शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

धक्कादायक! ५ वर्षांत २११ आत्महत्या

By admin | Updated: December 2, 2014 00:38 IST

उपराजधानीच्या ऐतिहासिक वैभवाचे प्रतीक असलेल्या शुक्रवार तलावाची ओळख आता ‘सुसाईड पॉर्इंट’ अशी बनली आहे. सुमारे पाच वर्षांमध्ये या तलावात चक्क २११ व्यक्तींनी आत्महत्या केल्या आहेत.

शुक्रवार तलाव ठरतोय ‘सुसाईड पॉर्इंट’ : टेहळणी वाढविण्याची आवश्यकतानागपूर : उपराजधानीच्या ऐतिहासिक वैभवाचे प्रतीक असलेल्या शुक्रवार तलावाची ओळख आता ‘सुसाईड पॉर्इंट’ अशी बनली आहे. सुमारे पाच वर्षांमध्ये या तलावात चक्क २११ व्यक्तींनी आत्महत्या केल्या आहेत. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी यासंदर्भात पोलीस विभागाकडे विचारणा केली होती. शुक्रवार तलावात गेल्या पाच वर्षांत किती नागरिकांनी आत्महत्या केल्या, त्यात किती महिला व पुरुषांचा समावेश होता, अशा आशयाची विचारणा करण्यात आली होती. यावर पोलीस विभागाकडून देण्यात आलेल्या उत्तरानुसार २०१० सालापासून २११ नागरिकांनी या तलावात आत्महत्या केल्या आहेत. यात १९२ पुरुष तर १८ महिलांचा समावेश आहे तर १५ वर्षांखालील एका बालकानेदेखील २०१२ साली आत्महत्या केली होती.सर्वात जास्त ५२ आत्महत्यांची नोंद २०१२ साली करण्यात आली होती. तर २०१४ मध्ये ३० आॅगस्ट २०१४ पर्यंत २५ नागरिकांनी शुक्रवार तलावात उडी घेऊन जीव दिला आहे. दरम्यान, तलावात जीव देण्याच्या उद्देशाने उडी घेतलेल्या किती जणांना वाचविण्यात यश आले याची नोंद उपलब्ध नसल्याचे पोलीस विभागाने स्पष्ट केले. शुक्रवार तलावाजवळ टेहळणी वाढविण्यात यावी व कायमस्वरूपी पोलिसांची येथे तैनाती व्हावी, अशी मागणी आहे. (प्रतिनिधी)अश्लील चाळे रोखण्यासाठी कारवाई हवीदरम्यान, नागपुरातील अंबाझरी व फुटाळा उद्यानात जोडप्यांकडून मोठ्या प्रमाणात अश्लील चाळे करण्यात येतात, अशी तक्रार नागरिकांकडून वारंवार करण्यात येते. परंतु माहितीच्या अधिकारातून समोर आलेल्या माहितीनुसार गेल्या पाच वर्षांत अंबाझरी उद्यानात ५९ तर फुटाळा उद्यानात ५७ जण सापडल्याची बाब समोर आली. येथे होणाऱ्या अयोग्य बाबी रोखण्यासाठी कारवाईचा वेग वाढविण्याची आवश्यकता असल्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.