शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
3
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
4
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
5
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
6
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
7
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
8
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
9
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
10
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
11
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
12
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
13
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
14
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
15
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
16
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
17
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
18
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
19
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

रायगडावर मंगळवारी शिवराज्याभिषेक दिन

By admin | Updated: June 1, 2017 03:30 IST

किल्ले रायगडावर अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे मंगळवारी (दि. ६) शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याचे

लोकमत न्यूज नेटवर्कमहाड : किल्ले रायगडावर अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे मंगळवारी (दि. ६) शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी महाराष्ट्र व देशभरातून लाखो शिवभक्त सामील होण्यासाठी येणार आहेत. सोमवार (दि. ५) व मंगळवार (दि. ६) असे दोन दिवस या सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आहे. सोहळ्याची माहिती देण्यासाठी या पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. पत्रकार परिषदेसाठी स्थानिक पदाधिकारी रघुवीर देशमुख, प्रशांत दरेकर आणि संभाजी ब्रिगेडचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष वैभव शेडगे आदी उपस्थित होते. गडावर निर्माण झालेली पिण्याच्या पाण्याची टंचाई लक्षात घेऊन गडाच्या पायथ्याशी शिवभक्तांसाठी एक लाख पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांची व्यवस्था करण्यात आली तरीही शिवभक्तांनी आपल्याबरोबर किमान तीन लिटर पाणी ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. पायथ्याला वाहतूककोंडी होऊ नये यासाठी पार्किंगची व्यापक व्यवस्था करण्यात आली आहे. ते फुल्ल झाल्यानंतर पाचाडच्या आधीच वाहने थांबविण्यात येतील. तसेच पाचाड येथून चित्तदरवाजापर्यंत पाच मिनी बसेसची मोफत सेवा उपलब्ध आहे. ५ जून रोजी सायंकाळी गडावर अन्नछत्र सुरू करण्यात येणार आहे. यावर्षी गडाच्या पायथ्याशी टी पॉइंट येथे प्रथमच दुसरे अन्नछत्र सुरू करण्यात येणार आहे. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे प्रमुख मार्गदर्शक युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि या समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत यांच्या अध्यक्षतेखाली ५ जूनपासून गडावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. रायगड संवर्धनाचा संकल्प राज्य शासनाने किल्ले रायगड संवर्धनाचा संकल्प सोडला आहे. किल्ले रायगडचे संवर्धन कशा प्रकारे व्हावे याबद्दल सामान्य शिवभक्तांची मते जाणून घेण्यासाठी गडावर एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्रात सामान्य शिवभक्तांची मते ऐकून घेतल्यानंतर युनेस्कोच्या उपसंचालक डॉ. शिखा जैन, रीमा हुजा, बी.व्ही. खरबडे, राकेश माथूर, कोकण विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, ए.के.सिन्हा, डॉ. के.पी. पुनाच्चा, ए.आर.रामनाथन,राहुल समेळ, दुर्गमहर्षी प्रमोद मांडे, दुर्ग अभ्यासक भगवान चिले, पर्यावरण तज्ज्ञ मधुकर बाचुळकर आपली मते व्यक्त करणार आहेत.