शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीस-शिंदेंमध्ये दुरावा? बिहारला ना एकत्र गेले, ना एकत्र आले, एकमेकांकडे पाहून कोरडंच हसले; नेमके काय घडले? 
2
'एनडीएने बिहारची मते ५.५ रुपये प्रतिदिन दराने खरेदी केली', प्रशांत किशोर यांचा मोठा दावा
3
कराची शेअर बाजारात तेजी... पाकिस्तानची सर्वात मोठी कंपनी कोणती? रिलायन्सच्या तुलनेत कुठे?
4
Mumbai Crime: ऑफिसमधून बाहेर पडताच कारच्या समोरून आले आणि घातल्या गोळ्या; मुंबईतील घटनेचा व्हिडीओ आला समोर
5
Jara Hatke : जगातील अद्भुत कोपरा, जिथे सूर्य दोन महिने 'सुट्टीवर' जातो; तापमानही जाते शून्याच्या खाली!
6
उदयपूरमध्ये शाही विवाह सोहळा, ज्युनियर ट्रम्पपासून VVIP पाहुणे येणार; कोण आहे वधू आणि वर?
7
किलर स्माईल ते किलर्स स्माईल! माधुरी दीक्षितची सस्पेन्स सीरिज 'या' दिवशी होणार रिलीज
8
एकनाथ शिंदेंकडून दिल्लीत तक्रार पण मंत्री उदय सामंतांनी रवींद्र चव्हाणांचं केलं भरभरून कौतुक
9
धक्कादायक! शाळेच्या छतावरून उडी घेऊन १३ वर्षीय विद्यार्थिनीने आयुष्य संपवले, नेमके कारण काय?
10
असं काय झालं की, लग्नाला फक्त ३ दिवस बाकी असताना नवरदेवाने संपवले आयुष्य; ४ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
11
Smriti Mandhana : समझो हो ही गया... स्मृती मंधानाने केली साखरपुड्याची अनोखी घोषणा, रविवारी होणार विवाह
12
"युट्यूबमधून मी जास्त पैसे कमावते...", फराह खानचा खुलासा; कोरिओग्राफी-दिग्दर्शनाबद्दल म्हणाली...
13
Jalana: १३ वर्षीय विद्यार्थिनीने शाळेच्या छतावरून उडी घेत संपवले जीवन; पालकांचा गंभीर आरोप
14
"जर मी तिला शाळेत पाठवलं नसतं तर..."; चौथ्या मजल्यावरुन उडी मारलेल्या अमायराच्या आईचा टाहो
15
मोमोजचा व्यवसाय, प्रचंड मेहनती, नवीन फ्लॅटही घेतला; साहिलने जे कमावलं ते ड्रायव्हिंगने गमावलं
16
The Family Man 3 Review: 'श्रीकांत तिवारी'वरच 'टास्क फोर्स'ला संशय; या मिशनमध्ये 'द फॅमिली मॅन' पास की फेल? वाचा रिव्ह्यू
17
Pune Accident: ताम्हिणी घाटात जीप ५०० फूट दरीत कोसळली, ६ तरुणांचा मृत्यू
18
IND vs SA: भारताला मोठा धक्का! शुबमन गिल दुसऱ्या कसोटीतून बाहेर, अनुभवी खेळाडूला कर्णधारपद
19
McDonald's नं भारतीय वंशाच्या कर्मचाऱ्याला दिलं ३५ लाखांचं बक्षीस, अमेरिकेत 'डिनर'देखील करवलं
20
Numerology: होणारी बायको कशी असणार? हे जन्मतारखेवरुन कळणार! मूलांकानुसार जाणून घ्या भविष्य
Daily Top 2Weekly Top 5

नोटंबदीविरोधात शिवसेनेचे झंडू बाम वाटप आंदोलन

By admin | Updated: November 16, 2016 13:02 IST

बँक, एटीएम सेंटरबाहेर रांगेत उभ्या राहणा-या नागरिकांचे पाय, कंबर, पाठदुखी होत असल्याने सोलापुरात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना झंडू बामचे वाटप करुन अनोखे आंदोलन केले.

 ऑनलाइन लोकमत

सोलापूर, दि. 16 - केंद्र सरकारच्या नोटबंदी निर्णयाचा भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने कडाडून विरोध केला आहे. नोटबंदीच्या निर्णयाला विरोध दर्शवण्याची एकही संधी शिवसेना सोडत नसल्याचे गेल्या काही दिवसांपासून दिसत आहे.  
याचाच एक भाग म्हणून सोलापुरात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी नोटबंदीविरोधात अनोखे आंदोलन केले.  
 
बँक, एटीएम सेंटरबाहेर रांगेत उभ्या राहणा-या नागरिकांना पाय, कंबर, पाठदुखीचा त्रास होत असल्याने शिवसेनेने त्यांना झंडू बामचे वाटप करुन केंद्र सरकारविरोधात अनोखे आंदोलन केले. याद्वारे शिवसेना केंद्राच्या नोटबंदी निर्णयाची खिल्ली उडवत असल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेकडून बुधवारी शहरातील लकी चौकातील 'बँक ऑफ इंडिया'च्या शाखेसमोर रांगेत उभे असलेल्या ग्राहकांना झंडू बाम वाटप करण्यात आले. शिवसेनेचे शहर प्रमुख प्रताप चव्हाण आणि विद्यार्थी सेनेचे जिल्हा संघटक महेश धाराशिवकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.
 
(सर्वसामान्यांच्या खिशातून पैसे काढून मोदी उद्योगपतींना देणार - राहुल गांधी)
 
'अचानक घेण्यात आलेल्या नोटबंदीच्या निर्णयामुळे सर्वसामान्यांचे अक्षरशः हाल होत आहेत. एवढेच नाही तर जुन्या नोटा बदलण्यासाठी लोकांचा संपूर्ण दिवस खर्च होत आहे. कोणतेही नियोजन न करता मोदी सरकारने हा निर्णय घेतल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. निर्णय चांगला आहे मात्र त्याची अंमलबजावणी नीट होत नाही', अशी टीकादेखील शिवसेनेने यावेळी केली आहे. 
(नरेंद्र मोदींनी देशाची माफी मागावी - काँग्रेस)
 
रांगेत उभे राहून नागरिकांना पाय, कंबर आणि पाठदुखीचा त्रास होऊ लागला आहे. जनतेला त्रास होत असल्याने नोटबंदीविरोधात प्रतिकात्मक आंदोलन करुन आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष्य वेधवण्याचा प्रयत्न केला, असे शिवसेनेचे शहर प्रमुख प्रताप चव्हाण यांनी सांगितले. 
 
8 नोव्हेंबर रोजी देशातून  500, 1000 रुपयांच्या जुन्या नोटा रद्द करण्याची घोषणा करण्यात आली आहे तेव्हापासून ते आजपर्यंत बँकांबाहेर, एटीएम सेंटरबाहेर पैशांसाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांची झुंबड उडत आहे. दिवसरात्र, भर उन्हात रांगेत उभे राहिल्यामुळे नागरिकांना शारीरिक समस्या उद्धभवू लागल्या आहेत. याशिवाय दैनंदिन जीवनातील अन्य गंभीर समस्यादेखील निर्माण होऊ लागल्या आहेत.