शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
3
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
4
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
5
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
6
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
7
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
8
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
9
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
10
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
11
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
12
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
13
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
14
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 
15
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
16
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
17
Ganesh Chaturthi 2025: वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
18
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
19
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
20
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा

शिवस्मारक प्रकल्पाचा राज्यावर आर्थिक भार नाही

By admin | Updated: June 10, 2017 03:13 IST

अरबी समुद्रातील प्रस्तावित शिवस्मारक उभारण्यामागे कोणताही राजकीय हेतू नसून केवळ शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेण्यासाठीच

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अरबी समुद्रातील प्रस्तावित शिवस्मारक उभारण्यामागे कोणताही राजकीय हेतू नसून केवळ शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेण्यासाठीच स्मारकाची निर्मिती करण्यात येत आहे. तसेच या प्रकल्पाचा आर्थिक भार राज्यावर पडणार नाही, असा दावा शुक्रवारी राज्य सरकारने उच्च न्यायालयात केला.प्रस्तावित शिवस्मारक प्रकल्पाला आव्हान देणाऱ्या अनेक याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांना उत्तर देताना राज्य सरकारने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले. या प्रकल्पामुळे राज्य सरकारच्या महसूल खर्चावर कोणताही परिणाम होणार नाही, हे स्पष्ट करतानाच, राज्य सरकारने कोणत्या गोष्टींवर खर्च करण्यास प्राधान्य द्यावे, हे उच्च न्यायालय ठरवू शकत नाही, असे राज्य सरकारने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.आरोग्य, दुष्काळ, शेतकरी आत्महत्या, शिक्षण, वीजतुटवडा, कर्ज इत्यादी समस्या राज्याला भेडसावत असताना सरकारने स्मारकासाठी ३,६०० कोटी खर्च करण्याचा निर्णय घेतला. याच पैशाचा वापर नागरिकांना पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी करावा, असे प्रा. मोहन भिडे यांनी याचिकेत म्हटले आहे.राज्यात विद्युत पुरवठा खंडित करण्यात येत असल्याचे याचिकाकर्त्याचे म्हणणे अगदी अयोग्य आहे. राज्यात पुरेशी वीज उपलब्ध असून, कुठेही वीजपुरवठा खंडित करण्यात येत नाही, असा दावाही सरकारने प्रतिज्ञापत्राद्वारे केला आहे.तसेच आत्महत्या केलेल्या ११,५२८ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई दिली आहे. तसेच ३८ लाख तरुणांनी कौशल्य विकास योजनेअंतर्गत एम्प्लॉयमेंट एक्स्चेंजमध्ये नोंदणी केल्याचे सरकारने नमूद केले आहे. याशिवाय शिक्षण हक्क कायद्यांतर्गत राज्यातील बहुसंख्य शाळांमध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत, असेही सरकारने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.