शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

मुख्यमंत्र्यांच्या खेळीने शिवसेना गोंधळलेली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2016 03:56 IST

ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रोला मंजुरी देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डोंबिवली, उल्हासनगर आणि कळवा, मुंब्रा आणि दिव्याला या सेवेतून वगळले.

डोंबिवली : ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रोला मंजुरी देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डोंबिवली, उल्हासनगर आणि कळवा, मुंब्रा आणि दिव्याला या सेवेतून वगळले. त्यामुळे शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी फडणवीस यांना साकडे घातले. प्रत्यक्षात खरेच त्यांनी डोंबिवलीत मेट्रोला हिरवा कंदील दिला आहे का, याबाबत त्यांच्याकडून कोणतीच माहिती समोर आलेली नाही. मुख्यमंत्र्यांच्या या खेळीमुळे शिवसेनेची अवस्था गोंधळल्यासारखी झाल्याची टीका मनसेचे प्रदेश सरचिटणीस राजू पाटील यांनी केली. मनसेने डोंबिवली मेट्रोची मागणी केल्यावर डॉ. शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर तातडीने ठाण्यात पत्रकार परिषद घेत त्याबद्दलची माहिती दिली. मात्र, काही मुद्दे सांगायचे राहून गेल्याचे सांगत त्यांनी पुन्हा कल्याणला पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी ठाणे पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेट्रोला मुंब्रा, कळवा-दिवा जोडण्याचा प्रयत्न केला. त्याचे सादरीकरण एमएमआरडीएकडे केले. या प्रकाराला गोंधळ नाहीतर अजून काय म्हणावे, असा सवाल पाटील यांनी केला. त्यांनी दिलेल्या कल्याण-शीळ उन्नत मार्गाच्या आश्वासनाचे काय, मध्यंतरी कल्याण-शीळ रोडवर अंडरपासची संकल्पना आणली, त्याचे काय? उद्या अजून कोणी सेनेतून पुढे येऊन नवीन मेट्रो मार्गाची मागणी करेल, सर्वांना प्रत्येकाच्या दारातून मेट्रो गेली पाहिजे असेही वाटेल. परस्पर विरोधी प्रतिक्रिया द्यायला सांगून मनसेने केलेल्या डोंबिवली मेट्रो मागणीबाबत लोकांमध्ये गोंधळ तयार करण्यासाठी ठाण्याहून बोलते केलेले हे पोपट आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.