शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

शिवसेनेला नाही शेतक-यांशी घेणे-देणे!

By admin | Updated: January 22, 2017 02:50 IST

गुलाबराव गावंडे यांचे टीकास्त्र.

अकोला, दि. २१- शिवसेना शेतकर्‍यांच्याप्रती संवेदशिल नसून, शेतकर्‍यांच्या वेदनेचे शिवसेनेला काही घेणे-देणे नसल्याचे टीकास्त्र माजी मंत्री गुलाबराव गावंडे यांनी शनिवारी येथे सोडले.महानगरपालिका निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा प्रभारी बसवराज पाटील यांची पक्षाच्या जिल्हा कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपस्थित माजी मंत्री गुलाबराव गावंडे पत्रकारांशी बोलत होते. सावकारी कायद्यानंतर राज्यातील शेतकर्‍यांसाठी पाच कार्यक्रम आपण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे दिले होते; मात्र शेतकर्‍यांच्या दृष्टीने विषय काढला, त्याकडे दुर्लक्ष करीत दुसराच ते विषय काढायचे , असे सांगत शेतकर्‍यांचे शिवसेनेला काहीही घेणे-देणे नाही, असा आरोपही गुलाबराव गावंडे यांनी केला. राज्यातील शेतकर्‍यांची खर्‍या अर्थाने तळमळ असलेला राष्ट्रवादी काँग्रेस हा एकमेव पक्ष असल्याचेही गावंडे यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा प्रभारी बसवराज पाटील, माजी आमदार प्रा. तुकाराम बिडकर, पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजय देशमुख, ऋषिकेश पोहरे, महानगराध्यक्ष अजय तापडिया यांच्यासह पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.स्वगृही चाललो बरं..!शिवसेना सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाची भूमिका गुलाबराव गावंडे यांनी विशद केली. शिवसेनेपूर्वी मी एस काँग्रेसचा पदाधिकारी होतो, तेव्हा शरद पवार यांच्याशी संबंध आला. त्यामुळे मी स्वगृही चाललो बरं.. असे सांगत गुलाबराव गावंडे यांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाची भूमिका स्पष्ट केली.