शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
6
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
7
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
8
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
9
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
10
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
11
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
12
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
13
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
14
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
15
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
16
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
17
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
18
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
19
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 

मुख्यमंत्र्यांच्या खेळीने शिवसेना गोंधळलेली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2016 03:56 IST

ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रोला मंजुरी देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डोंबिवली, उल्हासनगर आणि कळवा, मुंब्रा आणि दिव्याला या सेवेतून वगळले.

डोंबिवली : ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रोला मंजुरी देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डोंबिवली, उल्हासनगर आणि कळवा, मुंब्रा आणि दिव्याला या सेवेतून वगळले. त्यामुळे शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी फडणवीस यांना साकडे घातले. प्रत्यक्षात खरेच त्यांनी डोंबिवलीत मेट्रोला हिरवा कंदील दिला आहे का, याबाबत त्यांच्याकडून कोणतीच माहिती समोर आलेली नाही. मुख्यमंत्र्यांच्या या खेळीमुळे शिवसेनेची अवस्था गोंधळल्यासारखी झाल्याची टीका मनसेचे प्रदेश सरचिटणीस राजू पाटील यांनी केली. मनसेने डोंबिवली मेट्रोची मागणी केल्यावर डॉ. शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर तातडीने ठाण्यात पत्रकार परिषद घेत त्याबद्दलची माहिती दिली. मात्र, काही मुद्दे सांगायचे राहून गेल्याचे सांगत त्यांनी पुन्हा कल्याणला पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी ठाणे पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेट्रोला मुंब्रा, कळवा-दिवा जोडण्याचा प्रयत्न केला. त्याचे सादरीकरण एमएमआरडीएकडे केले. या प्रकाराला गोंधळ नाहीतर अजून काय म्हणावे, असा सवाल पाटील यांनी केला. त्यांनी दिलेल्या कल्याण-शीळ उन्नत मार्गाच्या आश्वासनाचे काय, मध्यंतरी कल्याण-शीळ रोडवर अंडरपासची संकल्पना आणली, त्याचे काय? उद्या अजून कोणी सेनेतून पुढे येऊन नवीन मेट्रो मार्गाची मागणी करेल, सर्वांना प्रत्येकाच्या दारातून मेट्रो गेली पाहिजे असेही वाटेल. परस्पर विरोधी प्रतिक्रिया द्यायला सांगून मनसेने केलेल्या डोंबिवली मेट्रो मागणीबाबत लोकांमध्ये गोंधळ तयार करण्यासाठी ठाण्याहून बोलते केलेले हे पोपट आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.