शहरं
Join us  
Trending Stories
1
दर गुरुवारी काय काम करतो हाफिज सईद?; लश्करच्या माजी दहशतवाद्याचा मोठा खुलासा
2
India Pakistan Tension: पाकिस्तानने किती वाजता केला हायस्पीड मिसाईल हल्ला? लष्कराने सांगितलं ९-१० मेच्या रात्री काय घडलं?
3
India Pakistan: दहशतवाद्यांच्या अड्ड्यांमधून नुसता धूर; लष्कराने सीमेवरील लॉन्च पॅड्स केले उद्ध्वस्त; व्हिडीओही दाखवला
4
Fake News Alert : पाकिस्तानच्या सायबर हल्ल्यानंतर वीज पुरवठा होणार खंडित? सरकारने लोकांना सांगितलं 'सत्य'
5
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान दहशतवादी देश, त्यामुळे भारत आता थांबणार नाही - देवेंद्र फडणवीस
6
पाकिस्तानने खरंच भारताच्या स्क्वाड्रन लीडर शिवानी सिंह यांना पकडलं का? सरकारकडून महत्त्वाचा खुलासा
7
...तर पाकिस्तानला बसेल मोठा फटका, सोन्याचे भांडार हातातून जाईल; किती मोठी आहे इकॉनॉमी?
8
"यांचं भलतंच युद्ध सुरु आहे", अमिताभ बच्चन यांचे ट्वीट बघून भडकले नेटकरी, हा काय प्रकार?
9
Narasimha Jayanti 2025: नृसिंह जयंतीनिमित्त जाणून घ्या १५०० वर्ष जुन्या नृसिंह मंदिराबद्दल!
10
भारतीय सैन्यानं केली पाकची फजिती; पत्रकार परिषदेत फोटो दाखवत खोट्या दाव्याची पोलखोल
11
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमाची घोषणा, पोस्टर पाहून भडकले नेटकरी, म्हणाले- "लाज वाटत नाही?"
12
आकाश डिफेन्स सिस्टमनं काढली PAKISTAN ची हवा, दुसरीकडे हे बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्सही सुस्साट 
13
Narasimha Jayanti 2025: 'नृसिंह म्हणजे समाजातून सिंहासारखा उभा ठाकलेला वीर!'-प.पू.आठवले शास्त्री
14
भारताच्या हल्ल्यानंतर झालेलं नुकसान लपवण्यासाठी पाकिस्तानची धडपड, काय काय करतंय वाचाच 
15
कॅश, एटीएम, युपीआय... पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान सीतारामन यांचे बँकांना अलर्ट राहण्याचे निर्देश
16
Vikram Gaikwad Death: राष्ट्रीय पुरस्कार विजेते मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचं निधन
17
India vs Pakistan : जीडीपी, जॉब आणि डेव्हलपमेंटमध्ये पाकिस्तानची दूरपर्यंत भारताशी तुलना नाही; पाहा 'ही' आकडेवारी
18
India Pakistan Tension : पाकिस्तानच्या मिसाईलचे तुकडे हरियाणाच्या शेतात! सेनेने घेतले ताब्यात; दिल्लीवर होता निशाणा 
19
India Pakistan Tension : खेळ महत्त्वाचा; पण आधी देश! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा खास संदेश
20
भारताविरोधात पाकिस्तानचं ऑपरेशन 'बुनयान उल मरसूस'; काय आहे या शब्दाचा अर्थ?

शिवस्मारक प्रकल्पाचा राज्यावर आर्थिक भार नाही

By admin | Updated: June 10, 2017 03:13 IST

अरबी समुद्रातील प्रस्तावित शिवस्मारक उभारण्यामागे कोणताही राजकीय हेतू नसून केवळ शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेण्यासाठीच

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अरबी समुद्रातील प्रस्तावित शिवस्मारक उभारण्यामागे कोणताही राजकीय हेतू नसून केवळ शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेण्यासाठीच स्मारकाची निर्मिती करण्यात येत आहे. तसेच या प्रकल्पाचा आर्थिक भार राज्यावर पडणार नाही, असा दावा शुक्रवारी राज्य सरकारने उच्च न्यायालयात केला.प्रस्तावित शिवस्मारक प्रकल्पाला आव्हान देणाऱ्या अनेक याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांना उत्तर देताना राज्य सरकारने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले. या प्रकल्पामुळे राज्य सरकारच्या महसूल खर्चावर कोणताही परिणाम होणार नाही, हे स्पष्ट करतानाच, राज्य सरकारने कोणत्या गोष्टींवर खर्च करण्यास प्राधान्य द्यावे, हे उच्च न्यायालय ठरवू शकत नाही, असे राज्य सरकारने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.आरोग्य, दुष्काळ, शेतकरी आत्महत्या, शिक्षण, वीजतुटवडा, कर्ज इत्यादी समस्या राज्याला भेडसावत असताना सरकारने स्मारकासाठी ३,६०० कोटी खर्च करण्याचा निर्णय घेतला. याच पैशाचा वापर नागरिकांना पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी करावा, असे प्रा. मोहन भिडे यांनी याचिकेत म्हटले आहे.राज्यात विद्युत पुरवठा खंडित करण्यात येत असल्याचे याचिकाकर्त्याचे म्हणणे अगदी अयोग्य आहे. राज्यात पुरेशी वीज उपलब्ध असून, कुठेही वीजपुरवठा खंडित करण्यात येत नाही, असा दावाही सरकारने प्रतिज्ञापत्राद्वारे केला आहे.तसेच आत्महत्या केलेल्या ११,५२८ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई दिली आहे. तसेच ३८ लाख तरुणांनी कौशल्य विकास योजनेअंतर्गत एम्प्लॉयमेंट एक्स्चेंजमध्ये नोंदणी केल्याचे सरकारने नमूद केले आहे. याशिवाय शिक्षण हक्क कायद्यांतर्गत राज्यातील बहुसंख्य शाळांमध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत, असेही सरकारने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.