शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

जादा वीजबिलामुळे ‘शॉक’

By admin | Updated: August 3, 2016 01:14 IST

इलेक्ट्रिक मीटर फसवे आणि हलक्या दर्जाचे असल्यामुळे नागरिकांना अतिरिक्त बिले येऊ लागली आहेत.

दौंड : शहरात विद्युत महावितरण कंपनीने बसविलेले इलेक्ट्रिक मीटर फसवे आणि हलक्या दर्जाचे असल्यामुळे नागरिकांना अतिरिक्त बिले येऊ लागली आहेत. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहक मेटाकुटीस आला आहे. महावितरण कंपनीने फसवे मीटर तातडीने बदलावेत; अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष फिरोज खान, माजी अध्यक्ष सुनील शर्मा यांनी विद्युत वितरण कंपनीला दिला आहे. तीन महिन्यांपासून दौंड शहरातील नागरिकांना जास्त प्रमाणात बिले येऊ लागली आहेत. या संदर्भात विद्युत महावितरण कंपनीकडे तक्रार केली असता रीडिंगप्रमाणे बिले घेतली जातात, असे सांगितले जाते. मात्र, शहरात बसविलेल्या मीटरची रीडिंग क्षमता जास्त असल्याने ग्राहकांना बिले जास्त येऊ लागली आहेत. बऱ्याच ग्राहकांना नवीन मीटरदेखील दिले आहेत; मात्र ते बदलून देण्याचा खर्च ग्राहकांकडून वसूल केला जातो, हे धोरण चुकीचे आहे. तसेच, तांत्रिक बिघाड असल्याने मीटरमध्ये ग्राहकांना कधी जास्त, तर प्रमाणापेक्षा जास्त बिल येते. परिणामी विद्युत वितरण कार्यालयाकडे जास्त प्रमाणात तक्रारी येत आहेत, ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही. कार्यालयातील काही अधिकारी अरेरावीची भाषा करतात. एकंदरीतच, परिस्थिती पाहता ज्यादा बिल आकारणीमुळे नागरिक हैराण झाला आहे. त्यातच नियम धाब्यावर ठेवून ग्राहकाच्या असहायतेचा फायदा घेऊन विद्युत वितरण कंपनीने वसुली सुरू केली आहे, ती तातडीने थांबवावी. मीटर योग्य असल्याची खात्री करावी, दर्जेदार मीटर बसवावेत जेणेकरून ग्राहकांना वाजवीपेक्षा जास्त बिल येणार नाही तसेच शहरात ६ कोटी रुपये खर्च करून भूमिगत विद्युत्वाहिनी टाकण्यात आली आहे. मात्र, भूमिगत विद्युत्वाहिनीचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. तेव्हा या योजनेची चौकशी करावी, असे निवेदनात म्हटले आहे. <वारं आलं, तरी बत्ती गुल होतेसध्याच्या परिस्थितीत विजेचा लपंडाव शहरात सुरू आहे. साधी वाऱ्याची झुळूक आली किवा भुर्भुर् पाऊस आला, तरी वीजपुरवठा खंडित केला जातो. याचा उपद्रव नागरिकांना होतो. तरी, शहरातील वीजपुरवठा खंडित होणार नाही, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.