शुक्रवार तलाव ठरतोय ‘सुसाईड पॉर्इंट’ : टेहळणी वाढविण्याची आवश्यकतानागपूर : उपराजधानीच्या ऐतिहासिक वैभवाचे प्रतीक असलेल्या शुक्रवार तलावाची ओळख आता ‘सुसाईड पॉर्इंट’ अशी बनली आहे. सुमारे पाच वर्षांमध्ये या तलावात चक्क २११ व्यक्तींनी आत्महत्या केल्या आहेत. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी यासंदर्भात पोलीस विभागाकडे विचारणा केली होती. शुक्रवार तलावात गेल्या पाच वर्षांत किती नागरिकांनी आत्महत्या केल्या, त्यात किती महिला व पुरुषांचा समावेश होता, अशा आशयाची विचारणा करण्यात आली होती. यावर पोलीस विभागाकडून देण्यात आलेल्या उत्तरानुसार २०१० सालापासून २११ नागरिकांनी या तलावात आत्महत्या केल्या आहेत. यात १९२ पुरुष तर १८ महिलांचा समावेश आहे तर १५ वर्षांखालील एका बालकानेदेखील २०१२ साली आत्महत्या केली होती.सर्वात जास्त ५२ आत्महत्यांची नोंद २०१२ साली करण्यात आली होती. तर २०१४ मध्ये ३० आॅगस्ट २०१४ पर्यंत २५ नागरिकांनी शुक्रवार तलावात उडी घेऊन जीव दिला आहे. दरम्यान, तलावात जीव देण्याच्या उद्देशाने उडी घेतलेल्या किती जणांना वाचविण्यात यश आले याची नोंद उपलब्ध नसल्याचे पोलीस विभागाने स्पष्ट केले. शुक्रवार तलावाजवळ टेहळणी वाढविण्यात यावी व कायमस्वरूपी पोलिसांची येथे तैनाती व्हावी, अशी मागणी आहे. (प्रतिनिधी)अश्लील चाळे रोखण्यासाठी कारवाई हवीदरम्यान, नागपुरातील अंबाझरी व फुटाळा उद्यानात जोडप्यांकडून मोठ्या प्रमाणात अश्लील चाळे करण्यात येतात, अशी तक्रार नागरिकांकडून वारंवार करण्यात येते. परंतु माहितीच्या अधिकारातून समोर आलेल्या माहितीनुसार गेल्या पाच वर्षांत अंबाझरी उद्यानात ५९ तर फुटाळा उद्यानात ५७ जण सापडल्याची बाब समोर आली. येथे होणाऱ्या अयोग्य बाबी रोखण्यासाठी कारवाईचा वेग वाढविण्याची आवश्यकता असल्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.
धक्कादायक! ५ वर्षांत २११ आत्महत्या
By admin | Updated: December 2, 2014 00:38 IST