शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे जाणारा सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
3
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
4
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
5
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
6
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
7
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
8
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
9
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
10
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
11
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
12
Electric Car: एका चार्जवर ३ देश फिरले, 'या' इलेक्ट्रिक कारची गिनीज बूकमध्ये नोंद होणार!
13
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
14
"सैफ रुग्णालयात असताना करीना कपूरच्या कारवरही हल्ला झाला", रोनित रॉयचा धक्कादायक खुलासा
15
Tarot Card: या सप्ताहात परिस्थितीचा करा स्वीकार, भावनेत न गुंतता करा सारासार विचार!
16
Air India Plane Crash: टेकऑफ ते क्रॅश होईपर्यंत 'त्या' ९८ सेकंदात काय झालं?; AAIB चा रिपोर्ट, धक्कादायक खुलासे
17
अमृता सुभाषची झाली फसवणूक? ठळक अक्षरात लिहिलं CHEATED; "ह्याबद्दल बोलूच पण..."
18
अन्न-पाणीही मिळेना, लोकांची होतेय तडफड! गाझामध्ये मदत केंद्राजवळच ७९८ लोकांचा मृत्यू
19
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
20
Maharashtra Co-op Bank case: आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र

शिवस्मारक हे जगात ओळख बनेल - मुख्यमंत्री

By admin | Updated: December 25, 2016 03:02 IST

‘स्टॅच्यू आॅफ लिबर्टी’ ही जशी अमेरिकेची ओळख आहे तसे, अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक ही महाराष्ट्र आणि देशाची ओळख जगात बनेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र

मुंबई : ‘स्टॅच्यू आॅफ लिबर्टी’ ही जशी अमेरिकेची ओळख आहे तसे, अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक ही महाराष्ट्र आणि देशाची ओळख जगात बनेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी व्यक्त केला. वांद्रे-कुर्ला संकुलाच्या एमएमआरडीए मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुख्य उपस्थितीत आयोजित सभेमध्ये ते बोलत होते. अठरापगड जातींचे मावळे सोबत घेऊन शिवाजी महाराज मुगलांवर तुटून पडले होते. अशाच सामान्य माणसांना केंद्रबिंदू मानून राज्याचा विकास आपले सरकार करीत असून ज्या छत्रपतींच्या आशीर्वादाने आम्हाला सत्ता मिळाली त्यांचे आम्ही सेवक आहोत, असे मुख्यमंत्री म्हणाले. जो देश आपला इतिहास विसरतो त्याला वर्तमान तर असू शकतो मात्र, भविष्य असू शकत नाही, या शब्दांत शिवस्मारकाच्या उभारणीचे जोरदार समर्थन मुख्यमंत्र्यांनी केले. शूरता, नम्रता, प्रशासकीय कौशल्य असे अनेकविध गुण असलेले शिवाजी महाराज हे आमची प्रेरणा आहेत. आम्ही कोणीही ‘शिवा’ होऊ शकत नाही पण ‘जिवा’ (जिवा महाला) होण्याची संधी द्यावी, अशी प्रार्थना मी आई तुळजाभवानीच्या चरणी करतो, असे भावपूर्ण उद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले. भूूमिपूजन होत असलेल्या मुंबईतील पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे सामान्य माणसांचे जीवन सुखकर होईल. असे सांगून या प्रकल्पांसाठी केंद्र सरकारच्या विविध परवानग्या तत्काळ दिल्याबद्दल पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचे त्यांनी आभार मानले. किल्ल्यांचा विकास करू -उद्धवशिवरायांचे नाव घेताच मुडदाच काय पण दगडही उभे राहतील. ते महाराष्ट्राचे दैवत होते आणि आहेत. त्यांचे भव्य स्मारक उभारणे हे येऱ्यागबाळ्याचे काम नव्हते. सरकारमध्ये आम्ही सोबत आहोत आणि जगाला प्रेरणा मिळेल, असे हे स्मारक उभे राहील, अशा माझ्या शुभेच्छा आहेत. महाराष्ट्रातील गडकिल्ले केंद्रीय पुरातत्व विभागापासून मुक्त करून राज्य शासनाकडे द्या, अशी माझी पंतप्रधान मोदींकडे मागणी आहे. असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले.मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि नौसेनेकडे असलेली सुमारे ९०० एकर जागा वापरात नाही. त्या ठिकाणी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान करणाऱ्यांचे संग्रहालय व्हायला हवे, असेही त्यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)शिवसैनिकांची धरपकडशिवसेनेचे पक्षप्रमुख स्वत: पंतप्रधानांसोबत शिवस्मारकाच्या सोहळ्यात सहभागी असतानाही शिवसैनिकांना अभय मिळाले नाही. हा सोहळा पाहण्यासाठी गिरगाव चौपाटीबाहेर गर्दी करणाऱ्या शिवसैनिकांच्या एका गटाला ताब्यात घेत पोलिसांच्या गाडीत कोंबण्यात आले. चौपाटीसमोरील दुकानंही बंद करण्यास भाग पाडण्यात आल्याने कोणत्याही गोंधळाविना हा सोहळा शांततेत पार पडला.पोलिसांची दमछाकचौपाटी फिरण्यासाठी आलेल्या अनेकांचा येथे आल्यावर पोलीस बंदोबस्त पाहून हिरमोड होत होता. त्यातही काही हौशी सोहळा अथवा मान्यवरांची एखादी झलक पाहण्यासाठी धडपडत होते. अशांना आवरताना पोलिसांचीमात्र पुरती दमछाक होत होती.