शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
3
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
4
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
5
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
6
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
7
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
8
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
11
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
12
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
13
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
14
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
19
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
20
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या

मुख्यमंत्र्यांच्या खेळीने शिवसेना गोंधळलेली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2016 03:56 IST

ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रोला मंजुरी देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डोंबिवली, उल्हासनगर आणि कळवा, मुंब्रा आणि दिव्याला या सेवेतून वगळले.

डोंबिवली : ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रोला मंजुरी देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डोंबिवली, उल्हासनगर आणि कळवा, मुंब्रा आणि दिव्याला या सेवेतून वगळले. त्यामुळे शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी फडणवीस यांना साकडे घातले. प्रत्यक्षात खरेच त्यांनी डोंबिवलीत मेट्रोला हिरवा कंदील दिला आहे का, याबाबत त्यांच्याकडून कोणतीच माहिती समोर आलेली नाही. मुख्यमंत्र्यांच्या या खेळीमुळे शिवसेनेची अवस्था गोंधळल्यासारखी झाल्याची टीका मनसेचे प्रदेश सरचिटणीस राजू पाटील यांनी केली. मनसेने डोंबिवली मेट्रोची मागणी केल्यावर डॉ. शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर तातडीने ठाण्यात पत्रकार परिषद घेत त्याबद्दलची माहिती दिली. मात्र, काही मुद्दे सांगायचे राहून गेल्याचे सांगत त्यांनी पुन्हा कल्याणला पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी ठाणे पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेट्रोला मुंब्रा, कळवा-दिवा जोडण्याचा प्रयत्न केला. त्याचे सादरीकरण एमएमआरडीएकडे केले. या प्रकाराला गोंधळ नाहीतर अजून काय म्हणावे, असा सवाल पाटील यांनी केला. त्यांनी दिलेल्या कल्याण-शीळ उन्नत मार्गाच्या आश्वासनाचे काय, मध्यंतरी कल्याण-शीळ रोडवर अंडरपासची संकल्पना आणली, त्याचे काय? उद्या अजून कोणी सेनेतून पुढे येऊन नवीन मेट्रो मार्गाची मागणी करेल, सर्वांना प्रत्येकाच्या दारातून मेट्रो गेली पाहिजे असेही वाटेल. परस्पर विरोधी प्रतिक्रिया द्यायला सांगून मनसेने केलेल्या डोंबिवली मेट्रो मागणीबाबत लोकांमध्ये गोंधळ तयार करण्यासाठी ठाण्याहून बोलते केलेले हे पोपट आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.