शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

धक्कादायक! ५ वर्षांत २११ आत्महत्या

By admin | Updated: December 2, 2014 00:38 IST

उपराजधानीच्या ऐतिहासिक वैभवाचे प्रतीक असलेल्या शुक्रवार तलावाची ओळख आता ‘सुसाईड पॉर्इंट’ अशी बनली आहे. सुमारे पाच वर्षांमध्ये या तलावात चक्क २११ व्यक्तींनी आत्महत्या केल्या आहेत.

शुक्रवार तलाव ठरतोय ‘सुसाईड पॉर्इंट’ : टेहळणी वाढविण्याची आवश्यकतानागपूर : उपराजधानीच्या ऐतिहासिक वैभवाचे प्रतीक असलेल्या शुक्रवार तलावाची ओळख आता ‘सुसाईड पॉर्इंट’ अशी बनली आहे. सुमारे पाच वर्षांमध्ये या तलावात चक्क २११ व्यक्तींनी आत्महत्या केल्या आहेत. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी यासंदर्भात पोलीस विभागाकडे विचारणा केली होती. शुक्रवार तलावात गेल्या पाच वर्षांत किती नागरिकांनी आत्महत्या केल्या, त्यात किती महिला व पुरुषांचा समावेश होता, अशा आशयाची विचारणा करण्यात आली होती. यावर पोलीस विभागाकडून देण्यात आलेल्या उत्तरानुसार २०१० सालापासून २११ नागरिकांनी या तलावात आत्महत्या केल्या आहेत. यात १९२ पुरुष तर १८ महिलांचा समावेश आहे तर १५ वर्षांखालील एका बालकानेदेखील २०१२ साली आत्महत्या केली होती.सर्वात जास्त ५२ आत्महत्यांची नोंद २०१२ साली करण्यात आली होती. तर २०१४ मध्ये ३० आॅगस्ट २०१४ पर्यंत २५ नागरिकांनी शुक्रवार तलावात उडी घेऊन जीव दिला आहे. दरम्यान, तलावात जीव देण्याच्या उद्देशाने उडी घेतलेल्या किती जणांना वाचविण्यात यश आले याची नोंद उपलब्ध नसल्याचे पोलीस विभागाने स्पष्ट केले. शुक्रवार तलावाजवळ टेहळणी वाढविण्यात यावी व कायमस्वरूपी पोलिसांची येथे तैनाती व्हावी, अशी मागणी आहे. (प्रतिनिधी)अश्लील चाळे रोखण्यासाठी कारवाई हवीदरम्यान, नागपुरातील अंबाझरी व फुटाळा उद्यानात जोडप्यांकडून मोठ्या प्रमाणात अश्लील चाळे करण्यात येतात, अशी तक्रार नागरिकांकडून वारंवार करण्यात येते. परंतु माहितीच्या अधिकारातून समोर आलेल्या माहितीनुसार गेल्या पाच वर्षांत अंबाझरी उद्यानात ५९ तर फुटाळा उद्यानात ५७ जण सापडल्याची बाब समोर आली. येथे होणाऱ्या अयोग्य बाबी रोखण्यासाठी कारवाईचा वेग वाढविण्याची आवश्यकता असल्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.