ऑनलाइन लोकमत - (फोटो - सुशील कदम)
मुंबई, दि. 17 - राज्यात भीषण दुष्काळ पडला असताना शेजारी धरण असूनदेखील पाणीटंचाईचा सामना करावा लागणा-या शहापुरवासियांनी शहापूर ते मंत्रालय जलदिंडी पदयात्रा काढली. शहापूरवासियांनी जलदिंडी पदयात्रा काढत मुंबई महापालिकेवर धडक मोर्चा नेला. शहापूरमधील धरणांमधून मुंबईला पाणीपुरवठा होतो मात्र तिथेच राहणा-यांच्या घशाला कोरड पडलेली आहे. पाण्यासाठी त्यांना मैलोनमैल फिराव लागतं आहे.
राणीबागहून दुपारी 12 वाजता निघालेली पदयात्रा 2 वाजता आझाद मैदानात पोहोचली. मोर्चामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली होती. जे जे उड्डाणपुलावरून मोर्चा नेण्यात आला होता त्यामुळे भायखळ्याहून सीएसटीकडे येणारी वाहतूक मंदावली होती.