला न घेता इतर अनावश्यक उपचार करण्याकडे असतो. सध्या महापालिका क्षेत्रात सुमारे ४५ टक्के नागरिक हे मानसिक समस्यांनी त्रस्त असल्याचा निष्कर्ष शहरातील ‘आकार फाऊंडेशन’ या सामाजिक संघटनेने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आला आहे. जागतिकीकरणाच्या जीवघेण्या स्पर्धेत आपले स्थान टिकवायचे असेल, तर प्रत्येकाला तणावातून जावेच लागते. हा तणाव कमी करण्यासाठी कितीजण खंबीरपणे प्रयत्न करतात, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. परंतु बहुतांशीजण त्याचा सामना करण्याऐवजी त्यापासून दूर पळणेच श्रेयस्कर मानतात. हा देखील एक प्रकारचा मानसिक रोगच आहे. आजकाल अनेकांचा वेळ एकमेकांशी संवाद साधण्यापेक्षा सोशल मीडियावर सर्फिंग करण्यातच जातो. त्यामुळे चिडचिडेपणा वाढतो. परिणामी त्याचा परिणाम आपल्या दैनंदिन वागण्यावर होतो. साहजिकच ताण-तणावात वाढ होते. पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंबपध्दती असताना घरात सुसंवाद असायचा. कुटुंबासाठी लागणाऱ्या गरजा एकमेकांच्या सहकार्यातून भागवल्या जायच्या. पण सध्या विभक्त कुटुंब पध्दतीमुळे व वाढत्या महागाईमुळे कुटुंबात होणाऱ्या विसंवादाच्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. यासह अनेक कारणांमुळे माणसांचे मानसिक आरोग्य निरोगी रहात नसल्याचे दिसत आहे. ही परिस्थिती बदलण्याची सुरुवात आपल्यापासूनच केली पाहिजे. समाज काय म्हणेल याकडे दुर्लक्ष करुन आपले मानसिक आरोग्य सुदृढ राहण्यासाठी प्रसंगी मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेतली पाहिजे. लक्षणेचिडचिडेपणा करणे.नैराश्य टाळण्यासाठी मादक द्रव्यांचे सेवन.आपले म्हणणे दुसऱ्यावर लादण्याचा प्रयत्न करणेसतत नकारात्मक विचार करणे.मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी सामाजिक संस्था आणि प्रशासन यांनी संयुक्तरित्या प्रयत्न करणे आवश्यक आहे. संकटांशी सामना कसा करावा याचे प्रशिक्षण नागरिकांना दिले पाहिजे. तर आत्महत्या, घटस्फोट आदी प्रमाणात निश्चित घट होईल.- डॉ. प्रदीप पाटील, मानसोपचारतज्ज्ञमानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी योगा आणि प्राणायाम यांचा सकारात्मक परिणाम होतो. योगाद्वारे मानसिक आणि शारीरिक संतुलन राखणे सोयीचे जाते. साहजिकच मानसिक समस्यांपासून दूर राहण्यासाठी नियमित योगाभ्यास आवश्यक आहे.-श्याम वैद्य, पतंजली योग समिती, सांगली..मानसिक आरोग्य म्हणजे नेमके काय?धकाधकीच्या जीवनात आपल्या मनाची स्थिती स्थिर आणि शांत असणे आवश्यक आहे. समस्या प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतात. त्यामुळे कोणतीही समस्या उद्भवली, तर ताण न घेता त्याच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न केला पाहिजे. सर्व परिस्थितीत मन सुदृढ राखणे म्हणजे मानसिक आरोग्य चांगले ठेवणे होय. उपायविनाकारण कोणत्याही बाबीचा ताण घेऊ नये.वादविवाद करण्यापेक्षा सुसंवाद राखण्यास महत्त्व द्यावे.मानसिक व शारीरिक कष्टाची तयारी ठेवावी.वेळप्रसंगी मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.